बांगलादेश पुन्हा पूर्व पाकिस्तान होण्याचा मार्गावर ?

बांगलादेशचे पाकिस्तानशी लष्करी आणि सामरिक संबंध वाढवण्याच्या दिशेने प्रयत्न
बांगलादेश पुन्हा पूर्व पाकिस्तान होण्याचा मार्गावर ?
भारताचे दोन इस्लामिक शेजारी देश बांगलादेश आणि पाकिस्तान एकत्र येणार आहेत, ही भारतासाठी चिंतेची बाब ठरू शकते. ज्या पाकिस्तानी लष्कराने ५३ वर्षांपूर्वी १९७१ मध्ये तत्कालीन पूर्व पाकिस्तानात घुसून दहशत निर्माण केली होती.आज बांगलादेश त्याच सैन्यातून आपल्या सैनिकांना प्रशिक्षण देण्याची तयारी करत आहे. घ्या भूमीतून भारताने १९७१ मध्ये पाकिस्तानी सैन्याला हुसकावून लावले होते आता येथेच तब्बल तरी पण वर्षानंतर बांगलादेश लष्कर पाकिस्तानी लष्कराकडून प्रशिक्षण घेणार आहे हे भारताच्या धोरणात्मक आणि सामरिक दृष्ट्या धोकादायक असून भारताच्या चिंतेत अधिक भर पडली आहे.
शेख हसीना यांच्या सरकारच्या काळात बांगलादेशने पाकिस्तानशी संबंधावर मर्यादा घातल्या होत्या २०२२ मध्ये शेख हसीना यांनी पाकिस्तानी युद्ध नका पीएनएस तैमूरला चटगाव बंदरावर नांगरण्याची परवानगी दिली नाही परंतु सध्याच्या अंतरीम सरकारने केवळ पाकमधून चढगावला येणाऱ्या मालवाहकांना परवानगी दिली नाही तर या मालाला तपासणीतूनही सूट दिली आहे.
शेख हसीना सरकार कोसळल्यानंतर बांगलादेशातील अंतरिम सरकारच्या काळात पाकिस्तानशी लष्करी संबंध झपाट्याने वाढवले जात आहेत. फेब्रुवारी २०२५ मध्ये कराची बंदरावर बांगलादेश आणि पाकिस्तानच्या नौदलाचा संयुक्त सराव होणार आहे यावरून याचा अंदाज लावता येईल. हा सराव दर दोन वर्षांनी होतो, परंतु बांगलादेशने गेल्या १५ वर्षांपासून यापासून अंतर राखले होते. सध्याच्या अंतरिम सरकारने केवळ या सरावात सहभागी होण्यास मान्यता दिली नाही, तर बंगालच्या उपसागरात पाकिस्तानी नौदलासोबत संयुक्त सरावाची तयारीही सुरू केली आहे.
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांच्या विद्यमान अंतरिम सरकारने पाकिस्तानशी लष्करी आणि सामरिक संबंध वाढवण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. यामुळे भारतासमोर नवीन राजनैतिक आणि सुरक्षा आव्हाने निर्माण होणार आहेत. पाकिस्तानी लष्कराच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष जनरल साहिर शमशाद मिर्झा यांच्या नेतृत्वाखालील एक पथक फेब्रुवारी २०२५ मध्ये बांगलादेशला पोहोचेल, जे तेथे बांगलादेशी सैन्याला प्रशिक्षण देईल.
पाकिस्तानी लष्कराने बांगलादेशला दिलेले प्रशिक्षण मेमेनशाही कँटमधील आर्मी ट्रेनिंग अँड डॉक्ट्रीन कमांड मुख्यालयात आयोजित केले जाईल. या एक वर्षाच्या दीर्घ कार्यक्रमानंतर पाकिस्तानी लष्कर बांगलादेशच्या सर्व १० लष्करी कमांडमध्ये प्रशिक्षण देईल. या संदर्भात, जनरल मिर्झा यांनी गेल्या महिन्यात नोव्हेंबर २०२४ मध्ये पाठवलेल्या प्रशिक्षणाशी संबंधित प्रस्ताव बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-जमान यांनी मंजूर केला होता.
मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने चितगाव बंदरात पाकिस्तानी मालवाहतूक करणाऱ्यांना सवलत दिली आहे. ढाका-इस्लामाबाद दरम्यान थेट विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात आली. शेख हसीना सरकार पाडण्यात आणि अंतरिम सरकार स्थापन करण्यात पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे मानले जाते. बांगलादेशात दीर्घकाळ सक्रिय असलेल्या पाकिस्तान समर्थक शक्ती आता उघडपणे समोर येत आहेत.
भारताला अनेक आघाड्यांवर धोका
बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या संबंधांमुळे भारताला अनेक आघाड्यांवर धोका निर्माण होऊ शकतो. उदाहरणार्थ, सिलीगुडी कॉरिडॉर, ज्याला ‘चिकन नेक’ म्हणतात. भारताला ईशान्येकडील राज्यांशी जोडणारा हा एकमेव मार्ग आहे. या प्रदेशावर पाकिस्तान आणि बांगलादेशचा सामरिक दबाव वाढू शकतो. बांगलादेशात कट्टरतावादी शक्ती आधीच सक्रिय आहेत. पाकिस्तानी प्रभावामुळे हा धोका आणखी वाढू शकतो. पाकिस्तान-बांगलादेश लष्करी युती भारताच्या ईशान्य क्षेत्राच्या स्थिरतेसाठी एक गंभीर आव्हान बनू शकते.
अंतरिम सरकारमुळेबांगलादेश मधील पाकिस्तान समर्थक पुन्हा सक्रिय झाले असून पाकिस्तान नागरिकांसाठी व्हिसाचे नियम शिथिल करण्यात आले आहेत पाकिस्तानी मालवाहू जहाजाला चितगाव बंदरात तपासणी न करताच प्रवेश देण्यात आला आहे. बांगलादेशातील सध्याच्या बदलांमागे पाकिस्तानची रणजी दिसते पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय ने शेख हसीना यांचे सरकार पाडण्यात आणि अंतरिम सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली पाकिस्तान समर्थक शक्ती बांगलादेशात दीर्घ काळापासून सक्रिय आहेत आता अंतरिम सरकारच्या काळात हे उघडपणे पाकिस्तानचे समर्थन करताना दिसत आहे.
प्रा डॉ सुधीर अग्रवाल वर्धा
९५६१५९४३०६