अल्पवयीन विद्यार्थी ठरला शिक्षिकेच्या वासनेचा बळी : विद्येच्या माहेरघरातील ‘डर्टी पिक्चर’ : शिक्षण विभागात खळबळ
अल्पवयीन विद्यार्थी ठरला शिक्षिकेच्या वासनेचा बळी : विद्येच्या माहेरघरातील ‘डर्टी पिक्चर’ : शिक्षण विभागात खळबळ
विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात विद्यार्थ्यांवर शिक्षकांकडून तर कधी कॅबचालकाकडून तर कधी इतर कर्मचाऱ्यांकडून लैंगिक अत्याचार होण्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांपासून घडत आहेत आहेत. मात्र यावेळी चक्क एका शिक्षिकेनेच पौगंडावस्थेतील एका विद्यार्थ्याला आपल्या वासनेचा शिकार बनवण्याची घटना समोर आली आहे. शाळेतील २७ वर्षीय शिक्षिकेने १७ वर्षाच्या विद्यार्थ्याबरोबर शाळेच्या आवारातच शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
पुण्यातील गंज पेठेतील एका शाळेतील हा धक्कादायक प्रकार आहे.
या घटनेने शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली असून पालकही चक्रावून गेले आहेत. शिक्षक विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करत असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रातून वाचायला मिळतात मात्र पुण्यातील एका इंग्रजी शाळेतील शिक्षिकेने चक्क माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यावरच अत्याचार केला. दहावीत शिकणाऱ्या सतरा वर्षीय विद्यार्थ्याबाबत शाळेतीलच २७ वर्षीय शिक्षिकेला आकर्षण वाटत होतं. शिक्षिकेने विद्यार्थ्यालाही आकर्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्याला आपल्या जाळ्यात ओढलं. विद्यार्थीही आकर्षित झाला आणि बळी पडला. शिक्षक – विद्यार्थ्यांच्या नात्याला लाजवेल, अशी धक्कादायक घटना नुकतीच घडली.
सदर प्रकरणी महिला शिक्षकेला पोलिसांनी अटक केली असून खडकवासला पोलीस ठाण्यात
संबंधित शिक्षिकेवर पोलिसांनी पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात केला आहे. हा प्रकार पुण्यातील गंज पेठेत असणाऱ्या एका शाळेच्या आवारात शुक्रवारी उघडकीस आला. पीडित मुलगा हा भवानी पेठ परिसरात राहात असून तो इयत्ता दहावीत आहे. बोर्डाची परीक्षा होण्यापूर्वी शाळेत सुरू असलेल्या प्रिलियम परीक्षेसाठी तो शुक्रवारी शाळेत आला होता.
नेमकं काय घडलं?
आरोपी महिला सुद्धा या शाळेत शिक्षिका असून ती धानोरी येथे वास्तव्यास आहे. अल्पवयीन विद्यार्थ्याला तिने त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. आरोपी महिला शिक्षिकेने त्याला तिच्यासोबत शाळेच्या आवारातच जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडले. ही बाब प्रशासनाला कळताच शाळेच्या व्यवस्थापनाने संबंधित शिक्षिकेच्या संदर्भात पोलिसात कळवले तसेच तिला अटकही करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर ही कारवाई झाली.
शाळा हे विद्येचे माहेरघर असते. शाळेमध्ये विद्यार्थी शिक्षक असं पवित्र नातं असते. मात्र आज या नात्याला काळीमा फासल्या जात आहे. विद्येच्या पवित्र मंदिरात कधी विद्यार्थ्यांवर तर कधी विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार मोठ्या प्रमाणात होत आहेत, ही अतिशय खेदाची गोष्ट आहे.
बदलापूरमध्येही एका शाळेत २ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचं तीव्र पडसाद मुंबईसह राज्यभर उमटताहेत. अत्याचाराच्या घटना वाढत असून घृणास्पद कृत्य करणाऱ्यांच्या मनात कायद्याची भीती राहिली नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये बलात्कार, लैंगिक अत्याच्याराच्या घटनांमध्ये झपाट्यानं वाढ होतानाचं भयावह चित्र आहे.
आठवडाभरातच १२ घटना
राज्यात गेल्या १० दिवसांत आठ जिल्ह्यांत अल्पवयीन मुलींवरच्या अत्याचाराच्या तब्बल १२ घटना समोर आल्यात. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अकोला, लातूरमध्ये गेल्या काही दिवसांत अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचं समोर आलंय. त्यापैकी ११ घटना या गेल्या तीन दिवसांतल्या आहेत. महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणाऱ्या अशा या घटना आहेत. बदलापुरातील शाळेत २ चिमुकल्यांवर १३ ऑगस्ट रोजी अत्याचार झाला होता.
पुण्यातीलच भवानी पेठेत १५ ऑगस्ट रोजी एक नामांकित शाळा आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पीडित मुलगी शाळेत तिची स्कूल बॅग शोधण्यासाठी गेली होती. यावेळी आरोपी तरुण हा मुलांच्या स्वच्छतागृहाजवळ थांबला होता. पीडित मुलगी जवळ येताच आरोपीने तिचा हात पकडत तिला जबरदस्तीने स्वच्छतागृहात ओढत घेऊन गेला. यावेळी आरोपीने तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले होते.
अकोल्यातील शिक्षकाकडून सहा मुलींचा विनयभंग केल्याची घटना २० ऑगस्टला उघडकीस आली होती. ठाण्यात गतिमंद मुलीवर २० रोजी अत्याचार झाला होता. नाशकात २१ ऑगस्ट साडेचार वर्षांच्या मुलीचं अपहरण करून अत्याचार झाला होता. लातूरमध्ये २० ऑगस्ट रोजी साडेचार वर्षाच्या मुलीवर लैंगिक छेडछाडची घटना घडली, तर कोल्हापूर मध्ये २२ ऑगस्ट रोजी दहा वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली होती.
मुंबईत अपंग अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना २१ ऑगस्टरोजी घडली होती. राज्यात अशा घटना कितीतरी घडत आहेत.
पायाभूत सुविधा आणि शिक्षणाच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली असली तरी, अनेक सरकारी शाळांमध्ये अजूनही योग्य कॅम्पस देखरेखीचा अभाव आहे. .शालेय प्रशासनाने, पीटीएच्या सहकार्याने, विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण प्रदान केले पाहिजे. अभ्यागतांचा मागोवा घेण्यासाठी, सर्व शाळांनी अभ्यागतांचा लॉग ठेवणे आवश्यक आहे. सरकारने तसेच शाळा प्रशासनाने सर्व शाळांमध्ये सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची खात्री करणे ही शाळा प्रशासनाची नेहमीच जबाबदारी असते.
सरकारी शाळांच्या कॅम्पसमध्ये प्रवेश करण्यासाठी कोणतेही कठोर नियम नाहीत हे खरे आहे. पीटीए फंडाचा वापर सीसीटीव्ही युनिट्स बसवण्यासाठी आणि सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यासाठी केला जावा. पुणे घटनेपासून सरकारनेही धडा घेतला पाहिजे.अल्पवयीन मुली या घटनांमुळे अस्वस्थ होऊन आत्महत्या करत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी तरुण, तरुणींसाठी समुपदेशक कार्यशाळा घेणे गरजेचे आहे. यासाठी सामाजिक संस्थेच्या मदतीने पोलिसांनी पुढाकार घ्यायला पाहिजे.
प्रा डॉ सुधीर अग्रवाल वर्धा
९५६१५९४३०६