Breaking
ब्रेकिंग

महाराष्ट्रातील १ लाख बेपत्ता महिला व मुली अखेर गेल्या कुठे? तपास यंत्रणा अपयशी / लेखक : संतोष लांजेवार

0 1 8 5 2 1

महाराष्ट्रातील १ लाख बेपत्ता महिला व मुली अखेर गेल्या    कुठे ? त्यांना शोधण्यात तपास यंत्रणा अपयशी                       

– लेखक                            संपादक संतोष लांजेवार

बदलापूर ते बंगालच्या घटनेने संपूर्ण देश खवळून निघालेला आहे. बद‌लापूर येथे चार वर्षाच्या चिमुकलीवर तर कोलकात्याच्या डॉक्टर महिलेवर पाशवी अत्याचाराने हे निदर्शनास आणू‌न दिले आहे की आपल्या देशातील महिला अद्यापही सुरक्षित नाहीत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

केरळ राज्यातील मुली बेपत्ता झाल्यानंतर लव जिहादचे प्रकरण समोर आले. यापेक्षाही अधिक भयानक म्हणजे महाराष्ट्रातील १ लाख मुली व महिला बेपत्ता झालेल्या आहेत. त्यांचा शोध लावण्यात तपास यंत्रणा अद्यापही अपयशी ठरलेली आहे. असेच जर सुरु राहिले तर पुढे आपल्या माता भगिनीही सुरक्षित राहणार नाही. वेळीच या ज्वलंत प्रश्नाकडे गांभीर्याने बघण्याची आता वेळ आली आहे.

मागील वर्षी एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटाने अख्ख्या भारतीयांचे डोळे उघडले. ती कथा सत्य घटनेवर आधारित होती. त्या चित्रपटाने संपूर्ण देशाला केरळमध्ये चालेल्या ‘हिंदू, आणि ख्रिस्ती मुलींचे कशाप्रकारे इस्लाममध्ये धर्मांतर होते आहे यावर प्रकाश टाकून, हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी आणि लैंगिक तस्करी करून इस्लामिक दहशतवादी संघटनांमध्ये पाठवण्यासाठी कशा प्रकारे लव्ह जिहादचा वापर केला जात आहे ते दाखविले. या चित्रपटामध्ये दाखवल्याप्रमाणे, केरळमध्ये सुमारे ३२ हजार महिलांचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आले आणि त्यातील अनेकांना इसिस शासित सीरिया देशात नेण्यात आले.

आता असेच काहीसे चित्र महाराष्ट्रामध्ये सुद्धा बघायला मिळत आहे केरळ प्रमाणेच महाराष्ट्र मधून काही हादरवून टाकणारे आकडे समोर आले आहेत.

2019 मध्ये 35 हजार 990 महिला, 2020 मध्ये 30 हजार 089 आणि 2021 मध्ये 34 हजार 763 महिला बेपत्ता झाल्याची नोंद झाली असून त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. तरुणी बेपत्ता होण्यात अहिल्यानगर, मुंबई, पुणे, पुणे ग्रामीण, नाशिक, पिपरी चिंचवड, कोल्हापूर, नागपूर, नागपूर शहर, मीरा भाईदर, जळगाव व यानंतर चंद्रपूर १२ व्या क्रमांकावर आहे. केरळ प्रमाणेच महाराष्ट्र मधून काही हादरवून टाकणारे आकडे समोर आले आहेत.

महाराष्ट्रामध्ये जवळ जवळ दर महिन्याला किमान २० ते ३० लव्ह जिहादच्या केसेसची नोंदणी होती. हे केवळ नोंदणी झालेल्या केसेसचे आकडे आहेत, अशा बऱ्याच घटनांची नोंद देखील होत नाही.

विशेष म्हणजे, या स्त्रिया महाविकास आघाडी सरकारच्या काळात बेपत्ता झाल्याचेही उघडकीस आले आहे. त्यांचा थांगपत्ता लावण्यात सरकार अपयशी ठरली असून या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे, हे

मुली बेपत्ता झाल्याचे कसे उघडकीस आले

महाराष्ट्रातील ‘१ लाख’ हा आकडा सरकारच्या कोषागार विभागात काम करणाऱ्या शहाजी जगताप यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्याच्या दरम्यान समोर आला आहे. अर्थात यात लव्ह जिहाद हे एकमेव कारण जबाबदार नसले तरी परंतु बहुसंख्य प्रमाणात हेच कारण जबाबदार असल्याचे दिसत आहे.

सरकारच्या कोषागार विभागात काम करणाऱ्या शहाजी जगताप या सांगलीतील माजी सैनिकाने ही जनहित याचिका दाखल केली आहे. जगताप यांची मुलगी विज्ञान शाखेच्या तिसऱ्या वर्षाला शिकत असताना डिसेंबर २०२१ मध्ये बेपत्ता झाली. जगताप यांनी सांगलीतील संजय नगर पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. मात्र, पोलीस त्यांच्या मुलीचा शोध घेऊ शकले नाहीत.

याच दरम्यान जेव्हा मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्या कुटुंबावर खूप आघात झाले आणि कुटुंबाला खूप त्रासाला सामोरे जावे लागले.

मुलीचा शोध घेत असताना तिने इस्लाम धर्म स्वीकारून लग्न केल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यावेळी ती सुद्धा कोणा ‘अब्दुल’ च्या “लव्ह जिहाद” च्या जाळ्यात अडकली असल्याचे तिच्या कुटुंबाच्या समोर आले. तिचा शोध लागल्यानंतर सुद्धा त्यांच्या पोटच्या मुलीला भेटायला शहाजी जगताप यांना मोजून दोन मिनिट देण्यात आले होते. त्यानंतर आजच्या तारखे पर्यंत ती कुठे आहे आणि तिने कुटुंबीयांशी संबंध का तोडले याची तिच्या कुटुंबाला माहिती नाही.

मुलगी सज्ञान असल्यामुळेच पोलीस तिला घरी आणण्यासाठी कोणतेही प्रयत्न करीत नाहीत व त्या मुलावर आणि त्याच्या घरच्यांवरती सुद्धा कुठल्याही प्रकारचा गुन्हा किंवा कारवाई केली नाही. या उलट पोलिसांनी मुलीला तिचे जीवन तिला हवे तसे जगायचे असल्याचेही आपल्याला कळवले, असे बेपत्ता मुलीच्या कुटुंबाचे म्हणणे आहे.

मध्यंतरी एक बातमी मंचर मधून समोर आली होती, जिथे एका हिंदू दाम्पत्याला तब्बल ४ वर्षानंतर त्यांच्या मुलीचा शोध लागला, तिला एका मुस्लिम व्यक्तीने ‘लव्ह जिहाद’ च्या जाळ्यात अडकवून, तिच्याशी जबरदस्ती विवाह करून, तिचे धर्मांतर केले होते. जेव्हा आई वडील तिला भेटले, तेव्हा तिची परिस्थिती इतकी दयनीय होती की स्वतःचे मानसिक संतुलन गेल्यामुळे, ती स्वतःच्याच वडिलांना पाहून घाबरत होती. या घटने वरूनच कळून येते की, अशा किती घटना असतील जिथे , बेपत्ता मुलींना पळवून नेऊन त्यांचे धर्मांतर केले जात आहे.

हे लक्षात घेणे खूप महत्त्वपूर्ण आहे की २०१९ ते २०२१ दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार होते आणि तो कोविडचा काळ होता. या महिलांचा शोध घेण्यासाठी प्रभावी यंत्रणा स्थापन करण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत, अशी मागणीही याचिकाकर्त्याने केली आहे.

महिला बेपत्ता होण्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही, असा आरोप याचिकाकर्त्याने वकील मंजिरी पारसनीस यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत केला आहे.


—————

 

 

 

3.5/5 - (2 votes)

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 5 2 1

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

Related Articles

One Comment

  1. एक लाखाहून अधिक महिला पुरोगामी महाराष्ट्रातून गायब झाल्या आहेत.हे कळून धक्काच बसला.१८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर आईवडीलांचा मुलामुलींवर काहीही अधिकार रहात नाही.ते कायद्याच्या भाषेत स्वतंत्र होतात.परंतु प्रत्यक्षात स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठीचा त्यांचा संघर्ष सुरू असतो. याचा विचार करणे गरजेचे झाले आहे. मुलांवरील आईवडीलांचा अधिकार शाबूत असणे आवश्यक झाले आहे.यासाठीचा कायदा पास व्हायला पाहिजे. वाढवडीलांच्या
    संपत्ती वरील अधिकार शाबूत आहेत. मग हे कां नाही ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे