Breaking
ब्रेकिंग

यंदा कापूस उत्पादकांचे हाल संपता संपेना ! मजुरांअभावी कापूस वेचनीवर संक्रांत

0 1 8 5 2 1

यंदा कापूस उत्पादकांचे हाल संपता संपेना !

मजुरांअभावी कापूस वेचनीवर संक्रांत

दोन वेचनीचा केला एकच वेचा

(रंगराव कुळसंगे)

राजुरा : कापूस शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे.त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस पिकांची लागवड करतात.यंदा बाहेरील मजूर कापूस वेचनिला आले नाही.त्यामुळे वेचणी अभावी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे हाल होत आहे.काही शेतकऱ्यांना दोन वेळेची कापूस वेचणी एकाच वेळी करण्याची पाळी आली.त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे.त्यामुळे लाखमोलाचा कापूस अजूनही झाडावरच आहे.

यंदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा संपायला तयार नाही.कधी निसर्गाची उदासीनता तर कधी शासनाचे शेतकरी विरोधी धोरण कास्तकारांना मारक ठरले आहे.उत्पादन खर्च जास्त व उत्पादन कमी अशी शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे.शेतकरी दिवसेंदिवस महागाईच्या तडाख्यात भरडला जात आहे.नापिकिने शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. शेतकऱ्यांना कापूस वेचणी करायला मजूर मिळणे कठीण झाले आहे. कापूस वेचणी करण्यासाठी अजूनही मजूर मिळत नसल्याने झाडावरच मातीमोल होण्याचा धोका निर्माण झाला आहे.कापूस वेचणी करायला मजूर मिळत नसल्याने मजुरांअभावी शेत कापसाचे पांढरे रान झाल्याची स्थिती राजुरा तालुक्यात असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.कापूस वेचनीला मजूर मिळाले नाही.त्यामुळे काही शेतकऱ्यांनी दोन वेळेची कापूस वेचणी एकाच वेळी करण्याची पाळी आली.आता कापूस झाडावरच हलका आल्याने मजूर कापूस वेचणी करायला तयार नाही.कापूस उत्पादकांचे हाल यंदा संपायला तयार नसल्याने शेतकरी काकुळतीला आले आहे.

दरवर्षी बाहेरील मजूर कापूस वेचणी करायला येतात.मात्र यंदा पाहिजे त्या प्रमाणात मजूर कापूस वेचनिला आले नाही.त्यामुळे मजुरांचा तुटवडा जाणवत असून यंदा जादा पैसे मजुरी देऊन कापूस वेचणी करावी लागत आहे.

प्रमोद लांडे, कापूस उत्पादक शेतकरी, गोवरी

 

राजुरा तालुक्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे.दिवसेंदिवस मजुरांची टंचाई जाणवत असल्याने शेती करणे कठीण झाले असून कापूस वेचनीला मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मजुरांच्या शोधत फिरावे लागत आहे.

चेतन बोभाटे, युवा प्रगतिशील शेतकरी 

११ रुपये किलो प्रमाणे कापूस वेचणी…..

कापूस पिकावर होणारा खर्च मोठा आहे.सुरवातीपासून शेतकऱ्यांना कापूस पिकांवर जास्त खर्च करावा लागतो.त्या तुलनेत कापूस शेतकऱ्यांना परवडत नाही.यंदा कापूस वेचणी करायला मजूर मिळत नसल्याने ११ रुपये प्रति किलो प्रमाणे कापूस वेचणी करावी लागत आहे.किंवा बाहेरून ऑटोने मजूर आणून कापूस वेचणी करावी लागत आहे.

5/5 - (1 vote)

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 5 2 1

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे