गटारीत काम करणाऱ्यांच्या मुलांचे भवितव्य – वीरेंद्र गणवीर (नाटककार )
शाळा प्रवेश दिनी विद्यार्थ्यांचा सन्मान
नागपूर/ E T News
सर्वस्वी अंधारलेल्या वाटेत काळकुटट जिवन जगणाऱ्यांच्या वेदना आजच्या आधुनिक जगात संवेदनाहीन झालेल्या असताना शिक्षकांचा हा उजेळ पाडणारा प्रयत्न निश्चितच भविष्यात मोठ्या प्रकाशात परिवर्तित होईल असे नुकत्याच गर्वमेंट पब्लिक स्कूल, वाठोडा , नागपुरतील स्विपर ( वाल्मिकी) विशेष निवासी शाळेतील विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश दिन मुलांचे स्वागत करून मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध नाटककार – दिग्दर्शक वीरेंद्र गणवीर बोलत होते. ते पुढे म्हणाले हजारो वर्ष जे शिक्षणा पासून वंचित आहेत. पिढ्यानपिढ्या ज्या समाजातील आयुष्य गटारीत खितपत पडलेल आहे . अश्या मुलांसाठी शिक्षणाबरोबर त्यांच्यात सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टीने शिक्षणातून सांस्कृतिक बदल घडवून त्या मुलांच्या आयुष्याला वैश्विक पातळीवर उभे करणे गरजेचे आहे. तरच पूर्ण परिवर्तन शक्य होईल. या वेळी शाळेचे प्रविण कौंडलकर (मुख्याध्यापक), श्री रजनीकांत नंदनवार (सहायक शिक्षक), श्री तुषार राऊत ( सहायक शिक्षक) श्री संतोष गौरे ( वॉर्डन) ह्यांनी आपली मते मांडून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. या शाळा प्रवेश दिनी विद्यार्थ्यांवर गुलाब पुष्पांचा वर्षाव करून, त्यांना चॉकलेट्स व पुस्तके भेट सुद्धा देण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन अपर्णा मसराम तर आभार प्रीती पाटील यांनी मानले. या वेळी शिक्षक व विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .
Amazing! Its genuinely awesome paragraph, I have got much clear
idea on the topic of from this post.