लोकं रस्त्यावर का उतरतात ? संतापाचा हा उद्रेक काय दर्शवितो ?
लोकं रस्त्यावर का उतरतात ? संतापाचा हा उद्रेक काय दर्शवितो ?
प्रा डॉ सुधीर अग्रवाल
कोलकत्ता असो की बदलापूर.. सगळीकडे एकच परिस्थिती असल्याचे पाहायला मिळतेय. तर अद्याप भय इथलं संपत नाही, अशीच काहिशी परिस्थिती देशात झाली आहे. पश्चिम बंगाल ते महाराष्ट्रातलं बदलापूर मुलींवरच्या अत्याचारावरुन दोन्ही राज्यात मोठा उद्रेक उसळलाय. बंगालमध्ये रुग्णालयातच तरुणी डॉक्टरची सामूहिक बलात्कारानंतर निर्घृण हत्या केली गेली. इकडे बदलापुरात एका शाळेत साडे ३ वर्षांच्या चिमुकल्या मुलींचं लैंगिक शोषण झालं. त्यावरुन दोन्ही घटनेविरोधात सामान्यांच आक्रोश उफाळून आला.
बदलापुरातले लोक इतके आक्रमक का झाले.? संतापाचा हा उद्रेक काय दर्शवितो? विविध प्रश्न या अनुषंगाने निर्माण होतात. लोकांमध्ये इतका संताप का उसळून येतो त्याचा हा घेतलेला आढावा.
बदलापूर येथील एका शाळेत १३ ते १६ ऑगस्ट या कालावधीत दोन लहान मुलींवर शाळेतील शिपायाने लैंगिक अत्याचार केला सदर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडून दिरंगाई केली गेली त्यानंतर संतापलेल्या पालकांसह हजारो नागरिकांनी मंगळवारी २० ऑगस्ट रोजी बदलापूर रेल्वे स्थानक आणि शाळेच्या बाहेर आंदोलन सुरू केले सकाळी दहा वाजल्यापासून हे रेल्वे स्थानकावर आंदोलन सुरू होते यामुळे बदलापूर ते कर्जत लोकल सेवा ठप्प झाली दरम्यान आंदोलन क्षणाक्षणाला आक्रमक होत होते आरोपी अक्षय शिंदे याला भर चौकात फाशी द्या अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली होती. पोलिसांनी सातत्याने आव्हान करूनही आंदोलक हटत नव्हते रेल्वे पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकारी मंत्री गिरीश महाजन यांच्यासहस्थानिक लोकप्रतिनिधींनी आंदोलकांची समजूत काढली. मात्र त्यानंतरही आंदोलक हटत नव्हते. त्यामुळे जवळपास नऊ ते दहा तास रेल्वे मार्ग ठप्प होता. दरम्यान आंदोलकांनी लाठ्या खाल्ल्यानंतर दगडफेक सुरू केली रेल्वे स्थानकातून हटवल्यानंतर स्थानकाबाहेर आंदोलक रेल्वे स्थानकात शिरण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. एकंदरीत शाळेतील मुलींचे जे लैंगिक शोषण झाले. त्या विरोधात उमटलेली ही पालकांची तीव्र प्रतिक्रिया होती… एवढाच अर्थ या जमावाचा घेता येईल काय? अर्थात नाही.. वारंवार अशा घटना घडत असताना शासन, प्रशासन, पोलीस, किती बेजजबाबदार वागतात… कायदा असूनही त्या कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी होत नाही.आरोपीला शिक्षा झालीच तर प्रकरण न्यायालयात जाते… कित्येक वर्ष न्यायालयाचा निकाल यायला लागतो..या दरम्यान सर्व परिस्थिती बदलून जाते. साक्षदार बलदून जातात.. अशा प्रकरणांमध्ये वकील आपली ताकद लावतात. मोठं मोठे वकील पुढे येतात..येणंकेन प्रकारे आरोपीला भरपूर वेळ मिळतो..पुढे असे गुन्हेगार निर्दोष देखील सुटतात.. भारतात अशा कितीतरी दुष्कृत्यांमधील घटनांमध्ये आरोपी मोकाट सुटलेले आहेत आणि बिनधास्तपणे आजही समाजात वावरत आहेत. परत गुन्हे करत आहे म्हणून अशा गुन्हेगाराला तात्काळ फाशी द्यावी अशी मागणी जमाव धरून लावून धरत असतो. हा या उद्रेकाचा जमावाचा उद्रेकाचा अर्थ. आहे..बदलापूर मध्ये संतापाचा जो उद्रेक बघायला मिळाला, जनक्षोप जो उसळला याचा अन्वयार्थ हाच की भारतात आरोपीला शिक्षण मिळण्याची जी प्रक्रिया आहे ती फार विलंब करणारी प्रक्रिया.. आरोपीला शिक्षा होईल याची शाश्वती नसते. म्हणूनच जनता रस्त्यावर येवून संताप व्यक्त करत असते..
न्याय मिळण्यासाठी विलंब हा न्याय नाकारला जातो हे स्पष्टपणे स्पष्टपणे समजते की जेव्हा कायदेशीर कार्यवाही लांबली जाते आणि वेळेवर निराकरण करण्यात अयशस्वी होते, तेव्हा न्यायाची मूलभूत तत्त्वे कमी होतात, प्रभावीपणे न्याय नपुंसक होतो. भारतीय न्याय व्यवस्थेच्या क्षेत्रात ही म्हण अधिक महत्त्वाची ठरते, जिथे खटल्याच्या विलंबाच्या चिंताजनक व्याप्तीमुळे कायदेशीर यंत्रणेच्या परिणामकारकतेवरील लोकांचा विश्वास उडाला आहे. या प्रास्ताविक विभागात, पेपर केवळ विलंबित न्यायाच्या मध्यवर्ती थीमचा परिचय देत नाही तर भारतीय संदर्भातील समस्येचे गांभीर्य देखील अधोरेखित करतो.
अजमेर मधील १०० पेक्षा जास्त मुलींवर ब्लॅकमेल करून बलात्कार करण्यात आला होता त्याचा निकाल आता ३२ वर्षानंतर आलेला आहे. या निकालात सहा जणांना जन्मठेप झालेली आहे. १९९२ मध्ये झालेल्या या सेक्स कॅण्डलने देशभरात खळबळ उडाली होती.
पीडित विद्यार्थिनी या स्थानिक शाळा आणि महाविद्यालयात शिकत होत्या त्यांची आक्षेपार्ह छायाचित्रे काढून त्या सार्वजनिक करण्याची धमकी देत त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला होता या प्रकरणी काही जणांवर१९९८ मध्ये पुन्हा खटला चालला होता. पिढी त्यांनी न्यायासाठी प्रादुर्ग लढा दिला शिक्षक कुटविण्यात आली त्यावेळी १६ पीडित न्यायालयात हजर होत्या न्यायासाठी प्रचंड त्रास त्यांना सहन करावा लागला अनेकदा तपास करण्यात आला अनेक वेळा उलट तपासणी झाली. एकंदरीत न्याय मिळण्यास भारतात फार विलंब होतो आणि म्हणून जनता संतापाचा उद्रेक करण्यासाठी रस्त्यावर येत असते.हा जमाव कायदा देखील हातात घेत असतो आणि मागणी करत असतो की क्रूर कर्म्याला फाशी द्या.
कोलकाता प्रकरणात हेच घडले. कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येमुळे पश्चिम बंगालसह संपूर्ण देशात मोठा संतापाचा मोठा उद्रेक निर्माण झाला..हा संताप तत्काळ न्यायाची मागणी करणारा आहे.. राज्यकर्त्यांवर पोलिसांवर कायद्यावर आता जनतेचा विश्वास राहिलेला नाही. गुन्हेगाराला भर चौकात फाशी द्यायला पाहिजे ही मागणी या संतापाच्या उद्रेकातून पुढे येत असते.
९५६१५९४३०६
———————–