कर्मवीर हरिदास आवळे सामाजिक भवनाच्या बेकायदेशीर उद् घाटनाच्या निषेधार्थ तीव्र निदर्शने
कर्मवीर हरिदास आवळे सामाजिक भवनाच्या बेकायदेशीर उद् घाटनाच्या निषेधार्थ तीव्र निदर्शने
नागपूर/E T News
उत्तर नागपूर क्षेत्रात उभारण्यात येत असलेल्या एड. हरिदास आवळे सामाजिक भवनात आवळे यांचा पुतळा उभारला नसतांना व नियोजीत बांधकाम पुर्ण झाले नसतांना केवळ राजकिय श्रेय लाटण्यासाठी व आवळेच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना बाजुला सारुन स्वपक्षाच्या कार्यकर्त्यांना सदर सामाजिक भवनाचा ताबा देण्याच्या गैरहेतुने आमदार नितीन राऊत यांनी आयोजित केलेल्या बेकायदेशीर उद्घाटन कार्यक्रमाच्या निषेधार्थ कर्मविर हरिदास आवळे बाबु प्रतिष्ठान हया संस्थेच्या कार्यकत्यानी कार्यक्रम स्थळी तिवृ निदर्शनै केली.
आवळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक जामगडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निदर्शने आंदोलनात डॉ पुरणचंद्र मेश्राम, पुरुषोत्तम गायकवाड, , डॉ. जयंत रामटेके, भाऊराव वानखेडे,के.एम. उके, अतुल वंजारी,अजित जामगडे,संजय चहांदे आदी शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश होता.
याबाबतची वस्तुस्थिती अशी आहे की महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून नागपूर सुधार प्रन्यासदवारे सदर सामाजिक भवनाचे काम सुरू होते.नासुप्रदवारे सदर बांधकाम पुर्ण करुन सदर भवन सामाजिक न्याय विभागाला हस्तांतरित केल्यावर शासनाद्वारे सदर भवनाचे लोकार्पण केले जाते. परंतु सदर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली नसतांना व सदर भवनाचे काम पूर्ण झाले नसतांना आमदार राऊत यांनी शासनाच्या पुर्व मान्यतेशिवाय सदर भवनाचे बेकायदेशिररित्या स्वहस्ते लोकार्पण करून सदर भवनाच्या पावित्र्याला व वैधतेला काळीमा फासला आहे.
यासंदर्भात आवळे प्रतिष्ठानच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नासुप्रचे सभापती, समाजकल्याण उपायुक्त, पोलिस आयुक्त यांना लेखी तक्रार केली असुन सदर सामाजिक भवनाचे काम पूर्ण झाल्यावर व आवळेबाबुचा पुतळा प्रस्थापित झाल्यावर कायदेशीररित्या व सन्मानपूर्वक लोकार्पण करण्याची शासनास विनंती केली आहे.
कर्मवीर हरदास आवळे बाबु प्रतिष्ठान हया संस्थेनी शासनास केलेल्या मागणीनुसार व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आवळे सामाजिक भवनासाठी शासनाने जमिन देवुन त्यांचे स्मृती प्रित्यर्थ सामाजिक भवन उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला. ह्या भवनाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवुन आंबेडकरी चळवळीतील नेते हरिदास आवळे व इतर समकालीन नेत्याचे विचार भावी पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प होता. त्यामुळे सदर भवन पुर्ण झाल्यावर ह्या भवनाच्या संचालनाची जबाबदारी आवळे प्रतिष्ठानला सोपविण्याची मागणी स्वता आमदार राऊत यांनी नासुप्रला पत्र पाठवून केली होती. तसेच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी सुध्दा मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून सदर प्रतिष्ठानला आवळे सामाजिक भवनाच्या संचालनाची जबाबदारी सोपविण्याची मागणी केली होती. परंतु आमदार नितीन राऊत यांनी राजकीय हेतूने स्वताच्या काॅंग्रेसी कार्यकर्त्यांना ह्या भवनाची जबाबदारी सोपविण्यासाठी आवळे विचारमंच नावाने नविन संस्था कागदोपत्री सुरू करुन ह्या संस्थेच्या वतीने लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन केले. व सदर भवन अनधिकृतरित्या ह्या संस्थेच्या ताब्यात देण्याचे मनसुबे रचले .ऍड आवळेच्या मिशनचा सतत विरोध करण्याऱ्या प्रवृत्तीच्या हातात आवळे सामाजिक भवन सोपविणे ही कृती डॉ आंबेडकर व आवळे वर श्रद्धा व निष्ठा असणाऱ्या लाखो अनुयायांच्या भावनांना पायदळी तुडविणारी आहे. ह्या भवनाची जबाबदारी आंबेडकर निष्ठ संस्थेला न सोपविल्यास आंबेडकरी जनतेच्या वतीने तिवृ आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष विनायक जामगडे,व सचिव डॉ पुरणचंद्र मेश्राम यांनी दिला आहे.