राज्यातील जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना रिपब्लिकन मोर्चाचे निवेदन.
राज्यातील जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना रिपब्लिकन मोर्चाचे निवेदन.
नागपूर/E T News
आंबेडकरी नेते सत्तेच्या दारात स्वताच्या स्वार्थासाठी हेलपाटे घालत असल्याने अनुसूचित जाती, जमाती अल्पसंख्याक समाजातील विविध समस्यांचे निराकरण होत नाही या करिता आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने २६ जुलै छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेल्या आरक्षण दिनाच्या आठवण दिनानिमित्त राज्यातील सर्व जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे असे पत्रकारांना आंरिमो चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी कळविले.
तरुण तरूणींना स्वयम रोजगारासाठी महात्मा फुले, अण्णा भाऊ साठे,संत रोहिदास, वसंतराव नाईक आणि जिल्हा उद्योग केंद्रामार्फत कर्ज योजना राबविण्यात येतात परंतु स्थानिक बँक अधिकारी मस्तावल्या मुळे बेरोजगारांच्या नशीबात फक्त निराशाच पदरी पडते यांच्या वर शासनाचे अंकुश नाही, विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती नाही, वसतिगृहात प्रवेश भेटणे कठीण, रमाई घरकुल योजना थंडा बस्थात, गठर्ई कामगार यांना वाटप करण्यात येणारे टपरी, स्वत राशन दुकानात निकूष्ठ राशन, निराधार योजना श्रावणबाळ संजय गांधी वेळेस पैसे नाहीत, यामुळे समाजात सत्ताधारी यांच्या विरोधात आक्रोश निर्माण झाला आहे.
नारायण बागडे यांचे उपोषण मागे घेण्यात आले आहे विदर्भ सह नागपूर येथे पावसाने थैमान घातले आहे व आंरेज अर्लट घोषित केले असल्याने २६ /८/ ला नियोजित उपोषण राज्यातील कार्यकर्त्यांच्या विनंती मुळे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे परंतु राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रदेश उपाध्यक्ष बुद्धम भाई जगताप यांनी कळविले आहे.