समाजात ज्ञानाचा वृक्ष लावणाऱ्या शिक्षकांना पगार द्या : निषाद पार्टी महिला मोर्चाची मागणी

समाजात ज्ञानाचा वृक्ष लावणाऱ्या शिक्षकांना पगार द्या
निषाद पार्टी महिला मोर्चाची मागणी
नागपूर/विशेष प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिनी प्रत्यक समाजात ज्ञानाचा वृक्ष लावणाऱ्या शिक्षकांना मागील चार महीन्या पासून काही स्तर सोडले तर नियमित पगार मिळाले नाही. विशेष करून नागपूर विभागात प्रत्यक अधिकारी शासन च्या धरपकडी मुळे घाबरला आहे.भीती एवढी आहे की साफ सूत्री छबि असणाऱ्या शिक्षकांचे पगार बिल चार चार महिन्या पासून अजून पास झाले नाही.ज्या प्रकारे वृक्षाला दोन दिवस पाणी मिळाले नाही तर तो सुखतो तसेच आज चार महिन्या पासून पगार न मिळनाऱ्या शिक्षकांचे हाल झाले आहे. एक एक रुपया करिता शिक्षकांना तरसावं लागत आहे.
निषाद पार्टी महिला मोर्चा नागपूर च्या उपाध्यक्षा सीमा गौर नी सांगितले की आज शिक्षण क्षेत्रात शिकला सवरलेला समझदार कोणताही व्यक्ती नौकरी करायला तैयार नाही कारण या क्षेत्रात शोषण तसेच भरपूर अडचणी आहे. वर्षो वर्षा पासून हजारो शिक्षक सरकारी अनुदाना करिता तरसत आहे.हजारों शिक्षक आर्थिक तंगी मुळे आत्महत्या करुण चुकले आहे परंतु आजपर्यंत कोणतीही सरकार शिक्षकांना योग्य न्याय देऊ सकली नाही परंतु एकनाथ शिंदे यांच्या कार्यास पाहता शिक्षक त्यांच्या कडे आशेने पाहत आहे म्हणून निषाद पार्टी महिला मोर्चानी जिल्हा अधिकारी नागपूर मार्फ़त शिक्षकांना नियमित पगार देने व सरकारी अनुदान देन्या ची मागणी केली आहे.निषाद पार्टी महिला मोर्च्यास विश्वास आहे की उपमुख्यमंत्री च्या रूपात नव्हे तर एक तड़फदार नेता असल्यामुळे शिक्षकांन सोबत न्याय करणार.