आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना राखीव मतदारसंघात उमेदवारी द्या – नारायण बागडे यांची मागणी
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना राखीव मतदारसंघात उमेदवारी द्या – त्यांचे राजकीय पुनर्वसन करा : नारायण बागडे यांची मागणी
नागपूर/E T News
मोठ्या कठीण परिस्थितीत लोकसभेच्या निवडणुकीत आंबेडकरी कार्यकर्त्यांनी प्रस्थापित रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांना न जुमानता महाराष्ट्रात महविकास आघाडीला समाधानकारक यश प्राप्त करून दिले या मध्ये आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाने प्रमुख भूमिका बजावली. इतकेच नव्हे तर १९ उमेदवारांना मतांचे विभाजन नको म्हणून राज्यातील विविध मतदारसंघातून मागे घेतले.
प्रस्थापित सर्व रिपब्लिकन नेते हे कडव्या पक्षाकडे वळले असता कार्यकर्त्यांनी संविधानाच्या रक्षणासाठी वचन दिलेल्या माविआची बाजू भक्कमपणे मजबूत केली हे विसरून चालणार नाही याची जाणीव आघाडीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांना वेळोवेळी करून दिली व त्यांनी कौतुक सुद्धा केले.
राज्यात विधानसभेच्या २९ मतदारसंघ अनुसूचित जातीकरिता राखीव आहेत परंतु प्रस्थापित पक्ष आपल्या व पक्षाच्या अनुसूचित जातीमधिल प्रस्थापित नेत्यांची वर्णी लावत असते तो आजपर्यंतचा अनुभव आहे. परंतु या मतदारसंघात १५ तरी उमेदवारी चळवळीतील कार्यकर्त्यांना देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन महाविकात आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी करावे असे आवाहनही नारायण बागडे यांनी पत्रपरिषदेत केले.
येत्या १६ आणि २० आगस्टला मुंबईत महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे त्यामध्ये आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या पदाधिकारी यांना सन्मानाने निमंत्रण दिले पाहिजे . मागिल १० जुलै रोजी मुंबई येथिल सिल्वर ओक या बंगल्यात शरदचंद्र पवार साहेब यांची भेट आरिमोचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे व पदाधिकारी यांनी भेट घेतली होती त्या भेटीत रिपब्लिकन मोर्चाने लोकसभेच्या निवडनुकीत माविआला मदत केली होती त्यांची संपूर्ण माहिती पवार साहेबांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती, असेही बागडे यांनी सांगितले.
पत्रपरिषदेला प्रा. रमेश दुपारे, नामदेवराव निकोसे, धर्मा बागडे, राजू पांजरे, सुखदेव मेश्राम, वैशाली तभाणे, संगीता चांद्रिकपुरे, सुनिता चांदेकर, संगीता वासनिक, चरणदास गायकवाड, रामभाऊ वाहणे, अजय मून, प्रकाश कांबळे, राजू कांबळे, प्रवीण आवळे आदी उपस्थित होते.
—————