पोरवाल महाविद्यालयात अत्याचार विरोधी जनजागृतीचे आयोजन
पोरवाल महाविद्यालयात अत्याचार विरोधी जनजागृतीचे आयोजन
कामठी/ E T News
कामठी येथील पोरवाल महाविद्यालयात अंतर्गत तक्रार निवारण समिती मार्फत कार्यस्थळी होणारे महिलांचे लैंगिक व लिंगभेद अत्याचार विरोधी संरक्षण जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या जनजागृती कार्यक्रमात वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील जवळपास ५०० विद्यार्थ्यांनी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.ही जनजागृती रॅली वरिष्ठ महाविद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात/ मैदानावर आयोजित करण्यात आली. या प्रसंगी पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी एका पथनाट्य सदर केले.या पथनाट्यात सुहानी लेंडे,वैधवी काकडे, अक्षरा रंगारी, प्रियांशी कडू,श्रेया हिवळे,श्रेया वैद्य महील आलंम आदी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.जनजागृती रॅलीला महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. रेणू तिवारी यांनी संबोधित केले. महिलांवर होणारे अत्याचार हा आजही जगातील विकसनशील देशांसह प्रगत देशांमध्ये संवेदनशील मुद्दा आहे. कधी परंपरांच्या नावाखाली तर कधी धार्मिक चालीरितींच्या नावाखाली महिला आणि मुलींवर अत्याचार होत आहे, त्यामुळे जगातून महिला अत्याचारांचे हे सत्र कधी संपुष्टात येईल हे ठामपणे सांगणे कठीण आहे. महिला अत्याचार विरोधात कठोर कायदे करण्यात आले असले तरी त्याची तातडीने अंमलबजावणी होत नसल्यामुळे अनेक गुन्हेगार कायद्याच्या कचाट्यातून सुटतात. कायदेशीर अंमलबजावणी करावी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी याबाबतीत जागृत रहावे, मुलींनी प्रतिकार करावा असे आवाहन प्रा.डॉ.रेणू तिवारी यांनी केले. कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉ. सुधीर अग्रवाल यांनी महाविद्यालयीन तरुणांना संबोधित करताना तरुणच समाजाची दशा आणि दिशा बदलू शकतात. महाविद्यालयीन विद्यार्थी हा उद्याचा भविष्याचा उद्गाता आहे, व देशाचा नागरिक आहे. तरुणांवर फार मोठी जबाबदारी आहे. तरुणांनी विधायक कार्यात स्वतःला वाहून घ्यावे व जिथे कुठे अत्याचार होत असेल त्यावेळी त्याचा प्रतिकार करावा असे आवाहन केले.सोबतच मुलींनी अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवावा. पालक आणि शिक्षकांशी संवाद साधावा, सोशल मीडियाचा वापर कमी.करावा,विद्यार्थिनींनी समूहात राहावेअभ्यासावर लक्ष केंद्रित करावे असे आवाहन केले. हा कार्यक्रम यशस्वी रीतीने घडवून आणण्यासाठी अंतर्गत तक्रार निवारण समितीचे संयोजिका प्रा डॉ रेणुका रॉय..प्रा डॉ शेंडे यांचे सहकार्य व समिती मधील इतरांचे सहकार्य लाभले…कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापिका डॉ.समृध्दी टापरे यांनी केले.