राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारे नवे मंत्रिमंडळ

राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारे नवे मंत्रिमंडळ
विधानसभा निवडणूक निकालानंतरतीन आठवड्यांनी राज्य मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार रविवारी नागपूर हिवाळी अधिवेशनात झाला. फडणवीस मंत्रिमंडळात विविध जातीजमातीचे समीकरण साधताना तिन्ही पक्षांनी ज्येष्ठ नेत्यांना धक्का देत नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, सुधीर मुनगंटीवार डॉक्टर विजयकुमार गावित रवींद्र चव्हाण आणि सुरेश खाडे यांच्यासह काही ज्येष्ठ मंत्र्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला असून ३९ जणांपैकी १८ नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. गेल्या अनेक वर्षात पक्षासाठी केलेल्या कामांची दखल पक्षश्रेष्ठींनी घेत एक नवीन राजकीय सुरुवात केल्याची दिसून येते.
मंत्रिमंडळात गेली कित्येक वर्ष आपले स्थान कायम राहणाऱ्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना यावेळी पक्ष श्रेष्ठींनी बाहेरचा रस्ता दाखविला. अरे ज्येष्ठ नेते निवडणुकीत निवडून आले मात्र पक्षश्रेष्ठींनी नव्यांना संधी देऊन एक नवीन सुरुवात केलेली आहे.
भाजपचे ९, शिवसेनेचे ६ आणि राष्ट्रवादीचे ४ उमेदवार आहेत. शिवसेनेच्या आमदारांना अडीच वर्षांसाठी मंत्रिपद मिळाले असून, त्यानंतर मंत्रिपदे बदलली जाणार आहेत. मर्यादित मंत्रीपदामुळे योग्यता असूनही एकाच वेळी अनेकांना संधी मिळत नाही म्हणून यावेळी मंत्री पदाच्या कार्यकाळ पाच वर्षे ऐवजी अडीच वर्षाचा केला आहे त्यामुळे अनेकांना संधी मिळेल एवढेच नव्हे तर अनेक जिल्ह्यांना विविध भागांनाही विकासाची समान संधी मिळेल, असा आशावाद वर्तविला जात आहे.नव्या-जुन्या नेत्यांचा समतोल असलेला हा विस्तार राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणार आहे.
मंत्रिमंडळात चार लाडक्या बहिणींना स्थान
राज्य मंत्रिमंडळात चार महिलांना संधी देण्यात आली आहे. त्यातील तीन भाजपच्या तर एक अजित पवार गटाच्या आहेत. शिंदेसेनेकडून एकाही महिलेला संधी देण्यात आलेली नाही. विधानसभेत २१ महिला आमदार आहेत. त्यात भाजपाच्या १४ आमदार आहेत.यावेळी २१ महिला विधानसभेवर निवडून गेल्या. त्यात भाजपच्या १४ आमदार आहेत. त्यात, मेघना बोर्डीकर, मनीषा चौधरी, अनुराधा चव्हाण, श्रीजया चव्हाण, देवयानी फरांदे, सुलभा गायकवाड, सीमा हिरे, श्वेता महाले, मंदा म्हात्रे, माधुरी मिसाळ, नमिता मुंदडा, स्नेहा दुबे, मोनिका राजळे आणि विद्या ठाकूर यांचा समावेश आहे. त्यातील केवळ मेघना बोर्डीकर मंत्री झाल्या.
अजित पवार गटाकडून अदिती तटकरे, सरोज अहिरे, सुलभा खोडके आणि सना मलिक चौघी जिंकल्या, त्यातील एकीला मंत्रिमंडळात स्थान मिळाले. शिंदेसेनेकडून मंजुळा गावित आणि संजना जाधव या दोन जणी तर काँग्रेसकडून ज्योती गायकवाड या एकट्याच विधानसभेत पोहोचल्या
मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीतील आमदारांची नाराजी चव्हाट्यावर:
मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीतील आमदारांची नाराजी चव्हाट्यावर आली आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन दहा दिवस उलटले तरी फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात दहा माजी मंत्र्यांना स्थान मिळू शकले नाही. भाजपच्या आमदारांना सर्वाधिक मंत्रीपदे मिळाली, त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला. दरम्यान, मंत्रिमंडळात मंत्रिपद न दिल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये नाराजी दिसून येत आहे.यापूर्वी एकनाथ शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मंत्रिपद न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली होती आणि आता अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनीही आघाडी उघडली आहे. सरकार नुकतेच स्थापन झाले आणि महायुतीच्या भिंतीला तडे गेल्यासारखे वाटू लागले. आमदारांची ही नाराजी महायुतीच्या बाजूने काटा ठरू शकते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सोमवारी नव्या महाआघाडी सरकारमध्ये समावेश न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करत आपल्या मतदारसंघातील जनतेशी चर्चा करूनच भविष्याचा मार्ग ठरवू, असे सांगितले. नव्या मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने आपण नाराज असल्याचे भुजबळ म्हणाले. त्यांच्या पुढील वाटचालीबद्दल विचारले असता, नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघातील आमदार म्हणाले, “मला पाहू द्या. मला याचा विचार करू द्या.मी माझ्या मतदारसंघातील लोकांशी बोलेन आणि समता परिषदेशी चर्चा करेन.
यापूर्वी शिवसेनेचे भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात समावेश न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करत सर्वपक्षीय पदांचा राजीनामा दिला होता. रविवारी भंडारा जिल्ह्यात पत्रकारांशी बोलताना भोंडेकर यांनी दावा केला की, त्यांचे पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचे आश्वासन दिले होते. भोंडेकर हे शिवसेनेचे उपनेते आणि पूर्व विदर्भातील जिल्ह्यांचे समन्वयक होते. भोंडेकर म्हणाले, “कोणत्याही पदावर राहण्याची माझी मानसिकता नाही. मी माझा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सुपूर्द केला असून त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहे.
प्रा डॉ सुधीर अग्रवाल वर्धा
९५६१५९४३०६