नागपूर येथे आरक्षण हक्क परिषदेची सभा
.नागपूर/E T News
रविवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 ला एम. एल. ए. हॉस्टेल सिविल लाईन नागपूर येथे भोई गौरव मासिकाचे मुख्य संपादक श्री. चंद्रकांत लोणारे व भोई समाज पंच कमिटीचे माजी अध्यक्ष श्री किशोरलालजी करतार यांचे अध्यक्षतेखाली व निषाद पक्षाचे श्री.कैलास केवदे
यांचे प्रमुख उपस्थितीत आरक्षण हक्क परिषदेची पहिली सभा संपन्न झाली. या सभेला विदर्भाच्या बहुतेक जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते.विविध संघटनेचे पदाधिकारी महिला व पुरुष ज्यांना आरक्षणाविषयी तळमळ आहे असे सामाजिक जाणिवेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंगणघाट येथील श्री सुनीलजी ढाले यांनी स्वतः पुढाकार घेऊन या सभेचे आयोजन केले होते.व त्यांना प्रा.राहुल गौर,सचिन वाघाडे, अमोल बावणे या मंडळींनी विशेष सहकार्य केले.
सूत्र संचान प्रा.राहुल गौर यांनी केले. प्रस्ताविक सुनील ढाले यांनी केले व त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून आपल्या भटक्या विमुक्त समाजाचे आतापर्यंत 5 आयोग स्थापन झाले होते व या पाचही आयोगाणी या समाजाला S. C. या प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी केंद्र सरकारला शिफारस केली आहे. परंतु केंद्र सरकारने आत्तापर्यंत याकडे लक्ष दिले नाही व या शिफारशी लागू केल्या नाही. त्यासाठी आपणास संयुक्तपणे संघर्ष करण्याची गरज आहे व त्यासाठीच या आरक्षण हक्क परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. अशी माहिती आपल्या प्रास्ताविकातून सुनीलजी ढाले यांनी दिली.
या सभेत N T( बी) या प्रवर्गातूनच आरक्षणाचा टक्का वाढवून मागवा की एस.सी. प्रवर्गातून नव्याने मागणी करावी या विषयावर जवळपास तीन तास विचार मंथन झाले.
प्रत्येकाने आपले विचार व्यक्त केले. जवळपास उपस्थित सर्वांनीच चर्चेत सहभाग घेतला. खालील मान्यवर या सभेला उपस्थित होते. मनोज बावणे हिंगणा,सुग्रीव सहानी नागपूर, नथुलाल गौर नागपूर,राजू लांडगे चंद्रपूर,राहुल पडाल यवतमाळ,पुंडलिक बावनकुळे नागपूर,प्रमोद बावणे नागपूर,प्रवीण कोल्हे नागपूर,भूषण कुरवाडे वरूड,मोहन मोहड चंद्रपूर,सौ कोमल बावणे बटिबोरी,सीमा गौर नागपूर, कला नायक नागपूर,मनीष बाथो नागपूर,सरस्वती जेवदे अमरावती, विजय केवट चंद्रपूर, आशा निषाद चंद्रपूर,भाऊराव निमसडे नागपूर,राजू निमसडे नागपूर,किशोर कोल्हे नागपूर,किशोर बावणे नागपूर.
उपस्थितांपैकी 60 टक्के लोकांनी एन टी (बी) या प्रवर्गातूनच आरक्षणाची टक्केवारी वाढून घ्यावी व त्यासाठी संघर्ष करावा असे मत व्यक्त केले. तर 40 टक्के लोकांनी आपण एस.सी. मधूनच मागणी करायला पाहिजे असाही विचार मांडला.
एस. सी. मधून जर आरक्षण मागितले तर याचा फायदा केंद्रस्तरावर होईल व एन. टी. बी मधूनच टक्केवारी जरी वाढली तर त्याचा फायदा फक्त महाराष्ट्रातच होईल. हाही विचार काही वक्त्यांनी बोलून दाखवला.*
एस. सी. मधून जर आरक्षण मागितले तर आपल्याला राजकीय आरक्षणाचा सुद्धा फायदा होऊ शकतो यावर सुद्धा विचारमंथन झाले. काही कार्यकर्त्यांनी एन.टी मधून जर आरक्षणाची टक्केवारी वाढवून मागावी व त्यासोबतच राजकीय आरक्षणाची सुद्धा मागणी करण्यात यावी असा विचार व्यक्त केला. कारण आपल्या समाजाला राजकीय आरक्षण नसल्यामुळे आपले राजकारणात प्रतिनिधि नाही या विषयावर बऱ्याच वक्त्यांनी आपले मत स्पष्ट केले.
जोपर्यंत सत्तेत आपला सहभाग होत नाही तोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होणार नाही म्हणून त्याकरिता सत्तेत सहभागी होणे काळाची गरज आहे व त्यासाठी आपल्या समाजातील लोकांनी राजकारणात सक्रिय होणे गरजेचे आहे.आमदार खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे व आपला एक तरी प्रतिनिधी दिल्लीत व महाराष्ट्रात असावा या विषयावर सुद्धा सर्वांनीच आपले विचार मांडले.
आरक्षण हकक परिषदेची सभा प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात घेण्यात यावी.
या विषयांवर जोर देण्यात आला यासाठी मोठ्या प्रमाणत समाज जागृती करणे काळाची गरज आहे यावर सुद्धा या बैठकीत मंथन झाले.
प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात निवेदन देण्याचे सुद्धा ठरले.आंदोलन, मोर्चे उपोषण या सर्व लोकशाही अधिकाराचा उपयोग कसा करता येईल यावर सुद्धा सविस्तर चर्चा झाली.
सभेचे अध्यक्ष चंद्रकांत लोणारे व किशोरलालाजी करतार यांनी वेगवेगळे उदाहरण देऊन आरक्षण कस मिळवता येईल त्यासाठी निश्चित धोरण कसे आखले पाहिजे कायद्याच्या चौकटीत राहून आपली मगणी सरकार दरबारी कशी लावून धरता येईल या विषयी मार्गदर्शन केले.यासाठी आपल्या समाजातील काही वकिलांनी सुद्धा पुढाकार घ्यावा असाही सल्ला दिला.जे प्रत्यक्ष मैदानात लढू शकत नाही त्यांनी या आंदोलनाला आर्थिक सहाय्य करावे. असे ठरले तसेच संपूर्ण अभ्यास पूर्ण निवेदन तयार करण्यात यावे व त्याकरिता जुने पुरावे गोळा करावे या पद्धतीच्या सूचना करण्यात आल्या ही लढाई हेवे दावे, लहान मोठे, हा भेद विसरून एकत्रित पणे लढावी यावर विशेष जोर देण्यात आला.आभार राहुल गौर यांनी मानले