फिनले मिल श्रेय वादावरून आ.बच्चू कडू व आ.राणा यांच्यात शाब्दीक चकमक
फिनले मिल श्रेय वादावरून आ.बच्चू कडू व आ.राणा यांच्यात शाब्दीक चकमक – जिल्हा नियोजन समितीची बैठक ठरली चर्चेचा विषय
आ.बच्चू कडू हे आयत्या घरातील नागोबा – आ.रवि राणा
आ.राणा यांनी आपला मतदार संघ सांभाळावा – आ.बच्चू कडू
—————————————–
अमरावती/E T News
जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांच्या उपस्थित ४ आॅगस्ट रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अचलपुर मतदार सघाचे आमदार बच्चू कडू आणि आ. रवि राणा यांच्यात अचलपूर येथील फिनले मिल श्रैय वादावरून खडाजंगी झाल्यामुळे शासकीय कार्यालयातच वातावरण तापले होते.
काही दिवसापूर्वीच देवेंद्र फडणवीस याच्या सोबत झालेल्या बैठकीत फिनले मिल साठी २० कोटी रूपये मंजुर झाले. त्यामुळे कित्येक वर्षापासून बंद पडलेली फिनले मिल पुन्हा सूरू होण्याचा मार्ग सुकर झाला. मात्र याच मुद्यावरून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चक्क पालकमंत्री चंद्रकात पाटील याच्या समोरच अचलपूरचे आमदार बच्चू कडू आणि बडनेरा मतदार संघाचो आमदार रवि राणा यांच्यात श्रैय वादावरून शाब्दीक चकमक पहावयास मिळाली. आमदार राणा यांनी फिनले मिल पुन्हा सूरू होण्यासाठी पाच ते सहा वर्षापासून राज्य तसेच केंद्र शासनाकडे पाठपुरावा करीत असल्याचे सागुन माजी खासदार नवनित राणा आणि मि स्वता या संदर्भात अनेक बैठका घेवून हा प्रश्न मार्गी लावल्याचा दावा केला तर दुसरीकडे आ.बच्चू कडू यांनी देखील फिनले मिल सूरू करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असुन त्या संदर्भात शासकीय पुरावे देखील असल्याचे सांगितले.त्यामुळे नियोजन भवनात दोघांमध्ये शाब्दीक खडाजंगी पहावयास मिळाली.
आ.बच्चू कडू हे आयत्या घरातील नागोबा – आ.रवि राणा
अचलपूर मतदार संघातील गेल्या पाच ते सहा वर्षा पासून फिनले मिल बंद असून कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.अशा परिस्थीतीत माजी खासदार नवनित राणा यांनी केंद्रीय मंत्र्याकडे पाठपुरावा करून फिनले मिल सुरू करा यां संदर्भात बैठकी घेतल्या.तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत बैठकी घेतल्या आहे. जे केले नाही त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये.आयत्या पिठाचा नागोबा होण्याचा प्रयत्न करू नये. स्वताच्या मतदार संघातील विकास भकास आहे. तरीही मी त्यांना आवाहन करतो की त्यांनी या संदर्भात मी चर्चे साठी तयार आहे. आ.बच्चू कडू हे तोडी बहाददर असून निवडून आणण्यासाठी आणि पाडण्याासाठी देखिल पैसे घेतात. माजी खा. नवनित राणा यांना पाडण्यात बच्चू कडू याचा मोठा वाटा आहे.
————————————++++++————-
आ.राणा यांनी आपला मतदार संघ सांभाळावा – आ.बच्चू कडू
एक वर्षाआधी लक्षवेधी मध्ये फिनले मिल ही केंद्राने किंवा राज्य सरकारने चालवायला घ्यावी.अन्यथा पैसे द्यावेत अशी अट ठेवण्यात आली या सदर्भात चंद्रकांत पाटील तसेच मुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक घेवून या सदर्भात त्यांना पत्र दिले ते पत्र माझ्याकडे आहे.त्यामुळे एक वर्षा आधिच राज्य सरकारने २० कोटी देण्याची कबुली दिली असतांना त्यावर श्रेय वादाचा विषयच येत नाही.स्वताच्या मतदार संघातील दोन मिल बंद आहे. तेथील कामगार उपाशी मरत आहे. त्यांना घर नाही जागा नाही. त्यांच्याकडे लक्ष द्यावे खासदार आणि आमदार असतांना देखिल हा प्रश्न सोडवू शकले नाही त्यानी दुसºयाच्या मतदार संघात लक्ष घालण्याची गरज नाही.
———————————————+++++———