Breaking

Editorial

संतोष लांजेवार

रेल्वेतून वाढणारी प्रवाशांची गर्दी हा एक मोठा चिंतेचा विषय झाला आहे .देशातील कोणत्याही भागातील रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून येईल. रेल्वे गाड्यांमधील प्रचंड गर्दीमुळे मध्ये कन्फर्म तिकीट असणाऱ्या प्रवाशांना प्रवास करणे कठीण होत आहे. कन्फर्म तिकीट असणाऱ्या प्रवाशांसह वेटींग वाले प्रवाशी व जनरल टिकीट घेवून प्रवास करणारे प्रवाशी सरळ सरळ शयनयान डब्ब्यातून प्रवास करतात. त्यामुळे कन्फर्म तिकीट असणाऱ्या प्रवाशांना फार मोठा त्रास सहन करावा लागतो. रेल्वेतील वाढत्या प्रचंड गळतीमुळे कधी हे प्रवासी ट्रेनच्या डब्यात जमिनीवर, कधी ट्रेन वर झोपून तर कधी ट्रेनला लटकून प्रवास करताना दिसत आहेत. रेल्वेतील ही गर्दी बघून रेल्वेचा स्लीपर कोच जनरल झाला को काय असं वाटायला लागतं.रेल्वेत वाढणारी गर्दी मग बसायला होणारी गर्दी व त्यातून घडवणारी छोटी छोटी भांडण अशा नाना तऱ्हेच्या गोष्टी घडताना दिसतात. अनेक जण चक्क टायलेट पाशी जमिनीवरही झोपलेले पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात एक काही प्रवासी हे तर चक्क रेल्वेच्या छतावर जाऊन झोपले होते.बिहार वरून येणाऱ्या रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांची इतकी गर्दी असते की या मार्गावरील डब्ब्यांमधील कोच मध्ये हवा देखील प्रवेश करू शकत नाही..इतकी प्रचंड गर्दी या मार्गावरील रेल्वे मधून दिसून येईल.या मार्गावरील प्रवाशी तर चक्क बाथरूम मध्ये जावून बसतात..बाथरूम संडास मधील खिडकी काढून फेकतात..इतके नव्हे ते या शयन यान डब्ब्यांमद्ये जागोजागी झुले बांधतात.

मुंबई, पुणेच नव्हे तर बहुतांश राज्यांकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होऊ लागल्याने प्रवाशांना जागा मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे अतिरिक्त कोच लावावेत आणि कोटा वाढवावा, अशी मागणी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली जात आहे.रेल्वे गाड्यांमधी गर्दी बघता रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना दिलासा देण्यासाठी अतिरिक्त कोच लावावे अशी मागणी आता अनेक प्रवासी संघटना करत आहेत.या पार्श्वभूमीवर रेल्वेने रेल्वे गाड्यांच्या संरचनेत बदल करून स्लीपर तसेच जनरल कोच वाढविले पाहिजे. स्लीपर कोच व जनरल कोच वाढविले तर प्रवाशांना प्रवास करणे अधिक सोयीस्कर होऊ शकतो म्हणून रेल्वेने अतिरिक्त स्लीपर कोच वाढवायला पाहिजे.

बसच्या तुलनेत रेल्वेचा प्रवास वेगवान, स्वस्त व आरामदायी असल्याने बहुतेकांचा कल रेल्वेकडे असतो. मात्र, आता रेल्वेच्या सर्वच गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने रेल्वे प्रवासही गैरसोयीचा होत आहे. आरक्षण करूनही बसायला जागा नसल्याने रेल्वेत प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

दोन महिन्यांपूर्वी तिकीट बुकिंग करूनही प्रवाशांचा हिरमोड होत आहे. आरक्षण करूनही स्लीपर कोच डब्यात गर्दी तुफान झाल्याने ये – जा करणेही अवघड होत आहे. तिकीट काढूनही जनरल डब्यासारखी गर्दी झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

रेल्वेच्या पुणे विभागातून एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या गर्दीच्या हंगामात विशेष गाड्यांच्या २४६ फेऱ्या सोडण्यात आल्या आहेत. तरी या गाड्यांमध्ये प्रवाशांना बसण्यासही जागा नसल्याचे चित्र आहे. पंधराशे ते सोळाशे प्रवाशांची क्षमता असलेल्या गाडीत अडीच ते तीन हजार प्रवासी जात आहेत. परिणामी, रेल्वेच्या महसुलात वाढ होत आहे. मात्र, नागरिकांना चेंगराचेगरी करत प्रवास करावा लागत आहे. काही प्रवाशांना तिकीट न मिळाल्याने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

सध्या विविध मार्गावरील जवळपास सर्वच रेल्वे गाड्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी बघायला मिळते या गर्दीमुळे अनेक दिवसांपूर्वी कन्फर्म तिकीट मिळवणाऱ्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो विविध मार्गावर सुरू असलेल्या रेल्वेच्या विकास कामांमुळे वेळोवेळी अनेक रेल्वे गाड्या रद्द केल्या जातात. त्यांचे रूट बदलण्यात येतात. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे अनेक गाड्यांमध्ये स्लीपर आणि जनरल कोची संख्या कमी असल्यामुळे प्रवाशांची गर्दी नियंत्रित करण्यात रेल्वे प्रशासन अपयशी ठरत आहे हा सर्व प्रकार लक्षात घेता आता तरी रेल्वेने स्लीपर आणि जनरल कोच वाढविण्यावर भर दिला पाहिजे.

+91 73873 80022

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे