डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालायाचे भूमिपूजन प्रतीक्षेत? : डॉ. नितीन राऊत : राज्यपालांच्या अभिभाषावरील चर्चेत मुद्दा उपस्थित

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालायाचे भूमिपूजन प्रतीक्षेत? : डॉ. नितीन राऊत
राज्यपालांच्या अभिभाषावरील चर्चेत मुद्दा उपस्थित
नागपूर/विशेष प्रतिनिधी
राज्यपालांनी अभिभाषणातून सरकारची पाठ थोपटली असली तरी अनेक मुद्यांचा त्यांनी उल्लेख केला नाही. नागपुरात अधिवेशन सुरू असताना डॉ. बाबासाहब आंबेडकर रुग्णालय तथा अनुसंधान केंद्रासाठी निधी देण्याचा दावा केला जात असला तरी रुग्णालय निर्माण प्रक्रियेचे भूमिपूजन कधी होणाार, याबाबत स्पष्टता नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्यपालांच्या अभिभाषणाच्या चर्चेत ते बोलत होते.
यावेळी राऊत यांनी अन्य विषयावंरही सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले, आज राज्याची परिस्थिती बिकट आहे. आपल्या भाषणातून राज्यातील युवकांना जे कुणी भडकविण्याचे काम करत असेल अशांवर कधी कारवाई होईल की नाही, सांगता येत नाही. अशाच प्रकारे भडकाऊ भाषेचा प्रयोग होत राहीला तर ते थांबविणे गरजेचे आहे. राज्याला एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. तसे असले तरी येथील ते महिलांना न्यायासाठी संघर्ष करावा लागतो आहे. सात महिन्यांपूर्वी १४०० नागरिक बेपत्ता झाले. यात ६८ मुलींचा समोवश आहे. नागपूरचा विचार केला तर जानेवारी २०२४ ते ३१ आॅगस्ट २०२४ दरम्यान, ९० अल्पवयीन मुलींचा बलत्कार झाला आहे. गत ४४ महिन्यांमध्ये १७१ महिला बेपत्ता आहेत. ही संख्या सातत्याने वाढत आहे. प्रत्येक महिन्याला २५ महिला तसेच मुलींना टार्गेट केले जात आहे. प्रत्येक दिवशी एका महिलेचे अपहरण होत आहे. हे सर्व कधी थांबणार आहे. तक्रार लिहिण्याकरिता एका मुलीला तब्बल १२ तास बसवून ठेवले होते, हे देखील वास्तव असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षेवरून ते म्हणाले की, वर्ष २०२२ मध्ये एमपीएससीची परीक्षा घेण्यात आली. यानंतर पीएसआई भर्तीसाठी मुलाखत झाली. मुख्य परीक्षा देखील झाली होती. फील्ड टेस्ट देखील झाले होते. आज त्याची लिस्ट आली. परंतु, एमपीएसी परीक्षेला चार महिने झाले आतापर्यंत मात्र नियुक्ती होऊ शकली नसल्याचे त्यांनी सांगितले.
बौद्ध स्थळांचा विकास कधी होणार
सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत काम देण्याचे वचन दिले. त्यांना अस्थायी नोकरी दिल्या. परंतु, त्यांना कामाचे पैसे मिळाले नाही. तसेच, काही खेळाच्या मैदानांसाठी खनीज निधी मागितल्यानंतर प्रशासनाकडून केवळ शाळेतील प्रांगण विकास करण्यासाठी हा निधी असल्याचे सांगण्यात येते. हा निधी मैदानांसाठीही उपलब्ध होणे गरजेचे आहे. राज्यात पर्यटनासोबतच धार्मिक पर्यटनाच्या विकासावर भर दिला जात आहे. निधी वितरीत होत आहे. अशाच प्रकारे बौद्ध समाज स्थळांचा विकास कधी होणार, अशी विचारणा डॉ. राऊत यांनी यावेळी केली.
——————————-