विधानसभा मतदानाची टक्केवारी का वाढली ?

विधानसभा मतदानाची टक्केवारी का वाढली ?
प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल वर्धा
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ६५.११ टक्के मतदान झालं आहे. गेल्या ३० वर्षांमध्ये पहिल्यांदाच राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचं पाहायला मिळालं आहे. १९९५ साली ७१.६९ टक्के मतदानाची नोंद झाली होती. अलीकडच्या काही वर्षांमध्ये राज्यात कधीच ६५ टक्क्यांहून अधिक मतदान झालं नव्हतं. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ६१.३९ टक्के मतदानाची नोंद झाली होती. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ६१.४ टक्के मतदान झालं होतं. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा ३.७ टक्के मतदान वाढलं आहे. ही मतदानाची वाढलेली आकडेवारी निवडणुकीच्या निकालात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. दरम्यान, २०१९ मध्ये राज्यात ८.८५ कोटी नोंदणीकृत मतदार होते. त्यात गेल्या पाच वर्षांमध्ये ९.५ टक्के वाढ झाली असून राज्यात आता ९.६९ टक्के मतदार आहेत.
पंधराव्या विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४साठी राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६५.११ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. मात्र वाढीव मतदान टक्केवारी वर विरोधी पक्षांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. लोकसभेच्या वाढत्या टक्केवारीवर जसा आक्षेप घेण्यात आला तसाच आता देखील विधानसभेच्या वाढीव मतदान टक्केवारी घेण्यात आला.२०१४ विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ६३.३ टक्के मतदान झालं होतं. तर २०१९ला राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी ६१.४० टक्के मतदान झाले होते.मागील दोन विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा अधिक मतदान झाले आहे. २०१९ च्या तुलनेत यंदा ३.७१ टक्के मतदान वाढलेलं आहे.
मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.
यंदा शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक मतदान पाहायला मिळाले आहे. ग्रामीण भागातील स्थानिक राजकारण, अनेक योजना, राजकीय पक्षांनी दिलेली आश्वासनं आणि त्या भागातील समीकरण यामुळे ग्रामीण भागात मतदारांची टक्केवारी वाढली असल्याचं जाणकार सांगतात.
महायुती, महाविकास आघाडी आणि इतर सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीत मत मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. पक्षांनी दिलेली आश्वासन, मागील पाच वर्षातील घडामोडी, तसेच भविष्याच्या दृष्टीने यंदा विचार करत मतदारांनी या वेळेला मतदान करण्याचा ठरवलेलं दिसते, त्यानुसार मागील निवडणुकींच्या तुलनेत यंदा थोड अधिक मतदान पार पडलय असं दिसतंय. अभ्यासकांच्या मते,मतदान जास्त होतंय म्हणजे राजकारणात लोकांचा रस वाढलाय. दुसरं म्हणजे निवडणूक आयोगाने मतदानाविषयी जनजागृती आणि अनेक उपक्रम राबवत मतदान अधिक होइल यासाठी भर असून व्यवस्थित मतदानाची सोय केली. मतदान वाढण्याच तिसर कारण म्हणजे मतदारांची संख्या वाढलीय आणि मतदार यादीत सुटसुटीतपणा आलाय.
या निवडणुकीत महिलांच्या मतदानाची टक्के वाढली. महायुतीला महिलांनी भरभरून मते दिली.शिंदे सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेने महिलांवर प्रभाव टाकल्याचं दिसतं.
९५६१५९४३०६