लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी विरोधक गेले न्यायालयात – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी विरोधक गेले न्यायालयात – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
वरूड/E T News
नरेंद्र मोदी तिसऱ्यादा देशाचे पंतप्रधान झाले. विरोधकांनी सविंधानाचा खोटा प्रचार करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात कमी जागा मिळाल्या यमाउळें थोडी निराशा झाली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ५० वर्षाचे आरक्षण दिले होते मात्र अटलबिहारी वाजपेयी यांनी पुन्हा आरक्षण सुरु ठेवले आणि ते पुढे मोदी यांनी चंद्र सूर्य असे पर्यंत राहणार असल्याची घोषणा केली.तर हिंदु समाजाला नष्ट करन्याचा प्रयत्न विरोधक करीत असून हिंदुह्रिदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे हिरव्या पानाखाली नाचत असल्याचा घणाघात केला.लाडकी बहिन योजना क्रॉग्रेस वाले बंद करण्यासाठी न्यायलयात गेले.योजना आम्ही सुरु केली पोटात विरोधकांच्या का दुखत असा प्रतिसावाल केला.असे स्थानिक रामदेव बाबा सभाग्रुहात आयोजित भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.पुढे म्हणाले कि,आम्ही केलेली आयोजनेचा अपप्रचार करीत असून महिलेला ५० टक्के मध्ये प्रवास योजना सुरु केल्याने महिला प्रवासाला लागल्या परंतु विरोधकांनी त्याचेही भांडवल केले. सीलेडरचे भाव वाढले असा अपप्रचार सुरू असताना महिले करीता ३ सिंलेडर मोफत देण्याचे ठरविले.काँग्रेसच्या काळात महाग होते.तर युवकाला रोजगाराची संधी देऊन रोजगार दिला तर मोदी यांनी शेतकरी सन्मान योजनेत केंद्र सरकार ६ हजार रुपये आणि राज्यसरकार ६ हजार रुपये असे प्रतिवर्ष शेतकºयाला १२ हजार रुपए मदत करीत असल्याने पुढे भाजप महायुतीची सत्ता येईल . तसेच वारवांर विरोधकांनी खोट बोलल्याने खोटा प्रचार केल्याने आपल्याला नुकसान करावे लागते.आता राहुल गांधी,शरद पवार,उद्धव ठाकरे यांच्यावर जनतेचा विश्वास राहिला नाहि असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.यावेळी अधिवेशनाच्या व्यासपीठावर प्रदेश सचिव आ.सुखचैन संचेती,जिल्हाध्यक्ष खा.अनिल बोन्डे,माजी खा.नवनीत राणा,आ. प्रताप अडसड,माजी आमदार रमेश बुंदेले,केवलराम काळे, प्रभुदास भिलावेकरमाजाची अध्य्क्ष दिनेश सूर्यवंशी,निवेदिता दिघडे,प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी,जयंत डेहनकर,प्रशांत देशपांडे,डॉ.वसुधा बोन्डे,राजेश वानखडे,गोपाळ चंदन,रावसाहेब रोठे,प्रवीण तायडे, ज्योती सोळंके,चेतन गावंडे,नितीन गुडधे,विवेक गुल्हाने, रेखा मावस्कर,विलास कविटकर,संगीता शिंदे, माधुरी मेटांगे सह आदी उपस्थित होते.यावेळी उपमुख्यामंत्री यांचे हस्ते दिव्यांगांना १६ तीनचाकी वाहनाचे वाटप तर कृषी पुरस्कारप्राप्त शेतकºयांचा सत्कार करण्यात आला.अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात नरेंद्र मोदी यांच्या अभिनन्दनाचा प्रस्ताव पारित करण्यात आला.तर महाराष्ट्रात भाजपाचे मुखमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना करण्याचं अनिर्धार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक खा.अनिल बोन्डे यांनी संचालन राजकुमार राऊत आणि आभार अंजली तुमडाम यांनी केले.
————