Breaking
ब्रेकिंग

निघू दे दिवस मंगल तो, बघाया भारता ! तुजला ! : प्रजासत्ताक दिन विशेष

0 1 8 5 2 1

निघू दे दिवस मंगल तो, बघाया भारता ! तुजला !

प्रजासत्ताक दिन विशेष

१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला हे जेवढे सत्य आहे. तेवढेच सत्य हे पण समजून घ्या की, भारत हा स्वातंत्र्या आधी अनेक लहाण लहाण राज्य त्याला आपण देशही म्हणू शकतो यात खंडीत होता. त्यावर राजे महाराजे राज्य करीत होते. त्यांचे स्वतःचे स्वतंत्र कायदे आणि राज्यव्यवस्था होती. स्वातंत्र्याच्या काही काळानंतर कुठे प्रेमाणे तर कुठे जबरीने ते देश भारतीय खंडात वीलीन झाले. काश्मीर, हैद्राबाद संस्थान, कोल्हापुर संस्थान. पांडेचरी डच शासन, गोवा पोर्तृगीज शासन अशाच आणखी छोट्या संस्थानाचा यात समावेश आहे. यातूनच निर्माण झाला आजचा अखंड भारत ज्याने २६ जानेवारी १९४९ ला संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून देशाला अर्पण केले. संविधान निर्मात्यांनी सर्वानुमते भारताची संविधान प्रास्ताविका लिहली –

” आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस :

सामाजिक, आर्थीक व राजनैतिक न्याय ;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा

व उपासना यांचे स्वातंत्र्य ;

दर्जाची व संधीची समानता ; 

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा

व राष्ट्राची एकता आणि एकात्मता

यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्थित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून ;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी 

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत “

मित्रांनो आम्ही साठी ओलांडल्यांची पहिली पीढी ही पुस्तकी शिक्षणाने शिक्षीत झालेली. पण मला वाटत आज सर्वच शिक्षीतांनी ‘भारताचे संविधान’ प्रास्ताविका वाचून त्याचा अर्थ समजून घेतला असेल असे मी समजतो. कारण या विषयावर अनेक चर्चा देशात घडत असतात. त्या निरर्थक वादात मला पडायचे नाही.

२६जानेवारी १९५० ला भारताचे संविधान लागू झाले. जगातल्या एका मोठ्या लोकशाहीचा लोककल्यानाचा मार्ग मतपेटीतून निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधीच्याद्वारे सुरू झाला. आज या लोकशाहीने आपल्या वयाची पंच्यात्तरी कठीण परीस्थीतीतून गाठली. कारण हा देश विवीध जाती, पोटजाती, धर्म,पंथ, संप्रदाय, भाषा अशा विवीधतेत विखुरलेला आहे. भारतीय जनजीवनाला माणूस म्हणून जगण्याचा स्वाभीमान भारतीय संविधानाने बहाल केला. संविधान निर्मीतीत मोठे योगदान देणारे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भारताच्या संविधाना विषयी म्हणाले होते, ” संविधान कितीही चांगले असेल पण त्याची योग्य अमलबजावणी केल्या गेली नाही तर त्याचे वाईट परिणाम भारतीय जनजीवनावर होतील. ” असा आशय त्यांच्या बोलण्याचा असावा.

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अल्पशिक्षीत मराठी चारही वर्ग पूर्ण न शिकलेले पण भारतीय लोकशाहीची योग्य मिमांसा करतात. ते ग्रामगीतेत लिहतात-

जनतंत्राचा हा काळ I शक्ति लोकाअंगीच सकळ ।

जनतेच्या निश्चयाचे बळ । साम्राज्यासहि नमवू शके ॥१४॥ ग्रा.अ.११

निवडणुकीची चालू प्रथा I हीच मुळी सदोष पाहता ।

म्हणोनि योग्य दृष्टी द्यावी समस्ता । गाववासिया ॥६६॥ ग्रा.अ. १०

जीवनाची जबाबदारी I किती आहे निवडणुकीवरि ।

हे पटवोनि निवडणूक खरी I करवावी न गोंधळता ॥६७॥ ग्रा.अ.१०

भारतीय लोकशाहीत कोण जनप्रतीनीधी बनन्याचा लायकीचा आहे. ह्याची मांडणी राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेच्या अनेक ओव्यांमधून केली.

अहो ! पुढारीपण कशाला ? । सेवा गावाची करावयाला ।

मग सेवेची कसोटी लावा की आपुला । समजेल पुढारी कोण तो ॥६९॥ ग्रा. अ. १०

कोण नीतीने असे चांगला ? । पक्षपात न आवडे कोणाला ? ।

छदामासि नसे लाजीम झाला । गाव-निधीच्या ॥७२॥ ग्रा.अ. १०

कोण सर्वांचे पाहतो सुख, दु:ख I कोणाचे दिसे सेवेसाठी मुख ।

हीच त्याची जाणावी ओळख । निवडावया ॥७३॥ ग्रा.अ. १०

मला वाटत भारतीय लोकशाहीला मजबूत करणारे आम्ही सुजान नागरीक लोकप्रतीनीधी नीवडतांना खरच विचारपूर्वक मतदान करतो का ?

भारतीय स्वातंत्र्यानंतर सुराज्याच स्वप्न स्वातंत्र्य संग्रामात लढणाऱ्यांनी पाहले. १९४२ ला ‘इंग्रजांनो भारत सोडा’ ‘चालते व्हा’ या महात्मा गांधीच्या हाकेला विदर्भात क्रांतीची धार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनांनी जनमानसात निर्माण केली.

अब काहेको धूम मचाते हो , दुखवाकर भारत सारे ?

आते है नाथ हमारे ॥

झाडझडुले शस्त्र बनेंगे, भक्त बनेगी सेना ।

पत्थरसारे बाँम बनेंगे, नाव लगेगि किनारे ॥

विदर्भातील लोकसमुह अशा भजनांनी राष्ट्रभक्तीनें पेटला. राष्ट्रसंतांच्या भजनांनवर बंदी आणून त्यांना नागपूरच्या तुरूंगात बंदीस्थ केले. तरीही विदर्भातील जनआंदोलन थांबत नव्हते. राष्ट्रसंताना रायपूरच्या तुरूंगात हलवीले. असा हा राष्ट्रधर्माची शिकवन देणारा संत भारतीय लोकशाही संबधात भजनातून मांडणी करतो.

निघू दे दिवस मंगल तो, बघाया भारता ! तुजला I

अवकळा लोपुनी सारी, मिळो सुखशांती सकळाला ॥

राष्ट्र बलवान हो रक्षो, सदा अपुल्या स्वराज्यासी ।

पुर्णता लोकशाहीची, भुकेला जीव बघण्याला ॥

कोणत्या लोकशाहीच स्वप्न या महापुरूषांणी बघीतले होते. स्वातंत्र्याच्या आणि प्रजातंत्राच्या ७५ वर्षानंतर आजही जात, धर्म, पंथ, संप्रदायासाठी आम्ही आपसात भांडतो. आमची माणूसकी आज तर संपण्यात जमा नाही ? आम्हि सत्तरच्या दुष्काळ अन्न धान्याचा तुडवडा पाहला. कडधान्य, तुरी उकळून खाल्या, मोहाच्या भाकरी, विदेशातील मीलो डुकराच खाद्य, त्याच्या भाकरी खाऊन उपासमार भागवली. पण माझ्या शेतकरी, शेतमजुरांनी कधी आत्महत्या केली नाही. काल गावखेड्यात जातीचे समुह होते. पण एकमेकाचे कट्टर दुष्मण कधी झाले नाही. गरीबाच्या झोपडीतल्या मुलीच लग्न गावच्या सहकार्यातून व्हायच. ती गावाची मुलगी असायची. गावकरी कर्तव्य म्हणून असे प्रसंग पार पाडायचे. हे आपुलकीच नात, ती सहकार्याची भावना आज कुठे लोप पावली ? कुठली शासकीय योजना नसतांना आम्ही जीवनाचा आनंद शोधत होतो. शिक्षणाने मानवी मन जोडून एक बलशाली भारत उभा झाला का ? 

मिटो अस्पृश्यता सगळी, कळो मान्यवता समता ।

भेद श्रीमंत -गरीबाचा, न भासो भावि कोणाला ॥

कळो चारित्र्यता सगळ्या, नीति जी रामराज्याची ।

नष्ट हो दुर्व्यसन आता, मिळो उद्योग जनतेला ॥

राष्ट्रसंतांच सामाजीक चिंतन , डीग्रीच्या अहंकाराने ग्रस्थ पुस्तकी ज्ञानीयांना अचंबीत करणार आहे. अस्पृश्यतेचा कलंक आज नाही अस काही शाहणे बोलतात. तंबाखु, घुटका खातांना, दारूचे घोट आपसात वाटून घेतांना अस्पृश्यता संपली असेल. जेवनावळीतून कदाचीत अस्पृश्यता संपली असेल. पण छुप्या व्यवहारात ती कालपेक्षाही आज जास्त उफाळून आलेली दीसते. त्याचे चटके आजही समाजजीवनात झोंबतांना दीसतात. यावर रोज वाद-सवांद आमच्या देशात घडतात. ही अस्पृश्यता अतीशिक्षीत अथवा अती श्रीमंत परिवारात संपलेली दीसते. पण सर्वसामान्य भारतीय आजही त्या अस्पृश्यतेशी लढतो आहे. कालच्यापेक्षा आज जास्त जात आणि पोटजात आम्हाला कळायला लागली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महात्मा गांधी यांनी कुठल्या रामराज्याची कल्पना केली होती.

ग्रामराज्यचि रामराज्य । स्वावलंबन हेचि स्वराज्य ।

बोलिले महात्मा विश्वपूज्य । विकास त्याचा सुंदर हा ॥१२५॥ग्रा.अ. ३९

राष्ट्रसंत म्हणतात याच भूतलावर आम्हाला स्वर्ग निर्माण करावयाचा आहे ज्याला ते ‘भू-वैकूंठ’ म्हणतात.

भिकारी ना दिसो कोणी, आळसी ना असो कोणी ।

मिळो बहुमान मातांना, जसा देशात पुरूषाला ॥

दुःखवो ना कुणी केव्हां, भावना अन्य धर्माच्या ।

प्रिय आपुल्यास जो जैसा, प्रिय हो अन्य सकळाला ॥

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभिप्रेत असलेल्या लोकशाहीचे मुल्य भारतीय संविधानात दिसतात. स्वातंत्र्य, समता, ममता, न्याय, बंधुता, स्त्री-पुरूष समानता, धर्मउपासनेचे अधीकार याचे आज प्रजासत्ताकाची पंच्यात्तरी गाठतांना चिंतन करावे लागते. आज प्रसीद्धी माध्यमातल्या बातम्या खुन, आत्महत्या मानवी मनाला अस्वस्थ करतात. गुंडप्रवृत्तीचा सर्व क्षेत्रातला शिरकाव यावर प्रहार करतांना राष्ट्रसंत लिहतात-

दुष्ट, खल, गुंड, छल-द्वेषी, म्हणें तुकड्या नको आता ।न्याय-सत्ता बघो त्यांना, मनोभ्रम दुर करण्याला ॥

जग ज्या भारतीय लोकशाहीकडे एका मोठ्या आशेने पाहते. कारण साम्रज्यवादी देशांना कौतुक वाटते की विवीधतेत वीखुरलेला देश हा एक दीलाने कसा राहतो. याला तडा देणाऱ्या जागतीक षडयंत्राचा भाग भारताने होऊ नये असे प्रत्येक भारतीयांना वाटत असावे ? भारतातील मोठी लोकसंख्या आजही मोफत अन्नावर जगत असेल, विदेशी तंत्रज्ञानावर आजही भारत अवलंबून असेल तर आम्ही कुठल्या प्रगतीच्या गप्पा करतो ? शिक्षण आणि आरोग्याच्या सोयी भारतीय संविधानाने दीलेल्या हक्काचे बाजारीकरण कुठला भारत घडवणार ? हो आमच्या लोकशाहीत विश्वगुरू बनण्याची महाशक्ती आहे. युवाभारताची लोकशक्ती आणि नैसर्गीक साधनसंपत्ती आमच्याकडे मुबलक आहे. पण जगातील साम्राज्यवादी देश आमच्याकडे मोठी बाजारपेठ म्हणून पाहतात. चायनाच्या वस्तुने आमच्या बाजारपेठा व्यापल्या आहे. स्वदेशीचा नारा दील्याने भारत विवीध क्षेत्रात स्वालंबाकडे जाणार नाही. शब्दाचे बुडबुडे हे फुटणारे असतात. आमची मुल भारतात शिकुन आज विदेशाची गुलामी करतात हा कुठला स्वाभीमान आम्ही तरूण पीढीत रूजवतो आहोत ? सत्तेच्या राजकारणाचे दोष दाखवत आपण भारतीय लोकशाहीला कुठे घेऊन जात आहोत ? कोण करणार चिंतन ? मित्रांनो आपल्यातली राष्ट्रभक्ती आज तपासण्याची वेळ आलेली आहे. उठा जागे व्हा आपल्या कर्तव्याला जागा. ‘ दोष अपनेही देखो, उसे सुधारनेको सिखो’ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका लेखात लिहतात-

‘ मित्रांनो, भारत स्वतंत्र झाला, एवढेच नव्हे, तर इथे लोकतंत्र राज्य निर्माण झाले; पण लोकतंत्र राज्य किंवा लोकशाही केंव्हा म्हणता येईल जेव्हा लोक आपलं राज्य अशी जाणीव करूण घेतील. किंबहूना, त्याप्रमाणे आपआपली जवाबदारी पूर्णपने पार पाडतील तेव्हा प्रत्येक गाव जोपर्यंत आपला कारभार व्यवस्थित चालवू श्कत नाही, स्वतःच्या पायावर स्वावलंबाने उभं राहून आपला विकास करू शकत नाही, तोपर्यंत हा देश ‘प्रजातंत्र राज्याला लायक झाला’ असे म्हणताच येणार नाही. ‘

मित्रांनो फक्त एक दिवस राष्ट्रभक्ती दाखवीत ‘ भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो ‘ चे नारे दिल्याने आपल कर्तव्य संपत नाही. ग्रामगीतेत राष्ट्रसंत लिहतात ती क्रांतीची हाक आम्हाला कळावी-

अरे ! उठा उठा श्रीमंतांनो ! अधिकाऱ्यांनो ! पंडितांनो ! ।

सुशिक्षितांनो ! साधुजनांनो ! । हाक आली क्रांतीची ॥११४॥ ग्रा.अ. १७

: ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक

अभ्यासक राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा

9823966282

5/5 - (1 vote)

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 5 2 1

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे