महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे काय हो ? कुणी सांगेल का ?

महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे काय हो ? कुणी सांगेल का ?
महाराष्ट्रात अलीकडच्या काळात राजकीय हिंसाचार आणि गोळीबाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.महाराष्ट्रातील वाढती गुन्हेगारी आणि गोळीबाराच्या घटनांवर नजर टाकल्यास
गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्र सध्या बिहारकडे जात तर नाही ना? काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील शाळेत बालवाडीतील दोन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी महाराष्ट्र होरपळून निघाला होता.बदलापूरमध्ये जे घडले ते भयंकर आणि दुर्दैवी होते त्यानंतर महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटना सतत वाढत आहेत. बलात्कारापासून ते हुंडाबळीपर्यंतच्या घटनांमध्ये वर्षानुवर्षे वाढ होत आहे.बीडचा बिहार होत आहे.ऑक्टोंबर २०२४मध्ये बाबा सिद्धी किती हत्या झाली.बाबा सिद्दीकीचा मृत्यू दुर्दैवी झाला. मात्र आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे… हत्येमागे वेगवेगळी कारणे असू शकतात…
यापूर्वी २ फेब्रुवारी २०२४ रोजी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी जमिनीच्या वादातून आणि राजकीय वैमनस्यातून मुंबईजवळील उल्हासनगर येथील पोलीस ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या स्थानिक नेत्यावर गोळ्या झाडून जखमी केले होते.१५ डिसेंबर रोजी सरकारी रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला जिथे त्याला न्यायालयीन कोठडीत असताना छातीत दुखणे आणि अस्वस्थतेची तक्रार केल्यावर त्याला तातडीने नेण्यात आले आणि पोलिसांनी परभणी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ठेवले.
दरम्यान पोलीस कोठडीत सुर्यवंशी मृत अवस्थेत दिसून आले.पोलिसांनीच त्यांची हत्या केल्याचा आरोप होत आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे.सरपंच संतोष देशमुखांचा खून हा गेल्या काही दशकातील महाराष्ट्रातला सर्वाधिक निर्घृण खून आहे. जल्लादांनाही पाझर फुटावा, राक्षसाचाही आत्मा थरथर कापावा, इतक्या पाशवीपणे सरपंचाला मारले गेले आहे. तक्रारीनुसार आरोपींनी सरपंचाच्या गावच्या एका वॉचमनला मारहाण केली. त्याचा जाब विचारायला गेलेले सरपंच संतोष देशमुखांसोबत आरोपींची मारहाण झाली. त्या एका घटनेवरुन असे काय झाले की इतक्या क्रृरपणे खून करण्यात आला, हे अद्याप डॉक्टर आणि पोलिसांनाही उमगलेले नाही.
आरोपांनुसार संतोष देशमुखांच्या छातीवर कुस्ती स्टाईलने उड्या मारल्या गेल्या आहे. ज्यामुळे त्यांच्या काही बरगड्या हृद्यात शिरल्या. त्यांचा डोळा लायटरनं जाळण्यात आला. पाणी मागत असताना घशात कोणतातरी पदार्थ टाकण्याचा प्रयत्न झाला. आरोपींनी स्वतःच्या पायावर पाणी टाकून संतोष देशमुखांना पाय चाटायला लावले. गुप्तांगावर मारहाण करण्यात आली आणि मारहाण कशी होतेय हे आरोपी व्हिडीओ कॉलद्वारे एका व्यक्तीला ते लाईव्ह दाखवत होते. काल सभागृहात बीडच्या चर्चेवेळी सुरेश धस आणि आव्हाडांच्या भाषणाने सभागृह स्तब्ध झाले. अनेकांना या हत्येचं गांभीर्य प्रकर्शाने जाणवले. मात्र जे सुरेश धस एकीकडे बीड पोलिसांवर दबाव असल्याचे म्हणत होते, त्यांनी स्थानिक पोलिसांकडेच तपास देण्याचे म्हटल्याने आश्चर्यही व्यक्त करण्यात आले.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने निर्गुण हत्या करण्यात आली त्यावरून महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.बीड जिल्ह्यातल्या कायदा-सुव्यवस्थेवर फक्त विरोधकच नाहीत, तर बीड जिल्ह्यातील आमदारही चिंता व्यक्त करत आहेत. त्यामुळे खरोखर बीडचा बिहार होत आहे की काय? हा प्रश्न आहे. मग बीडमध्ये गँग्स ऑफ वासेपूरसारख्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत.बिहारहूनही भयावह परिस्थिती बीडची झाली आहे. सरपंच संतोष देशमुखांची क्रृर हत्येमुळे या प्रतिक्रिया समोर येत आहे. संतोष देशमुख हत्येमध्ये प्रामुख्याने वाल्मिक कराडचे नाव समोर आले आहे. वाल्मिक कराड हा व्यक्ती मंत्री धनंजय मुंडे यांचा राईट हँड आहे. लोक वाल्मिक कराड याला प्रति धनंजय मुंडे तर काही जण धनंजय मुंडेंहूनही मोठा मानतात. समारंभ असो की सेलीब्रेशन, मेळावा असो किंवा राडा, मंत्री धनंजय मुंडेंसोबत तो सावली प्रमाणे असतो.
वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. एक-दोन अपवाद सोडून अनेक नेते वाल्मिक कराडचे नाव घ्यायला का कचरले? हा देखील मुद्दा सभागृहात उपस्थित झाला आहे. मंत्री धनंजय मुंडेंच्या मते विरोधक बीड जिल्ह्याला बिहार म्हणून बदनामी करता आहेत. पण वास्तवात बीड जिल्ह्यातल्या ६ आमदारांपैकी विरोधक म्हणून एकच आमदार जिंकला आहे. त्या एका विरोधी आमदारासह धनंजय मुंडेंच्याच सत्तेतील सत्ताधारी पाचही आमदार बीडच्या गुन्हेगारीबद्दल चिंता व्यक्त करत आहे. विशेष म्हणजे या घटनेतील आरोपींना शोधून काढण्यात तब्बल २७ दिवस लागले.यावरून पोलीस किती संथ गतीने कारवाई करत आहे, हे.स्पष्ट होते.
वर्ष २०२० पासून ते २०२४ दरम्यान बीड जिल्ह्यात २७५ खून झाल्याची आकडेवारी यंत्रणेकडून उपलब्ध माहितीतून समोर आली आहे. याशिवाय खुनाच्या प्रयत्नाच्या ७२८ प्रकरणे बीड जिल्ह्यांतील विविध पोलिस ठाण्यांत नोंदविण्यात आले आहेत.
बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांत आर्थिक फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल झाल्याची नोंद आहे. यात सहकारी बँकांच्या दोन ते तीन घोटाळ्यांचा समावेश आहे. यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे मानले जाते. याशिवाय बीडमध्ये संघटित गुन्हेगारीचे प्रमाणही गेल्या काही काळात वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. तीक्ष्ण हत्यार किंवा घातक शस्त्राने हल्ला करणे तसेच बालविवाहाची प्रकरणेही बीड जिल्ह्यामध्ये वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.विविध गुन्ह्यांसह जमिनी बळकाविण्याची प्रकरणे पोलिसांत नोंद आहेत. या विविध गुन्ह्यांसह विविध कारणांमुळे खून किंवा खुनाचा प्रयत्न केल्याची नोंद झालेली प्रकरणे गेल्या काही वर्षांत वाढली आहेत. यामध्ये घरगुती कारणावरून हत्येपासून ते काही जणांकडून जुन्या वादातून निर्घृण हत्येच्या प्रकरणांचा समावेश आहे. या प्रकरणांमध्ये बीड पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. यानंतरही जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. २०२४ मध्ये जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांत ३६ खून झाल्याची पोलिस दफ्तरी नोंद आहे. याशिवाय बलात्काराच्या १५६ घटनांची नोंद करण्यात आली. तसेच दंगली घडविण्याचे ४९८ गुन्हे दाखल आहेत.
संतोष देशमुख यांच्या हत्येची शाही वाळते न वाळते तर विद्येचे माहेरघर’ अशी ओळख असलेल्या पुण्यामध्ये बीपीओ कंपनीत काम करणाऱ्या सहकाऱ्यानं महिला कर्मचाऱ्याची धारदार शस्त्रानं वार करत हत्या केली. हा गुन्हा पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत घडला आहे.
मागील दोन वर्षा पासून महाराष्ट्रात हत्याकांडाचे सत्र सुरू आहे.राज्यात गुन्हेगारी सातत्याने वाढत असून हत्याकांडाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हत्याकांडाच्या सर्वाधिक घटना मुंबई आणि पुणे शहरात घडल्या असून ठाणे आणि नागपुरात हत्याकांडाच्या घटनांनी डोके वर काढले आहे. मुंबईत सर्वाधिक ६८ हत्याकांड झाले असून दुसऱ्या स्थानावर पुणे (४२) आणि ठाणे शहराचा (३९) क्रमांक आहे. ही माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावरून समोर आली आहे.
वर्षाच्या सुरुवातीपासूनच राज्यात गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यात वाढ झाली होती. तसेच मुली, तरुणी आणि महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. राज्यात हत्याकांड आणि खून करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गुन्हेगार आणि गुन्हेगारी वाढत असल्याने पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त केल्या जात आहे. राज्यात गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यात पोलीस विभागाला सातत्याने अपयश येत असल्यामुळे पिस्तूल, तलवार सारख्या शस्त्रासह वावरणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. राज्यात गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्याची वाढती संख्या बघता गृहमंत्रालय आणि पोलीस महासंचालक कार्यालयातून हालचाली होणे गरजेचे आहे.
राज्यातील सर्वाधिक हत्याकांड घडण्यासाठी अनैतिक संबंध, प्रेम संबंध किंवा शारीरिक संबंधाचे कारण व राजकीय कारण ठरल्याचे समोर आले आहे. कौटुंबिक कारणातून घडलेल्या हत्याकांडात प्रियकर, नातेवाईक किंवा कुटुंबातील व्यक्तीचा समावेश असल्याचे धक्कादायक कारण समोर आले आहे. तसेच बऱ्याच घटनांमध्ये जुने वैमनस्य, संपत्ती आणि पैशाचा वाद असल्याचे कारण समोर आले आहे.राज्यात कायदा व सुव्यवस्था राखणे हे गृह मंत्रालयाची जबाबदारी.मात्र गेल्या काही दिवसापासून घडत असलेल्या हत्याकांडाच्या घटनांमुळे गृह मंत्र्यांवर प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रा डॉ सुधीर अग्रवाल वर्धा
९५६१५९४३०६
महाराष्ट्राची वाटचाल बिहार होण्याकडे सुरू आहे ? ही गंभीर बाब आहे.यासाठी सोशल माध्यम,मोबाईल आणि गुन्ह्याचा शोध चुकीच्या मार्गाने घेणारी यंत्रणा कारणीभूत ठरते आहे.कायदा आपले काम व्यवस्थितपणे करीत नाही.ही बाब सर्वविदीत आहे.यासाठी गुन्हेगारांना निवडून संसदेत आणि विधानसभेत पाठविणारे मतदार सुध्दा तेवढेच दोषी आहेत. आज आम्हांला दबंगगिरीची भुरळ पडली आहे.जनतेला नेता नाही तर हिरोची भुरळ पडली आहे.जो क्षणार्धात चुटकीसरशी सगळे प्रश्न हाताळतो आहे. जोपर्यंत समाज योग्य व्यक्तीची निवड करून कायदेमंडळात,संसदेत व विधानसभेत पाठवीत नाही तोपर्यंत राज्यकर्त्यांना दोष देऊन काहीही उपयोग होणार नाही.चुक जनतेची,मतदारांची आहे.याचे चांगले व वाईट परिणाम जनतेलाच भोगावे लागणार आहेत.