पोरवाल महाविद्यालयात संस्थापक दिन सोहळा संपन्न

पोरवाल महाविद्यालयात संस्थापक दिन सोहळा संपन्न
कामठी/प्रतिनिधी
सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय,कामठी येथे मंगळवार,दिनांक ७ जानेवारी सेठ नेमकुमारजी पोरवाल यांची जयंती संस्थापक दिवस म्हणून साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.अशोक कुमार भाटिया, विकास निदेशक एस. पी.एम. कामठी, होते. तर प्रमुख अतिथीचे स्थान डॉ.वीणा दाढे, माजी हिंदी विभागप्रमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर यांनी भूषविले. कार्यक्रमामध्ये श्री. सुनीलकुमारजी पोरवाल, अध्यक्ष एस. पी. एम, श्री. अभिमन्यू पोरवाल, सदस्य एस. पी. एम., डॉ. एस. एस. धोंडगे (सीईओ) एस.पी. एम., श्री विजयकुमार शर्मा, सचिव, एस.पी. एम., प्राचार्य प्रो.डॉ.विनय चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रा. डॉ.इफ्तेखार हुसैन,हे प्रामुख्याने विचारपीठावर उपस्थित होते.
प्राचार्य प्रो. डॉ. विनय चव्हाण यांनी प्रास्ताविक भाषणातून महाविद्यालयाच्या एकंदर प्रगतीपथाचा आलेख सर्वांसमोर मांडला. पोरवाल महाविद्यालय हे शैक्षणिक, नैतिक,सामाजिक, मूल्य जपणारे महाविद्यालय असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. वीणा दाढे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून बोलतांना म्हटले की, स्वर्गीय नेमकुमारजी पोरवाल यांनी कामठी शहराच्या उत्थान्नासाठी एका शिक्षणसंस्थेचे स्वप्न पाहिले होते. त्याची पूर्ती त्यांनी पोरवाल महाविद्यालयाच्या स्वरूपात पूर्ण केली. याच फलीतातून अनेक गुणवंत असे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात घडून त्यांच्या आयुष्यात प्रकाशाचा मार्ग सुकर झाला. भविष्यातही पोरवाल महाविद्यालय बरेच गुणवंत विद्यार्थी घडवतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
महाविद्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. एस. एस. धोंडगे यांनी श्री.नेमकुमारजी पोरवाल हे विलक्षण दूरदृष्टी लाभलेले व्यक्तिमत्व होते. त्यामुळेच त्यांनी या महाविद्यालयाला जे-जे देता येईल ते-ते देण्याचा प्रयत्न करीत संस्थेचा सतत सर्वांगीण विकास केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.अशोककुमार भाटिया यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून श्री.नेमकुमारजी यांच्या आठवणींना उजाळा देताना म्हटले की, त्यांनी पोरवाल महाविद्यालयाच्या प्रती आपली आगळीवेगळी दृष्टी ठेवली होती. प्राध्यापकांनी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाच्या प्रती एकनिष्ठ राहून आपल्या महाविद्यालयाला उत्तरोत्तर कशा पद्धतीने उत्कृष्ट बनविता येईल याची स्वप्न बघावे. अशी त्यांची भावना होती असे सांगितले. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आजपर्यंत उत्कृष्ट असे अध्यापन असून येणाऱ्या काळात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमधून आय.ए.एस व आय.पी.एस. विद्यार्थी तयार व्हावे अशी भावना व्यक्त केली.
यावेळी वाणिज्य विभागाच्या अंशकालीन प्राध्यापिका डॉ.मोनिका मानापुरे यांना आचार्य पदवी तर शिक्षकेत्तर कर्मचारी विलास पजई यांनी राज्यस्तरीय महाराष्ट्र अथलेटिक्स स्पर्धेत रजत आणि कास्य पदक मिळवल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वरिष्ठ महाविद्यालयाच्या पदव्युत्तर विभागातून प्रांजल साखरे, पदवी मधून आफिफा साफिया, कनिष्ठ महाविद्यालयातून मधून फजिला जमाल यांना सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपप्राचार्य प्रो. डॉ. मनिष चक्रवर्ती, प्रो. डॉ. रेनू तिवारी, प्रो. डॉ. स्वप्निल दहात, प्रो. डॉ. संजीव शिरपुरकर, डॉ. तुषार चौधरी, प्रो. कप्टन मोहम्मद असरार, डॉ. जितेन्द्र सावजी तागडे, डॉ. विनोद शेंडे, डॉ. तारुण्य मुलतानी, डॉ. गिजाला हाश्मी, डॉ. रश्मि जाचक, डॉ. महेश जोगी, डॉ. विकास कामडी, प्रवीण अम्बादे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रो. डॉ. इफ्तेखार हुसैन यांनी तर उत्कृष्ट असे सूत्रसंचालन डॉ. समृद्धी टापरे व डॉ.नीता वानखेडे यांनी केले.