अवैध होर्डिंग्जचे गंभीर परिणाम : प्रशासन व सरकार निद्रा अवस्थेत
अवैध होर्डिंग्जचे गंभीर परिणाम : प्रशासन व सरकार निद्रा अवस्थेत.
घाटकोपरच्या होर्डिंग्ज दुर्घटनेची पुनरावृत्ती ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये दिसून आली.मुंबई परिसरात घाटकोपर येथे दिनांक १३ मे २०२४ ला वादळीवारा व पाऊस आला यामध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईकरांचे नुकसान झाले.त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासन व सरकारच्या हलगर्जीपणामुळे मुंबईत असलेल्या अवैध होर्डिंग्जने १४ मुंबईकरांचा बळी घेतला व ८० पेक्षा जास्त गंभीर जखमी झालेत होते.त्याचीच पुनरावृत्ती दिनांक २ ऑगस्ट २०२४ शुक्रवारला ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये सहजानंद चौकातील ३० बाय ३० फुटांचे एक भलेमोठे होर्डिंग्ज ४० फुट उंचीवरून कोसळले यात दोन जण गंभीर जखमी झाले असून रिक्षासह अन्य वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.मुंबईतील घाटकोपरच्या भयावह दुर्घटनेनंतर कल्याणमध्येही होर्डिंग्ज कोसळल्याने नागरिकांचा जीव कवडीमोलाचा झाला आहे का,असा महाराष्ट्रातील लोकांपुढे प्रश्न उपस्थित होतो.त्यामुळे सरकारने, प्रशासनाने होर्डिंग्जच्या बाबतीतील गांभीर्य लक्षात घेऊन होर्डिंग्ज मालकांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.कारण ज्या ज्या ठिकाणी होर्डिंग्ज लावल्या जाते त्या ठीकाणचे बरेचसे ऍगल निकामी झाल्याने अति पाऊस किंवा वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग्जला नुकसान होते व ते कोसळण्याची शक्यता असते. त्याचे गंभीर परिणाम सामान्य नागरिकांना भोगावे लागते. राज्यातील संपूर्ण होर्डिंग्जचे प्रशासनाने ऑडिट करून दोषींवर कठोर कारवाई करावी जेणेकरून भविष्यात होर्डिंग्जनी होणाऱ्या दुर्घटना रोखण्यास प्रशासनाला मोठी मदत होईल. यावर सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. महापालिका किंवा प्रशासनाने जाहिरातदारांना अवैध होर्डिंग्ज बद्दल नोटीस बजावुन सुध्दा होर्डिंग्ज हटत नसेल तर सामान्य नागरिकांनी काय करावे?मनपाने नोटीस बजावल्या नंतर प्रशासनाकडुन कठोर कारवाई अपेक्षित असते, परंतु कारवाई होत नसल्याने होर्डिंग्जच्या घटना दुर्घटना होतांना दिसते.अवैध होर्डिंग्जवरून असे लक्षात येते की जाहिरातदार व मनपा प्रशासन यात काही साठगाठ तर नाही ना!अशी शंका सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने सर्वत्र आपल्याला होर्डिंग्ज मोठ्या प्रमाणात दिसून येते. होर्डिंग्ज असावेत ते कायद्याच्या चौकटीतून व नियमानुसार असावेत.परंतु अवैध होर्डिंग्जची संख्या वाढल्याने मुंबईत १४ लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते.त्याचीच पुनरावृत्ती आपल्याला ठाणेतील कल्याणमध्ये दिसून येते.यावर प्रशासनाने व सरकारने जातीने लक्ष देण्याची गरज आहे.स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आपल्याला मुंबई-कल्याणसह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अवैध होर्डिंग्जचा बाजार दिसून येते.असेही अवैध होर्डिंग्ज राज्यात आपल्याला पहायला मिळतात जसे की नगरसेवक,आमदार, खासदार, मंत्रीसह अनेक राजकीय पुढाऱ्यांचे अतोनात होर्डिंग्ज सूध्दा आपल्याला मोठ्या प्रमाणात पहायला मिळतात. होर्डिग्ज असे लावतात की राज्यात त्यांना कोणीच ओळखत नसावे.राजकीय पुढाऱ्यांचे आगमन,भुमिपुजन व वाढदिवस याचे होर्डिंग्ज तर जिथे जागा मिळेल तिथे लावलेले आपण पहातो. विजेचे खांबसुध्दा यांना कमी पडतात,तसेच प्रत्येक चौका-चौकात अवैध ठीकाणी होर्डिंग्ज दिसतात. होर्डिंग्जच्या अशाही घटना पहायला मिळतात की वाहन चालवतांना लोकांचे लक्ष अचानक होर्डिंग्जकडे जाते अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात दुर्घटना सुध्दा झालेल्या आहेत आणि आता तर जाहिरातदारांनी जीव घेणे होर्डिंग्ज लावने सुरू केल्याचे दिसून येते.यावरून स्पष्ट होते की जाहिरातदारांना सामान्य नागरिकांच्या जीवाची अजीबात पर्वा नसावी,ही बाब मुंबईतील घाटकोपर व कल्याणमधील ४० फुटांवरून कोसळलेल्या होर्डिंग्जच्या दुर्घटनेवरून लक्षात येते.परंतु आता मुंबईतील दुर्घटना व कल्याण मधील दुर्घटना पहाता राज्यातील संपूर्ण महानगरपालिकांना जाग आल्याचे दिसून येते.नागपूर सुध्दा अवैध होर्डिंग्जच्या बाबतीत अग्रेसर आहे.शहरातील बाजारपेठ, मुख्य रस्त्यांवरील इमारती, शासकीय कार्यालय परिसर, याठिकाणी होर्डिंग्जचे मोठमोठे सांगाडे उभे आहेत.घाटकोपरची व कल्याणमधील घटना पहाता नागपूरसह राज्यातील अनेक शहरांमध्ये होर्डिंग्जच्या बाबतीत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वादळी वारा व पाऊसाळा पहाता राज्याच्या स्थानिक प्रशासनाने संपूर्ण होर्डिंग्जचे कसुन ऑडिट करायला हवे,जेणे करून घाटकोपर किंवा कल्याण सारख्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. त्यामुळे जाहिरातदार, स्थानिक प्रशासन व सरकार यांनी सामान्य नागरिकांच्या दृष्टीकोणातुन होर्डिंग्जच्या बाबतीत “जान है तो जहान है” हा मुलमंत्र जोपासायला हवा व अवैध होर्डिंग्जच्या बाबतीत कठोर कारवाई करावी.सध्या वादळी वारा व पावसाळ्याचे दिवस सुरु आहे त्यामुळे होर्डिंग्जच्या आजुबाजुला नागरिकांनी उभे रहातांना सावधगिरी बाळगावी दुर्घटनांपासुन स्वतःचा बचाव करावा.
लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी, नागपूर)
मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.