लाडक्या बहिणीनो काळजी करू नका योजना चालूच राहतील ! अजित पवार. वरुड येथे जनसन्मान यात्रा सोहळ्यात प्रतिपादन
लाडक्या बहिणीनो काळजी करू नका योजना चालूच राहतील ! अजित पवार. वरुड येथे जनसन्मान यात्रा सोहळ्यात प्रतिपादन
वरुड/अमरावती
बहिणींनो काळजी करू नका योजना सुरूच राहणार आहे हा अजितदादांचा वादा आहे. विरोधक ओरडतात परंतु आणखी योजना सुरूच राहील तर भावासाठी काय असा प्रश्न विचारल्या जात असल्याने त्यांच्या साठी शेतीचे वीज बिल माफ आता बिल भरण्याची गरज नाही असे सांगत लाडक्या बहिणीच्या लेकीसाठीसुद्धा लेक लाडकी योजना सुरु करून आमही प्रत्येक मुलीला जन्मापासून तर वयाच्या अठरा वर्षापर्यंत एक लक्ष रुपये देऊ. यासाठी वर्षाकाठी ४३ हजार कोटी रुपयांची तरतूद आम्ही केली आहे .सत्ता येई , सत्ता जाईल पण माणूस टिकला पाहिजे आम्ही सत्तेसाठी हपापलेले नाही .तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी मोर्शी, संत्रा प्रक्रिया केंद्राला लागेल तेवढा निधी देऊ संत्रा प्रकल्प गेम चेंजर ठरला पाहिजे. असे प्रतिपादन जनसन्मान यात्रेच्या सभेमध्ये स्थानीक मराठी शाळेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले .ते पुढे म्हणाले , कापूस , सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे , संत्राला न्याय देण्यासाठी मोर्शी येथे विदर्भ अॅग्रो प्रोड्युसर कंपनी आणि महाराष्ट्र राज्य कृषी विकास महामंडळाचे संयुंक्त संत्रा प्रक्रिया प्रकल्प मंजूर केला .तर एमआयडीसी मध्ये १०० एक्कर जमीन घेऊन उद्योग उभारून तरुणांच्या हाताला कामं देऊ . फक्त तुम्हाला विकास पाहिजे , शेतमालाला भाव मिळाला पाहिजे.संत्र गळतीचे पंचनामे लगेच होणार असून त्यांनापण मदत करू. मात्र विकासासाठी ४ हजार ३७२ कोटी रुपयांचा निधी खेचून आणणारा एकमेव आमदार देवेंद्र भुयार असल्याने या तरुणाला पुन्हा संधी द्या .असे आवाहनसुद्धा यावेळी अजित पवार यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष खा. प्रफुल पटेल, आ. देवेंद्र भुयार , आ . अमोल मिटकरी , संजय खोडके , संतोष महात्मे , वसंत घुईखेडकर, सुरेख ठाकरे , प्रमोद पाटील सह आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी मुस्लिम समिती , बौद्ध विहार समिती, विविध संस्थांच्या हस्ते सत्कार रकरण्यात आला . तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते वैद्यकीय अधीक्षक डॉ .प्रमोद पोतदार,रुग्णालयासाठी जमीन दानदाते डॉ . मीना बंदे , डॉ . सुधाकर बंदे , मालखेडचे सरपंच विजय वडस्कर यांचा सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला . यावेळी प्रास्ताविक देवेंद्र भुयार यांनी करताना म्हटले कि, माझं जन्म वाड्यातून झाला नाही , सर्वसामान्य शेतकºयांच्या कुटुंबात झाल्याने माज्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे . परंतु विरोधक काहीही जरी बोलले तरी मी माझे कार्य सुरूच ठेवणार असल्याचे सांगून माझ्या विश्वासावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक नव्हे तर तब्बल ४ हजार ३७२ कोटी रुपयाचं निधी दिला हि जमेची बाजू आहे . मी तरुणाच्या हाताला काम दिले असल्याचा पाठपुरावा केला . खा . प्रफुल पटेल यांनी सामानय कार्यकर्त्यांच्या वेदना काय असतात हे सामागून शेतकºयाच्या हिताकरिता केंद्रीय मंत्र्याला भेटून न्याय मिळालं पाहिजे असे सांगितले .यावेळी कार्यक्रमाला मोठया संख्येने लोक उपस्थित होते.