जम्मूत भाजपाला आशा तर घाटीत अपक्ष व अन्य पक्षात अटीतटीच्या लढतीची शक्यता
जम्मूत भाजपाला आशा तर घाटीत अपक्ष व अन्य पक्षात अटीतटीच्या लढतीची शक्यता
दहा वर्षानंतर प्रथमत:च होणाऱ्या काश्मीर विधानसभा निवडणुकीत जम्मूत भाजप यशाच्या अपेक्षेत आहे, तर घाटीत नॅशनल काॅन्फरंन्स व काॅग्रेस युती; पिडीपी; अपक्ष व राशीद इंजीनियर च्या उमेदवारांमध्ये अटीतटीच्या लढती, होण्याची शक्यता आहे .
पूर्व ईतिहास
२०१४ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काश्मीरातील ८३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत बीजेपी २५; नॅशनल कॉन्फरन्स १५ ;पीडीपी २८; काँग्रेस १२ ; जम्मू काश्मीर पीपल्स पार्टी २, भारतीय कम्युनिस्ट पार्टी १, पीपल डेमोक्रॅटिक मोर्चा १, व अपक्ष ३; असे एकूण बलाबल होते. पीडीपी व बीजेपी यांची युती होऊन मूफ्ती मोहम्मद सईद हे मुख्यमंत्री झाले. ७ जानेवारी १६ ला ते मरण पावले व मेहबूबा मुफ्ती मुख्यमंत्री झाल्या. गृहमंत्री पद बीजेपी ने स्वतःकडे ठेवले त्यामागे बहूदा काश्मीरच्या राजकारणातील अंतर्गत खाच खळगे जाणून घेऊन तसेच समाज विघातक शक्तींची बलस्थाने जाणून घेवून, त्यावर निर्णायक उपाययोजना निश्चित करणे हा उद्देश असावा ,व तो पूर्ण झाल्यानंतर पीडीपीचा पाठिंबा जून २००० मध्ये काढून घेतला. काश्मीरातील नियमाप्रमाणे पहिले सहा महिने राज्यपाल राजवट व त्यानंतर राष्ट्रपती राजवट लावून ५ ऑगस्ट २०१९ मध्ये वादग्रस्त३७० कलम दूर करून काश्मीरला खऱ्या अर्थाने भारतात समाविष्ट केले .
त्यानंतर दहशतवादावर कठोर उपाययोजना करून तसेच काश्मिरात विकासाच्या अनेक योजना राबवून भयमुक्त वातावरण निर्माण केले. 2019 मध्ये जमात-ए- इस्लामी या संघटनेला दहशतवादी कारवायांना मदत करणाऱी संघटना घोषित करून पाच वर्षासाठी प्रतिबंधित केले व २७ फेब्रुवारी २४ ला ही बंदी पुन्हा पाच वर्षासाठी वाढविली.यामूळे या संघटनेने आपले उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उभे केले आहेत.
जम्मू काश्मीरातील मतदार संघाच्या पुनर्रचनेनंतर एकूण ११४ जागा निर्माण झाल्या, त्यापैकी २४ जागा पीओके साठी रिक्त सोडल्या असून उर्वरित ९० जागांसाठी निवडणुका होत आहेत.या ९० जागा पैकी ४३ जागा जम्मू भागात असून ४७ काश्मीर घाटीत आहेत.तसेच ९० जागामधे ७ जागा अनुसूचीत जाती साठी व ९ जागा अनु जमातीसाठी प्रथमतः आरक्षित आहेत.९ जागा पैकी ६ जागा जम्मू विभागात असून ३ जागा घाटीत आहेत.
निवडणुकीतील पक्ष
भाजप, काँग्रेस , नॅशनल कॉन्फरन्स, पिंपल्स डेमोक्रॅटिक पार्टी या प्रमुख पक्षा सोबतच साजिद गनी लोन ची पिंपल्स काॅन्फरंन्स , राशीद इंजिनियर ची अवामी ईफ्तेहाद पार्टी, अल्ताफ बुखारीची अपनीपार्टी, गुलाम नबी आझाद यांच्या डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे कार्यकर्ते व अपक्षांच्या मुखवट्या खाली बंदी असलेली जमात-ए-ईस्लाम पार्टी हे सर्व पक्ष निवडणुकीत आपले भाग्य अजमावित आहेत.मागील अनेक वेळे प्रमाणे यावेळीही काॅग्रेस व नॅशनल कॉन्फरन्स ची यूती आहे.
जम्मूत भाजप ?
भाजप जम्मू मध्ये ४३ तर काश्मीरमध्ये १९ अशा एकूण ६२ जागा लढवीत आहे. भाजपने आपल्या कार्यकाळात दहशतवादाला आळा धालण्यात बर्याच प्रमाणात यश मिळविले आहे.तसेच आजपर्यंत मतदाना पासून वंचीत असणार्याना मतदानाचा अधिकार दिल्याने त्याचा आपणास फायदा होईल असा भाजपचा अंदाज आहे.घराणे शाहीचे राजकारण करणाऱ्या पक्षांमुळे ज.का.च्या विकासाला खिळ बसली.अनुच्छेद ३७० च्या जाण्याने विकासाचा मार्ग खुला झाला.व त्याचे परिणामही आता दिसू लागले आहेत असा दावा करुन अधिक विकासासाठी निवडून देण्याचे आवाहन भाजप करीत आहे. बहूदा घाटीत भाजपा जवळ योग्य उमेदवार नसल्याने वाअन्यकारणामुळे म्हणा, भाजप घाटीत ज्या जागांवर अपक्षांच्या जिंकण्याची शक्यता आहे., अशा जागेवरील अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देत आहे. व जम्मू मध्ये अपेक्षित जागा मिळाल्यास घाटीमधील अपक्ष उमेदवारांना सोबत घेऊन सरकार स्थापण्याचा प्रयत्न करण्याचे भाजपाचे राजकारण दिसते. लोकसभा निवडणुकीत भाजपला जम्मू विभागात दोन जागा मिळाल्या असल्याने विधानसभा निवडणूकीतही जम्मू विभागात भाजपला यश मिळण्याची आशा आहे.मात्र या विभागात काॅग्रेसचाही प्रभाव व जनाधार असल्याने लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणूकीसाठी नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेस यांची युती असून ते अनुक्रमे ५१ व ३२ अशा एकूण ८३ जागा लढवीत असून एक जागा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया व एक जागा पॅंथर साठी सोडली असून पाच जागी नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेस एकमेकांशी मैत्रीपूर्ण लढत देत आहेत.
याशिवाय २०१९ पासून जेलमध्ये असलेला व जेलमध्ये असतांनाही काश्मीरमध्ये लोकसभेसाठी निवडून आलेल्या राशीद इंजिनियर यांच्या आवामी इत्तेहाद पार्टीने २० ते २२ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. राशीद इंजिनियर चे नाव शेख अब्दूल राशीद असून ते अभियंता आहेत व राशीद इंजिनियर नावानेच ओळखले जातात.त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत जेलमधे असतांनाच बारामुल्लामधे नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला यांचा पराभव केलेला आहे. त्यांच्या प्रचाराची धूरा त्यांचा मुलगा अबरार रशीद यांनी सांभाळली होती. आता विधानसभेच्या निवडणूकाळात राशीद यांची जामीनावर मुक्तता झाली आहे.जनतेने आपणास २० ते २५ जागा दिल्यास आपण दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना आपल्या मता प्रमाणे वागण्यास भाग पाडू असे राशीदने म्हटल्याची चर्चा आहे. ओमर अब्दुल्ला ,सज्जद लोन, मेहबूबा मुफ्ती यांनी यापूर्वी भाजपशी हातमिळवणी केलेली असल्याने घाटीत त्यांचे बद्दल नाराजी आहे. काश्मीरात अटीतटी
सन २०१४ पूर्वी पेक्षा आता जम्मू काश्मीर व घाटीतील वातावरणात शांतता व सुरक्षितता काही प्रमाणात वाढली आहे.दरवेळे प्रमाणे बहिष्कार ,बंद, दगडफेक वगैरे पासून यावेळेस मुक्ती मिळाली असून निर्भय वातावरणात जनतेत निवडणूकीचा उत्साह आहे . हे मान्य असले तरी बेरोजगारी, वाढलेली विजबिले, अपुऱ्या सुविधा, तसेच अनुच्छेद ३७० च्या रद्द होण्याने काश्मीरचा विषेश दर्जा गमावल्याची भावना काही प्रमाणात घाटीत आहे.तसेच फारूख अब्दुल्ला व मेहबूबा मुफ्ती चे कार्यकाळात विकासात्मक कामेही न झाल्याने तसेच ओमर अब्दुल्ला , मेहबूबा मुफ्ती ,पीपल्स काॅन्फरंन्सचे सज्जाद लोन यांनी यापूर्वीही भाजपशी हातमिळवणी केलेली असल्याने या दोन्ही पक्षाबद्दल घाटीत नाराजीचे स्वर उमटू लागले आहेत. पर्याय म्हणून हे जनमत अन्य छोटे पक्ष किंवा अन्य अपक्ष उमेदवाराकडे झुकण्याची शक्यता आहे.
इंजिनियर राशीद यांच्या निवडणुकीच्या मैदानात येण्याने पीडीपी व नॅशनल कॉन्फरन्स समोर अडचणी उभ्या केलेल्या आहेत. कारण या तिघांचेही धोरण व मुद्दे एकच आहे. तीनही पक्षांनी ३७० कलम पूनर्रस्थापीत करण्याचे आश्वासन जनतेला दिले आहे. मात्र जनतेला पीडीपी अथवा नॅशनल कॉन्फरन्स पेक्षा राशीद इंजिनियर कडून अपेक्षा पूर्ण होण्याची आशा वाटत आहे.
नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी यांचे मते राशीद इंजिनियर ला तसेच सज्जाद लोनच्या पक्षाला भाजपानेच मुद्दाम जाणीवपूर्वक उभे करून भाजप, विरोधी मतांमध्ये फूट पाडण्याचे राजकारण करीत आहे असा या दोन्ही पक्षांचा आरोप आहे.तरीही सत्तेची चाबी आमच्या कडे असेल असा दावा मेहबूबा मुफ्ती ची मुलगी व पीडीपी ची नेता असलेल्या ईल्तजाचा आहे. यावेळेस मेहबूबा निवडणूकीसाठी उभ्या नसून त्यांनी आपल्या मुलीला पूढे केले आहे.
३७० कलम हा आता भूतकाळ झाला असून ते पूनर्रस्थापीत होणे शक्य नाही असा भाजपचा दावा आहे तर सर्व विरोधी पक्षांनी त्यांच्या पूनर्रस्थापनेचा मनोदय जाहीर केला आहे.
सरते शेवटी जम्मू-काश्मीर मधील जनता यावेळेस बदलावासाठी मतदान करणार आहे, असे दिसते. हा बदलाव म्हणजे सन 2014 पासून झालेले परिवर्तन कायम ठेवण्यासाठी कि, झालेले परिवर्तन अमान्य करून पुन्हा परत मागे फिरण्यासाठी आहे हा येणारा काळच ठरवेल. बाकी आता सर्व ठिकाणचेच राजकारण अशा स्तरावर आहे कि कोणत्याही पक्षाची कोणत्याही पक्षाशी युती होवून काहीही घडू शकते.
भालचंद्र ठोंबरे
९८३४३५०८९५