तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज द्या – ॲड. यशोमती ठाकूर
तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज द्या – ॲड. यशोमती ठाकूर
अमरावती/E T News
अमरावती ग्रामिण विभागा अंतर्गत येणारे अमरावती ग्रामिण उपविभाग व भातकुली उपविभागातील सर्व तांत्रिक अधिकारी व कर्मचारी यांची आढावा बैठक शुक्रवारी बचत भवन येथे पार पडली. या आढावा बैठकीत
महावितरणच्या भोंगळ कारभाराबद्दल शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या तक्रारी महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर मांडून त्याबाबतचा आढावा घेण्यात आला. मुख्य म्हणजे या शेतकऱ्यांना दिवसा किमान आठ तास वीज मिळावी ,अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. ही मागणी पूर्ण करण्यात यावी, अशा सूचना आपण महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती काँग्रेसच्या माजी मंत्री आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.
भातकुली व अमरावती तालुक्यातील तालुक्यातील महावितरणचा ढेपाळलेला कारभार आणि महावितरण विरोधात तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारीची दखल घेत आ. ॲड. यशोमती ठाकुर यांनी शुक्रवारी बचत भवनच्या सभागृहात महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली.
यावेळी पूर्णानगर, वातोंडा, हिंमतपूर, वाठोडा शुक्लेश्वर या मुख्य गावांमधील कृषीपंप धारक शेतकऱ्यांना त्रास होता कामा नये तसेच या भागात छोट्यामोठ्या कामांमध्ये महावितरण कडुन हयगय झाल्यामुळे घरघुती विज ग्राहकांना मनस्ताप होत असुन त्यांच्या समस्यांचे दिवाळीपूर्वी निरसन करण्याच्या स्पष्ट सुचना यावेळी आमदार ठाकूर यांनी केल्या यावर श्री. आलेगावकर यांनी स्वतः जातीने लक्ष घालुन या सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येईल असे सांगीतले.
याप्रसंगी आ.ॲड.यशोमती ठाकुर यांच्यासह महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता अनिरुद्ध आलेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रत्येक गावातून आलेल्या शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त करत आपापल्या गावातील महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला.तसेच तालुक्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा आणि महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या कार्यकारी अभियंता अनिरुद्ध आलेगावकर यांच्या समोर मांडल्या. त्यावर स्थानिक अधिकाऱ्यांची कानउघाडणी करून तालुक्यातील समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यात येईल, असे अनिरुद्ध आलेगावकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आश्वस्त केले.
महावितरण कंपनीकडुन शेतकऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस सकाळी व चार दिवस रात्री विद्युत पुरवठा करण्यात येतो.परंतु रात्रीचे सिंचन करणे अतिशय जोखमीचे असल्याने रात्री ऐवजी दिवसा विद्युत पुरवठा करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. या मागणीचा तातडीने पाठपुरावा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना ॲड.ठाकूर यांनी यावेळी दिल्या. यावेळी अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड, अमरावती कृऊबासचे सभापती हरिश मोरे, अमरावती तालुका कॉंग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष अमित गावंडे, भातकुली तालुका कॉंग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष श्रीकांत बोंडे, माजी सभापती जयंत देशमुख, जिल्हा अल्पसंख्याक सेल चे अध्यक्ष मुक्कद्दरखा पठाण, अभय देशमुख,संजय खोडस्कर, पंकज देशमुख, सतीश गोटे, दिलिप सोनोने, गजानन देशमुख, वीरेंद्र जाधव, शैलेश काळबांडे, प्रभाकर धंदर, आशुतोष देशमुख, राम खरबडे, अलीमभाई, सुनिल अग्रवाल, जयंत गडलिंगे, मधुकर जवंजाळ, रोशन झासकर, अभय वंजारी, प्रदीप शेंडे, अंकुश जुनघरे, विजय मुंडाले, प्रवीण भुगुल, गिरीश देशमुख, निलेश कडू, अमोल महात्मे, सरपंच रिझवानभाई आदींची उपस्थिती होती.