सत्तेच्या लालसेपोटी नेत्यांचा असंतोष : विधिमंडळ अधिवेशन विशेष

सत्तेच्या लालसेपोटी नेत्यांचा असंतोष : विधिमंडळ अधिवेशन विशेष
मंत्रिमंडळ विस्तारानंतर तिन्ही पक्षातील काही ज्येष्ठ आमदारांना डावलल्याने नाराजी व्यक्त करत काही नेत्यांनी अधिवेशन सोडून सरळ पळ काढला. मंत्रिमंडळ विस्तारात नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याने ज्येष्ठांनी नाराजी व्यक्त करत असंतोष प्रगट केला..
मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीतील तीनही पक्षांमध्ये असंतोषाचा भडका उडाला असून मंत्रीपद न मिळालेले नेते संतप्त झाले आहेत. छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली. भुजबळांनी सोमवारी अनेकवेळा प्रसारमाध्यमांसमोरच त्यांची नाराजी प्रकट केली. “ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षातून लढला, त्यांना मंत्रीपद मिळते. मला मंत्रीपद मिळणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला आश्वासन दिलं होतं, तरी मला मंत्रिपद मिळालं नाही, पण मी नाराज नाही”, अशी भावना सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. तर, “मराठा समाजाचे नेते मनोज जरागे यांच्याशी संघर्ष केल्याचे बक्षीस मिळाले”, अशी खंत व्यक्त करून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नागपूर अधिवेशन सोडून नाशिकला रवाना झाले.
खर तर नाराजी होण्याचे काहीच कारण नाही…मंत्रिपद न मिळाल्याने इतका असंतोष का? जुण्यानांच संधी द्यायची का? मग नव्यांना संधी कधी मिळणार? इतके वर्ष सत्तेत राहून मंत्रिपद भुषविल्यानंतर सत्तेची हाव सोडायला हे नेते तयार नाहीत..पक्षाची शिस्त पाळायला हे नेते तयार नाही..तिकीट मिळाली नाही तर नाराजी, निवडून आल्यानंतर मंत्रिपद मिळाले नाही तर असंतोष व नाराजी प्रगट करायची.पक्षाने या नेत्यांना मोठे केले..सत्ता दिली.पैसा मिळाला.आता हेच नेते पक्ष शिस्त पाळायला तयार नाही..
जगातील कोणत्याही देशाच्या नेत्यांना कदाचित भारतातील नेत्यांइतके सत्तेचे प्रेम नाही. भारतातील नेत्यांना कोणत्याही किंमतीत सत्तेत राहायचे आहे..काहीही करून सत्तेत राहायचे आहे. हे आमदार, खासदार आणि मंत्री ते मुख्यमंत्री आणि पंतप्रधान या सर्वांचा सारखेच लागू होते. सत्तेबद्दलच्या या वेडाचे मुख्य कारण म्हणजे सत्ता आणि संपत्ती जमा करणे. पैसा आणि सत्तेसाठी नेते लोकांची सेवा करत असल्याचा आव आणतात मात्र सत्तेच्या माध्यमातून हे नेते मलिदा
लाटतात.मतदारांनी या नेत्यांवर विश्वास व्यक्त करत यांना निवडून दिले.ज्या मतदारांच्या भरोशावर हे लोकप्रतिनिधी निवडून आले..त्या मतदार संघाप्रती व मतदारांप्रती विश्वास कायम राखण्या ऐवजी मंत्री पद न मिळाल्याने नाराजी व्यक्त करून अधिवेशनाला दांडी मारली..शिवसेनेचे (शिंदे) ज्येष्ठ नेते तानाजी सावंत नागपूरमधील हिवाळी अधिवेशून अर्ध्यात सोडून ते पुण्याला रवाना झाले. आता दिले तरी मंत्रीपद स्वीकारणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे (शिंदे) नेते विजय शिवतारे यानी व्यक्त केली. ज्येष्ठ भाजपा नेते संजय कुटे यांनीही संताप व्यक्त केला आहे. त्यांनी समाजमाध्यमांवर त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
मंत्रिपद न मिळाल्यामुळे अनेकांनी त्यांची नाराजी उघड केली. मुनगंटीवार व भुजबळांसह इतरही अनेक नेते नाराज आहेत. त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून व आपल्या कृतीतून त्यांची नाराजी प्रकट केली आहे.
भाजपच्या मित्र पक्षांमध्ये नाराजी
भाजपचे मित्र पक्षांमध्ये देखील नाराजी बघायला मिळत आहे. प्रथम केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली. याशिवाय युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा देखील नाराज असल्याचं समोर आलं आहे. आता विधानपरिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. नांगरणीसाठी जी बैलगाडी वापरली गेली ती बैल बाजूला करुन ठेवली असल्याची खंत सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली आहे.
युवा स्वाभिमान पक्षाचे बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा देखील नाराज असल्याचं समोर आलं आहे. ते अधिवेशन सोडून अमरावतीला परतल्याची माहिती आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत देखील मंत्रिपद न मिळाल्यानं खदखद पाहायला मिळाली. नरेंद्र भोंडेकर यांनी वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देईन, असं म्हटलं. प्रकाश सुर्वे यांची नाराजी देखील लपून राहिली नाही. तानाजी सावंत देखील नाराज असल्याच्या चर्चा होत्या, मात्र त्यांच्या कार्यालयानं तानाजी सावंत आरोग्याच्या कारणामुळं नागपूरहून निघाल्याचं म्हटलं.
प्रा डॉ सुधीर अग्रवाल वर्धा
९५६१५९४३०६