कामठी विधानसभा मतदार संघातून काँग्रेसने जयंत दळवी यांना उमेदवारी दिल्यास विजय नक्कीच !
स्थानिक नागरिकांनी जोरदार मागणी
कामठी विधानसभा मतदार संघातून काँग्रेसने जयंत दळवी यांना उमेदवारी दिल्यास विजय नक्कीच !
*स्थानिक नागरिकांनी जोरदार मागणी
नागपूर/E T News
कामठी विधानसभा क्षेत्रात एकूण ४ लाख ५०,००० मतदार आहेत, परंतु नेहमीप्रमाणे नागपूर ग्रामीणमध्ये १५० बुथवर १ लाख ६०,००० मतदार असलेला भाग बेसा, बेलतरोडी, हुडकेश्वर, नरसाळा, खरबी हा शहरी भाग आहे. जर या भागातील स्थानिक उमेदवाराला कामठी विधानसभेची काँग्रेसची उमेदवारी दिल्यास त्याचा नक्कीच विजय होईल. येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते जयंत दळवी यांनी यापूर्वी लोकसभेची निवडणूक लढवून मोठ्या संख्येने मते घेतली आहेत तसेच दळवी यांचे या स्थानिक भागातील सामाजिक कार्य उल्लेखनीय असून त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे करिता जयंत दळवी यांना काँग्रेसने कामठी विधानसभेची उमेदवारी द्यावी. त्यांच्या निवडून येण्यामुळे काँग्रेसला तर फायदा होईलच तसेच या भागातील समस्या सुटतील, अशी मागणी बेसा, बेलतरोडी, हुडकेश्वर, नरसाळा, खरबी या भागातील नागरिकांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.
जयंत दळवी हे मागील २५ वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना २००४ मध्ये बसपा सुप्रिमो मायावती यांनी नागपुर कामठी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली व दळवी यांनी २००४ च्या आधी कोणीच एवढे मतं घेतले नाही तेवढी साठ हजार मतं घेतली होती.
काँग्रेसचे नेते श्री. विलासराव देशमुख यांगी विदर्भात काँग्रेस मजबुत व्हावी या उद्देशाने विदर्भातून BSP तुन लढलेल्या सातही उमेदवारांना एकत्रित करून काँग्रेसची विचारधारा व ध्येयधोरण समजावुन सांगितले जयंत दळवी यांनी विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनांत सर्व उमेदवारांना एकत्रित आणण्यांकरीता मोलाचे सहकार्य केले व विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वात जयंत दळवी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेवुन तत्कालीन प्रदेशअध्यक्षा प्रभाराव यांनी प्रदेश उपाध्यक्ष शहरविकास व झोपडपट्टी विभाग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी यावर नियुक्ती केली. नंतर नागपुर जिल्हा ग्रामिण काँग्रेसच्या अध्यक्षा सुनिता गावडे यांनी जिल्हा उपाध्यक्ष या पदावर नियुक्ती केली. माणिकराव ठाकरे प्रदेश अध्यक्ष असतांना जयंत दळवी यांना प्रदेश काँग्रेस कमेटीवर को-ऑप सदस्य घेतले व गडचिरोली जिल्हा बुथ कमिटी निरीक्षक म्हणून पाठविले, उत्तर नागपूर विधानसभा बुथ कमिटी निरीक्षक, काटोल नगरपरीषद इलेक्शन निरीक्षक, सिंदी रेल्वे नगरपंचायत इलेक्शन निरीक्षक, भिवापुर जिल्हा परीषद इलेक्शन निरीक्षक, व महत्वाचे म्हणजे नागपुर जिल्हा ग्रामिण काँग्रेस अध्यक्ष निवडणुक स्क्रुटनी कमेटीचे अध्यक्ष म्हणून जयंत दळवींनी काम पाहीले. तत्कालीन केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांनी जयंत दळवी यांना केंद्रीय हातमाग महामंडळ कपडा मंत्रालय, भारत सरकार येथे सल्लागार समितीवर पाठविले. जयंत दळवी यांचा प्रामाणिकपणा, पक्षाशी एकनिष्ठता व कोणत्याही गटातटात न राहता सर्वांना घेवुन चालण्यांची त्यांची भुमिका आहे. या त्यांच्या स्वभावामुळे पक्ष नेत्यांनी विविध महत्वाच्या पक्ष संघटनेबाबतच्या जबाबदा-या सोपविल्या होत्या.
पक्षाने जयंत दळवी यांना २००४ मधील विधानसभेत दक्षिण नागपुरची उमेदवारी देऊ असे आश्वासन दिले होते. परंतु तत्कालीन प्रदेशाध्यक्षा प्रभाराव यांनी जयंत दळवी ज्युनियर आहे त्यांना पुढल्या वेळेस संधी देण्यांत येईल असे सांगितले. त्यानंतर २००९ मध्ये कामठी विधानसभेतुन उमेदवारी मागितली असता सुनिताताई गावंडे या सिनियर आहे त्यांना ही संधी द्या पुढल्यावेळी तुम्हाला संधी देण्यांत येईल असे सांगितले. त्यानंतर २०१४ मध्ये राजेंद्र मुळक हे सिनियर आहे त्यांना संधी द्या, तुम्हाला पुढल्यावेळी संधी देण्यांत येईल, असे सांगितले. त्यानंतर २०१९ मध्ये सुरेश भोयर यांना संधी देण्यांत आली व २०२४ मध्ये जयंत दळवी यांना नक्की विधानसभेची संधी देण्यांत येईल, असे आश्वासन देण्यांत आले. आता कामठी विधानसभेत उमेदवारी मागणा-यांपैकी सर्वात सिनियर व सर्वांना चालू शकेल असे उमेदवार म्हणुन जयंत दळवी हेच आहेत. या वेळेला जर जयंत दळवी यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही, तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना असे वाटेल की, पक्षनिष्ठावंत व्यक्तीला फक्त संघटनेत राबवुन घेतात. परंतु विधानसभेत पाठवुन आपल्या भागातील विकास करण्याचे पुण्य जयंत दळवी यांना मिळू देत नाही.
कामठी विधानसभेत मागील २० वर्षापासुन भाजप सत्तेत आहे. कामठी विधानसभेतुन पक्षाने स्थानिक उमेदवार न दिल्यामुळे काँग्रेसचा पराभव होत गेला. २०१९ मध्ये पक्षाने कामठी विधानसभेचा स्थानिक उमेदवार म्हणुन कामठी शहरात राहणारे सुरेश भोयर यांना उमेदवारी दिली परंतु त्यांना अपयश आले.
जयंत दळवी हे नागपुर ग्रामिण भागात मागील २५ वर्षापासुन पक्षबांधणी व संघटन वाढविण्याच्या कामात आहेत. त्यांच्या मनमिळावु स्वभावामुळे येथील सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांचे व नेत्यांचे ते चाहते आहेत. कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस, सेना, BSP, वंचित आघाडी या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये त्यांना मानसन्मान आहेच, परंतु भाजपचे सुद्धा कार्यकर्ते त्यांना मानतात. त्यामुळे जयंत दळवी यांना जर कॉग्रेस पक्षाने उमेदवारी दिली तर ते काँग्रेसचा विजय नक्कीच खेचून आणु शकतील, असा आत्मविश्वास बेसा बेलतरोडी, हुडकेश्वर, नरसाळा, खरबी या भागातील नागरिकांना तसेच कामठी विधानसभा मतदार संघातील स्थानिक नागरिकांना आहे.
—————————