लाडक्या बहिणींनो सावधान ! योजनेंतर्गत मिळालेले पैसे परत घेण्यात येत आहेत !

लाडक्या बहिणींनो सावधान ! योजनेंतर्गत मिळालेले पैसे परत घेण्यात येत आहेत !
( एव्हरी टाईम न्यूज प्रतिनिधी )
महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केल्याने महाराष्ट्रातील सर्वच महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.महायुती सरकारने सर्वप्रथम सरसकट सर्वच महिलांना या योजनेचा लाभ मिळवून दिला. ही योजना इतकी प्रसिद्ध झाली की या योजनेमुळे पुन्हा महायुती सरकार बहुमताने सत्तारूढ झाली.
महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर आता कुठे लाडक्या बहिणीसमोर या योजनेच्या अटी घालण्यात आलेल्या आहेत. याच अटी जर निवडणुकीपूर्वी घालण्यात आल्या असत्या तर महायुती सरकारला निवडणूक जिंकणे कठीण झाले असते. त्याच वेळी लाडकी बहीण योजनेचा धसका मात्र महाविकास आघाडीने घेतला. त्यांनी आपल्या घोषणापत्रात म्हटले की आमची सरकार आल्यावर आम्ही महिलांना तीन हजार रुपये महिना देऊ, परंतु महिलांनी महाविकास आघाडीच्या घोषणेला बळी न पडता लाडकी बहीण योजना सुरू करणाऱ्या महायुती सरकारला भरघोस मतांनी निवडून दिले.
ही योजना सुरू करून महायुती सरकार सत्तेवर आले, परंतु आता या खर्चाचे नियोजन कसे करायचे, असा यक्ष प्रश्न सरकार पुढे आहे.
आतापर्यंत ज्या ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला अशा बहिणींची छाननी सुरू झाली आहे. आता फक्त पात्र लाभार्थी महिलांनाच या योजनेचा लाभ कसा मिळेल यावर सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.
जर पात्रता डावलून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असल्यास कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापूर्वी महिलांना दिलेले पैसे परत सरकारी तिजोरीत जमा होऊ शकतात. दिलेले पैसे परत घेण्याचा प्रकारही उघडकीस आलेला आहे. एका महिलेकडून साडेसात हजार रुपये परत घेण्यात आल्याने राज्यभरातील महिलांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. धुळे जिल्ह्यातल्या नकाणे गावातल्या एका महिलेने लाडकी बहीण योजनेचा दोनदा लाभ घेतल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्याही परिस्थितीत त्या महिलेला परत करावे लागणार आहे.
यापुढे अति दक्षता घेत व अर्जांची काटेकोरपणे पडताळणी करूनच पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळावा, या दिशेने महायुती सरकारचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. निकषात न बसणाऱ्यांना अपात्र ठरविले जाणार आहे.
या योजनेत अर्ज करणाऱ्या महिला अटींमध्ये बसत नसतील आणि त्यांनी योजनेचा लाभ घेतला तर अशा महिलांवर कारवाई होणार आहे.
धुळ्यातील एका महिलेने लाडकी बहीण योजनेचा पात्र नसतानाही लाभ घेतला हे संबंधित विभागाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे अशा अनेक अपात्र महिला राज्यात असल्याचे एका चौकशीत समोर आले आहे. आता यावेळी अशीही अट घालण्यात आली आहे की कोणत्याही महिलेने कोणत्याही एकाच सरकारी योजनेच्या लाभ घ्यावा ज्यांनी एकाच वेळेस दोन दोन सरकारी योजनेचा लाभ घेतला असेल अशा लाडक्या बहिणीकडूनही पैसे परत घेतले जाणार आहेत. यावर मात्र महायुती सरकारने सावध पवित्रा घेत सर्व प्रकरण प्रशासनावर ढकलले आहे, हे विशेष
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती पात्रता असावी ? यासाठी अटी घालण्यात आलेल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत.
१) लाडकी बहीण योजनेचा अर्ज करणारी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
२) लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी हवे.
३) महिलेच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावे. आमदार किंवा खासदाराच्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.
४) ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य टॅक्स भरतात त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. चारचाकी वाहन असल्यासदेखील पैसे मिळणार नाहीत.
५) जर महिला सरकारी नोकरीत असतील तर त्यांनाही या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे.
तर लाडक्या बहिणींनो आता सावध व्हा, तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेच्या लाभ घ्यायचा असेल तर वरील अटींचे पालन करावे.