सर्वसामान्यांना न्याय देणारे नेतृत्व श्री जयंत आनंदराव दळवी
सर्वसामान्यांना न्याय देणारे नेतृत्व श्री जयंत आनंदराव दळवी
विशेष मुलाखतीत श्री जयंत दळवी यांनी कामठी मतदारसंघाच्या विकासासाठी आणि बेरोजगारी दूर करण्यासाठी आपले विचार मांडले. त्यांनी सांगितले की, कामठी आणि मोदा येथे नवीन MIDC निर्माण करायची आहे. कामठीमध्ये असलेल्या कुशल बुनकरांमुळे तिथे टेक्सटाईल क्लस्टर उभारण्याची योजना आहे. प्रत्येक शाळेत आणि मोहल्ल्यात महिलांसाठी मोफत जुडो कराटे प्रशिक्षण सुरू करायचे आहे. गरीब, हुशार विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळावे यासाठी मोफत वाचनालयांची स्थापना करण्याची त्यांची योजना आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये (PSC) पूर्णवेळ डॉक्टर, कर्मचारी, औषधी पुरवठा, आधुनिक यंत्रे आणि अम्बुलन्स उपलब्ध करायची आहे. सिमेंट रस्त्यांचे चुकलेले नियोजन दुरुस्त करून जे सांडपाणी लोकांच्या घरांमध्ये जाते ती समस्या दूर करण्याची व्यवस्था करण्यात येईल.
मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे आणि राज्यमंत्री सुलेखाताई कुंभारे यांच्या मदतीने, दळवी आणि त्यांचे सहकारी राजू वैद्य आणि डी. डी. सोनटक्के यांनी हुडकेश्वर-नरसाळा भागातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी पाण्याच्या टाकीची मंजुरी मिळवली. केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्या प्रयत्नाने वडगाव धरणातून पाणी पुरवठा सुनिश्चित केला. तसेच मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांच्याकडे हुडकेश्वर-सालई रोड २० टन क्षमतेचा करण्याची मागणी करण्यात आली होती.
कोरोना काळात सरकारने प्रॉपर्टी खरेदी-विक्रीवरील स्टॅम्प ड्युटी ७ टक्क्यांवरून २ टक्क्यांवर आणली होती. या सवलतीला आणखी २ महिन्यांची मुदतवाढ मिळावी म्हणून पत्रव्यवहार करण्यात आला आणि त्यानुसार जनतेला मुदतवाढ देण्यात आली. सरकारने नागपूर ग्रामीण भागातील प्रॉपर्टी खरेदी-विक्री ची रजीस्ट्री बंद केली आहे, ती सुरू करण्यासाठी पत्रव्यवहार सुरू आहे.
हुडकेश्वर-नरसाळा हा भाग ग्रामपंचायतीतून महापालिकेत आल्यानंतर NMRDA ने १२० रुपये प्रति चौरस फूट विकास शुल्क आकारले होते. हे शुल्क माफ करून घरे आणि प्लॉट नियमित (RL) करावेत, आणि DP प्लॅन मंजूर करून लवकर विकास कामे सुरू करावीत, यासाठी आंदोलन करण्यात आले.
गेल्या ३० वर्षांपासून श्री दळवी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. कामठी तालुक्यात आदर्श गाव योजनेच्या अंतर्गत १ कोटी ६० लाख रुपयांची योजना मंजूर करण्यात आली. आमदार देवरावजी रडके ,सभापति पूर्शोत्त्म् शहाने,सरपंच रामाजी खोडके, रमेश चांभारे ,रामचंद्र दुधुके यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबवण्यात आली. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे बसपा चे काशीरामजी व मायावतीजी यांच्या नेतृत्वाखाली त्यांना नागपूर – कामठी लोकसभे ची उमेदवारी मिळाली. त्यानंतर त्यांची कार्यक्षमता पाहून माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख , मुकूल वासनिक,प्रभा राव , माणिकरावजी ठाकरे , नाना गावंडे, सुनीता गावंडे, दिपक काटोले ,यांनी त्यांच्या त्यांच्या कार्यकाळात त्यांची विविध पदांवर नियुक्ती केली होती
बेरोजगारांसाठी स्व-रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी श्री. दळवी उद्योग व्यवसायाचे मोफत मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करत असतात. नागपूर ग्रामीण भागात प्रॉपर्टी व्यवसायातील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे. त्यांनी विदर्भ लँड डेव्हलपर्स असोसिएशनची स्थापना करून तरुणांना प्रॉपर्टी व्यवसायात सामील होण्यासाठी प्रोत्साहन दिले. बेसा, बेलतरोडी, हुडकेश्वर आणि विपळा या भागांमध्ये प्रॉपर्टी व्यवसायाचा विकास झाला आहे.
कामठी विधानसभा क्षेत्रात एकूण ४,९९,००० मतदार आहेत, त्यात नागपूर ग्रामीण भागात १,६५,००० मतदार आहेत. मागील २० वर्षांपासून भाजपचे आमदार या भागातून लीड घेऊन निवडून येत आहेत. परंतु जर काँग्रेसने यावेळी श्री. दळवी यांना उमेदवारी दिली, तर ते नक्कीच निवडून येतील, कारणं त्यांचं गेल्या ३०वर्षा पासून या भागात मोलाच कार्य आहे व स्थानिक उमेदवार असल्या मुळे ते या भागातून फार मोठ मत घेतील याची त्यांना खात्री आहे.
हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सर्वपक्षीय नेत्यांनी श्री. दळवी यांची नियुक्ती केली. होति तसेच अखिल कुणबी समाजाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्व गटांनी त्यांना अविरोध संचालक म्हणून निवडले होते
ते सर्व पक्षाला व गटांना चालणारे व्यक्ती आहेत त्या मुळे त्यांचा विजय हा निश्चित आहे असे त्यांनी सांगितले