…आला पावसाळा, बाहेरचे खाणे टाळा ! – मिलिंद गड्डमवार
…आला पावसाळा, बाहेरचे खाणे टाळा !
आज बहुतांश तरूणाई रस्त्यावरील फरसाणच्या ठेल्यावरील गुपचुप,समोसा,कचोरी, शेवचिवडा खाऊन आपले पोट भरीत असतात.हे ठेले गावातील,शहरातील रस्त्याला लागून असलेल्या नाल्यांवर उभारलेले असतात.यामुळे ठेल्यावरील पदार्थ हे हाॅयजेनीक आणि सुरक्षित नसतात.श्रावण मास सुरू झाल्याने जिकडे तिकडे माश्यांचे अस्तित्व नजरेस येत आहे.यामुळे काॅलरा,पटकी,विषमज्वर सारखे आजार जोर धरू शकतात.याबाबत अन्न प्रशासन सुध्दा जागरूक नसते.एखादी घटना घडल्यानंतरच आपल्याकडे कारवाई करण्याचा प्रघात पडलेला आहे. पावसाळ्यात शिळे अन्न पदार्थ खाऊ नये.यामुळे पोटाचे विकार जडू शकतात.पावसाळ्यात पिण्याचे पाणी गढूळ होत असल्याने ते गाळून व उकळून प्यावे असे आरोग्य विभागाकडून सांगितले जाते. याचा गांभीर्यपूर्वक विचार व्हायला हवा.तशी कृती हातून घडावयास हवी.असे होत नसल्याने दवाखान्यातील पेशंटमध्ये वाढ होतांना दिसून येते आहे.या पावसाळी वातावरणाचा परिणाम लहान मुलांवर, जेष्ठ नागरिकांवर लवकर होत असतो. त्यांची पाचनशक्ती ही पावसाळ्यात कमजोर झालेली असते.
आजकाल जो तो नौकरी करून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी धडपडतो आहे.यात स्त्रिया आघाडीवर दिसत आहेत.त्यांची आर्थिक बाजू भक्कम दिसून येते आहे.नौकरीतील स्त्रि वर्गाचे प्रमाण हे वाढते आहे.परंतु त्यांना आता घर आणि मुलं एवढेच करून भागणारे नाही.तर त्या आपले अधिकार गाजवू पहातात आहेत.याच कारणाने त्यांना स्वयंपाक करण्याची सवय सुध्दा राहिलेली नाही.ते झोम्याटो सारख्या अॅप चा वापर करून घरपोच वाटेल ते खाद्यपदार्थ मागवतात आहेत.याचा परिणाम त्यांच्या स्वास्थ्यावर होतो आहे.कारण या खाद्यपदार्थाने पोट तर भरते आहे परंतु ते आरोग्य विषयक समस्या निर्माण करते आहे.आज इंस्टंट फुडचा जमाना आहे.बर्गर,बटाटा पाव,समोसा,पाणीपुरी, मसाला दोसा,गोली पाववडा इ.सारखे मैदायुक्त आणि मसालेदार तेलयुक्त पदार्थ खाण्याने शरीर स्वास्थ बिघडते आहे.या पदार्थात कुठलेही जीवनसत्व आढळून येत नाहीत.यामुळे जीवनसत्त्वांची कमतरता जाणवत आहे.यासाठी जीवनसत्त्वाचे इंजेक्शन घ्यावे लागते आहे.ही आजची जीवनशैली झाली आहे.
* मिलिंद गड्डमवार, राजुरा
मो.क्र.9511215200