सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती आणि शिक्षक दिनाच्या औचित्याने पदवीदान समारंभ
.
सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती आणि शिक्षक दिनाच्या औचित्याने पदवीदान समारंभ
नागपुर/E T News
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या 136 व्या जयंती आणि शिक्षक दिनाच्या औचित्याने पदवीदान समारंभाचे आयोजन *स्व. डॉ. चंदनसिंह रोटेले, मा. संस्थापक अध्यक्ष* आणि *डॉ. केदारसिंग रोटेले, मा. अध्यक्ष, ऑरेंज सिटी कॉलेज ऑफ सोशल वर्क, नागपूर * माजी विद्यार्थी संघटनेतर्फे*. कार्यक्रमाचे उद्घाटक*श्री. राहुल हनवते, मा. सिनेट सदस्य, RTMNU, नागपूर, या समारंभाचे प्रमुख अतिथी मा. डॉ. नरेश कोलते, मा. अध्यक्ष, समाजकार्य अभ्यास मंडळ RTMNU, नागपूर आणि डॉ. कल्पना जामगडे, समन्वयक, IQAC*. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी *डॉ. महेंद्रकुमार मेश्राम, कार्यकारी प्राचार्य, OCCSW, नागपूर हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात *डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि स्व.डॉ. चंदनसिंह रोटेले सर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन व दिपप्रज्वलन करुन करण्यात आली.यानंतर भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन *प्रा. रचना धडाडे, समन्वयक, माजी विद्यार्थी संघटना*यांनी केले *महाविद्यालयीन ग्रंथालय ‘निर्मिती’* ची *नवीन शैक्षणिक शाखाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते फित कापून करण्यात आली. शैक्षणिक आणि साहित्यिक योगदानाची प्रदर्शनी करण्यात आली याचा उपयोग प्राध्यापक आणि विद्यार्थी यांना होईल. तसेच महाविद्यालयाच्या नवीन संगणक प्रयोगशाळेला पाहुण्यांनी भेट दिली. कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा पदवी देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक *डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांनी केले. यावेळी त्यांनी शिक्षक-विद्यार्थी संबंधांच्या बदलत्या परिस्थितीबाबत मार्गदर्शन केले. बदलत्या काळात, बदलत्या सामाजिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना घडवण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांच्या खांद्यावर आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले, त्यात कोलकाता येथील अलीकडे घडणाऱ्या घटनांचाही उल्लेख केला. संपूर्ण पिढी घडवण्याची क्षमता शिक्षकांमध्ये असेही ते यावेळी म्हणाले.
*श्री. राहुल हनवते हे आपले मत मांडताना म्हणाले की ज्ञान आणि शहाणपण या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत. त्यांनी एका किस्सेच्या सहाय्याने स्पष्ट केले की, भूतकाळातील काही प्रथा ज्यांना शास्त्रीय कारण आहे, त्या आज कोणत्याही प्रासंगिकतेशिवाय आंधळेपणाने पाळल्या जातात. अशा प्रकारे, आजचे ज्ञान हे शहाणपणाची हमी देत नाही.
*डॉ. नरेश कोलते* यांनी विद्यार्थ्यांचा पदवी देऊन सत्कार करण्यासाठी महाविद्यालयाने घेतलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्यांनी आगामी NAAC पीअर टीम भेटीसाठी कॉलेजला शुभेच्छा दिल्या. NAAC भेट आणि रौप्यमहोत्सवी वर्षांनिमित्त कॉलेज सातत्याने प्रगती आणि यशाकडे वाटचाल करत असल्याचे ते म्हणाले. तसेच महाविद्यालयाचे सर्व चांगल्या कामासाठी महाविद्यालय सज्ज आहे आणी शुभेच्छा देण्यास पात्र आहेत.असे मत त्यांनी या प्रसंगी मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन *प्रा. रचना धडाडे यांनी तर आभार प्रा. शालिनी तोरे, समन्वयक, एनएसएस*. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमास सर्व आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर उपस्थित होते.