महायुतीच्या काळात महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हे प्रगतीचे द्योतक : भाजपा नेते डॉ. अनिल बोंडे यांची पत्रकार परिषदेत माहिती
महायुतीच्या काळात महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हे प्रगतीचे द्योतक
भाजपा नेते डॉ. अनिल बोंडे यांची पत्रकार परिषदेत माहिती
जिल्ह्यात महासंपर्क अभियानाला थाटात प्रारंभ
अमरावती : महायुतीच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होत आहे. लाडकी बहीण, शेतकरी, युवा, समाजातील विविध वर्ग, समाज घटक यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून महाराष्ट्राची मजबुतीने वाटचाल सुरू आहे, हे राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या प्रगतीचं द्योतक आहे, असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी येथे केले.
शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत जिल्ह्यात भाजप तर्फे महासंपर्क अभियानाला थाटात सुरुवात झाल्याची माहिती दिली. भाजपा अमरावती ग्रामीण तर्फे आयोजित पत्रकार परिषदेला आमदार प्रताप अडसड, माजी आमदार रमेश बुंदिले, केवलराम काळे, प्रभुदास भिलावेकर, दिनेश सूर्यवंशी किरणताई महल्ले, राजेश वानखडे, अनिता तिखिले, रविराज देशमुख, महामंत्री नितीन गुडधे, विवेक गुल्हाने, मनोहर लेवटे, सुखदेव पवार, संजय घुलक्ष्ये, प्रवीण तायडे, विलास कविटकर, रमेश मावस्कर, रावसाहेब रोठे, रेखा मावसकर, नकुल सोनटक्के, अजिंक्य वानखडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी माहिती देताना भाजप नेते अनिल बोंडे म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत न भूतो न भविष्यती यश गाठण्यासाठी भाजप सज्ज झालेली आहे. भाजप तर्फे जिल्ह्यात महासंपर्क अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. शक्ती केंद्रांवर बैठका, बूथ चे नियोजन करणे, प्रत्येक बुथवर बैठका घेऊन भाजपला संघटनात्मक दृष्ट्या मजबूत करणे, घर चलो अभियान इत्यादी कार्यक्रम जिल्ह्याच्या चौदाही तालुक्यात प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याची माहिती डॉ. अनिल बोंडे यांनी दिली. ते म्हणाले की, लाडक्या बहिणींना महायुतीच्या सरकारनं चांगला निर्णय घेऊन बळ दिल आहे. त्या अनुषंगाने भाजपने जिल्ह्यात आतापर्यंत 39 लाडक्या बहिणींचे मिळावे घेतले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. एक लाख लाडक्या बहिणीपर्यंत भाजप पोहचली आहे. सरकारने मानधन दिल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव आहेत. प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न भाजप तर्फे सुरू आहे. सारथी-बार्टीतीच्या धरतीवर अनेक महापुरुषांच्या नावाने महायुती सरकारने महामंडळ निर्माण केली आहेत. खाटीक समाज महामंडळ, बारी समाज महामंडळ, तेली समाज महामंडळ, मत्स्य महामंडळ, काशीबा आर्थिक विकास महामंडळ इत्यादींचा त्यामध्ये समावेश आहे. प्रत्येक समाजाला मुबलक रोजगार मिळावा. तरुण-तरुणाईच्या कौशल्याला पाठबळ मिळावे यासाठी सर्व समाज घटकांचा विचार लक्षात घेऊन महायुती सरकारची वाटचाल सुरू आहे. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने महा सभासद अभियानाला देखील सुरुवात केलेली आहे. भाजप हा कार्यकर्त्याला प्राधान्य देणारा पक्ष आहे. राष्ट्राच्या आणि देशाच्या उन्नतीसाठी झटणारा भाजप पक्ष आहे. त्यामुळे ही भावना जगाच्या पातळीवर एकमेव भाजप पक्षात असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य नकुल सोनटक्के यांनी केले.
_____
*4 ऑक्टोंबर पासून जिल्ह्यात अभियान सुरु*
भाजप तर्फे जिल्ह्यात 4 ऑक्टोंबर पासून महासंपर्क अभियान सुरू झाले आहे. मंडळ प्रभारी यांना सोबत घेऊन बुथचे नियोजन करणे, शक्ती केंद्रांवर बैठका घेणे, प्रत्येक बूथभर बैठका घेणे, बुथ पालक नियुक्त करणे, मतदार याद्या पोहोचवणे, बचत गटांच्या बैठकी घेणे, आजी-माजी पदाधिकाऱ्यांची संमेलन घेणे, प्रत्येक बुथ मधील लाभार्थ्याची यादी तयार करणे, प्रत्येक नागरिकांशी संपर्क करणे, प्रभावी मतदार त्यांची संपर्क करणे यासह अन्य कार्यक्रम भाजपच्या महासंपर्क अभियानादरम्यान राबविले जात आहेत. चार ते सहा ऑक्टोबर या काळात शक्ती केंद्रांवर बैठका, ६ ते ७ ऑक्टोबर पर्यंत महाजन संपर्क अभियान, 10 ऑक्टोबर पासून प्रत्येक बूथ वर बूथनिहाय बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत अशी माहिती देखील अनिल बोंडे यांनी दिली.