Breaking
ब्रेकिंग

अमेरिका : बेड्या घालणे हा भारतीयांचा अपमान !

0 1 8 5 2 1

अमेरिका : बेड्या घालणे हा भारतीयांचा अपमान !

अमेरिकेत बेकायदेशीरपप्राणे राहणाऱ्या भारतीयांना घेऊन अमेरिकन लष्करी विमान अमृतसरमध्ये उतरले. अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या १०४ भारतीयांना बुधवारी ‘डिपोर्ट’ करण्यात आले. यात नागपूरच्या एका तरुणाचा समावेश आहे. हरप्रीतसिंग लालिया असे या तरुणाचे नाव असून तो गुरुवारी नागपुरात परतला.

अमेरिकेत बेकायदेशीर पणे राहणाऱ्या भारतीयांना हाथ पायात बेड्या घालून ज्या पद्धतीने भारतात पाठविण्यात आले..तो प्रकार अमानवीय व तितकाच निंदनीय आहे. अमेरिकेत बेकायदेशीरपणे भारतीय नागरिक राहत असेल तरी ते छुप्या मार्गाने गेले नव्हते, है नागरिक चोर,लुटारू व डाकू देखील नव्हते किंवा.गुप्तहेर देखील नव्हते..त्यामुळे अमेरिकेच्या या प्रकारावर प्रश्न उपस्थित केले जात आहे.भारतीय संसदेतही याचे पडसाद उमटले.भारतीय संसदेतील विरोधी पक्षाच्या खासदारांनी ते अपमानास्पद म्हटले. 

अमेरिकेतून हद्दपार करून भारतात पाठवलेल्या बेकायदेशीर स्थलांतरितांच्या मुद्द्यावरून रस्त्यांपासून संसदेपर्यंत गोंधळ सुरू आहे. विरोधी पक्षाचे खासदार हातकड्या घालून याचा निषेध करत आहेत. दरम्यान, अनेक विरोधी खासदारांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील मैत्रीचा उल्लेख करून या घटनेचा निषेध केला.

काँग्रेस खासदार प्रियांका गांधी म्हणाल्या की, मोदी आणि ट्रम्प हे खूप चांगले मित्र आहेत असे बरेच बोलले जात होते. मग मोदींनी हे का होऊ दिले? मानवांना अशा पद्धतीने वागवले जाते का की त्यांना हातकड्या आणि बेड्या घालून पाठवावे? ही काही पद्धत आहे का? पंतप्रधानांनी उत्तर द्यावे. 

दरम्यान, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संसदेत स्पष्टं केले होते की, अमेरिकेला भारतीय नागरिकांशी लोकांशी मानवतेने वागण्यास सांगण्यात येईल,मात्र अमेरिकेने भारतीयांशी अमानवीय व्यवहार करत मानवी अधिकारांचे उल्लंघन केले आहे.

न्यू यॉर्क टाईम्सने लिहिले आहे की, “मोदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना प्रिय मित्र म्हणून संबोधतात. त्याच वेळी, भारताला आशा होती की अमेरिकेतून स्थलांतरितांना माघारी घेण्याची घोषणा करून, कोलंबिया आणि ब्राझीलप्रमाणे लाजिरवाणेपणाचा सामना करावा लागणार नाही. पण परतल्यानंतर, भारतीय स्थलांतरितांनी सांगितले की त्यांना ४० तास हातकड्यांमध्ये ठेवण्यात आले आणि त्यांना शौचालयातही जाऊ दिले गेले नाही.

न्यू यॉर्क टाईम्सने नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासाच्या प्रवक्त्याला विचारले की मुलांना आणि महिलांनाही हातकड्या घालून आणण्यात आले होते का? तथापि, अमेरिकन दूतावासाने या प्रश्नाचे उत्तर दिले नाही.मात्रसुखपालचे वडील प्रेमपाल सिंग यांनी न्यू यॉर्क टाईम्सला सांगितले की, “माझ्या मुलासह सर्वांना हातकड्या आणि बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. त्याच्या आजूबाजूला असलेल्या सर्व पुरुष आणि स्त्रियांच्या पायात बेड्या होत्या.

अमेरिकेत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या भारतीयांना परत पाठविण्याची ही पहिलीच वेळ नाही. हे २००९पासून घडत आहे. गेल्या १६ वर्षांत बेकायदा राहणाऱ्या १५,६५२ भारतीयांना अमेरिकेतून माघारी पाठविण्यात आले आहे. या स्थलांतरितांना परत घेणे हे देशाचे कर्तव्यच आहे’, अशी भूमिका परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी संसदेत मांडली. मात्र, परतपाठवणी करताना त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे गैरवर्तन होऊ नये, यासाठी सरकार अमेरिकेशी चर्चा करत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.मात्र भारत सरकारचे न ऐकता अमेरिकेने अत्यंत हेकेखोरीने भारतीयांना बेड्या घालून भारतात पाठविले.या प्रश्नावरपरराष्ट्र व्यवहार तज्ञ हर्ष पंत म्हणतात, ‘ज्या पद्धतीने सार्वजनिकरित्या हद्दपारी केली जात आहे, ते भारतासाठी थोडे समस्याप्रधान आहे. 

हर्ष पंत म्हणाले, “ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात, टॅरिफसह अनेक मुद्दे आहेत ज्यांवर भारत सरकारला अमेरिकेशी कठोर सौदेबाजी करावी लागेल. भारताचा दृष्टिकोन अमेरिकेला संधी देण्याचा आहे जेणेकरून ते भविष्यातील चर्चेत इतर मुद्द्यांवर आपल्या मागण्या मांडू शकतील.”

प्राध्यापक स्वर्ण सिंह आणखी एक कारण स्पष्ट करतात, “भारताचे सध्याचे सरकार स्वतः बेकायदेशीर स्थलांतरितांबद्दल असाच दृष्टिकोन ठेवते आणि ते योग्य मानते. भारताचे धोरण अगदी स्पष्ट आहे की कोणताही परदेशी व्यक्ती बेकायदेशीरपणे कोणत्याही देशात जाऊ नये.” ते म्हणतात की मोदी या महिन्यात अमेरिकेला भेट देणार आहेत, त्यानंतर कदाचित या मुद्द्यावर चर्चेद्वारे काही तोडगा निघू शकेल.

हर्ष पंत असेही म्हणतात की, भारताला या तणावामुळे इतर मुद्द्यांवर पडदा पडू द्यायचा नाही जेणेकरून पुढील चर्चेला वाव राहील.

ते म्हणतात, “भारत आणि अमेरिकेतील संबंध मजबूत राहिले आहेत आणि इतर अनेक मुद्दे समोर असल्याने भारत सरकार कोणत्याही एका मुद्द्याला त्यावर वर्चस्व गाजवू देऊ शकत नाही. जर टॅरिफ, व्यापार आणि इतर आर्थिक मुद्द्यांवर संवादातून तोडगा काढता येत असेल, तर भारत ती संधी कायम ठेवू इच्छितो.”

डॉ सुधीर अग्रवाल वर्धा 

९५६१५९४३०६

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 5 2 1

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे