सागर दोशीची अनेक प्रकरणे होऊ लागली उघड : अवैध सावकारीतून अनेकांची मालमत्ता लाटली
सागर दोशीची अनेक प्रकरणे होऊ लागली उघड : अवैध सावकारीतून अनेकांची मालमत्ता लाटली
नागपूर/E T News
सावकारीतून लोकांना कर्ज दिल्यावर पैशांची परतफेड झाल्यानंतरही अव्वाच्यासव्वा व्याजदराचा हिशेब लावत त्यांची मालमत्ता गडप करणा-या सागर दोशीच्या एकामागून एक सुरस कथा पुढे येत आहे. तीन दिवसात त्याच्यावर खंडणीबाजी, दमदाटीकरत जबरी मालमत्ता स्वनावे करण्याचा तसेच कर्ज घेणा-याला जेरीस आणण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याने आतापर्यंत अनेकांची लाखोंची मालमत्ता लाटली आहे.
आर्थिक अडचण अससल्यामुळे धंतोली येथील प्लॉट नंबर १६०, टिकेकर रोडजवळ राहणारे फिर्यादी मनोज गोपाल नायडू (५७) यांनी सागर जयेंद्रकुमार दोषी (३५, रा. नरेंद्रनगर) याच्याकडून १० टक्के व्याजाने १३ लाखांचे कर्ज घेतले. १ मार्च २०१६ ते १२ फेबु्रवारी २०२० दम्याम्यान, त्यांच्यातील कर्ज घेण्याचा आणि परतफेडीचा आर्थिक व्यवहार झाला. कर्जाच्या परतफेडीवेळी सागरने मनोज नयडू यांना ठार मारण्याची धमकी देत ज्यांना जेरीस आणत आॅनलाईन १५ लाख ५० हजार तर रोख स्वरूपात १० लाख ७८ हजार अशे २६ लाख १८ हजार रुपये घेतले. त्यानंतरही अव्वाच्यासव्वा व्याजदराचा हिशेब सांगत त्यांना व्याजाचे आणखी १२ लाख रुपये बाकी असल्याचे बजावले. सागरने यानंतर नायडू यांची वर्धा जिल्हत्यातील सेलू येथे असलेली शेती तारण ठेवण्याच्या नावावर थेट विक्रीपत्रच स्वनावे करून घेते. यापोटी त्याने नायडू यांना १० लाख रुपये दिले. मात्र, ते देखील जबरीने काढून घेतले. यानंतर सागर हा नायडूंच्या घरावर उठला. घर तारण ठेवण्यासाठी त्याने नायडू यांना अनेकदा अश्लिल शिवीगाळ करत धमकावले. सागरचा त्रास सहण न झाल्याने अखेर नायडू यांनी अंबाझरी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सागर विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
१८ लाखांच्या कर्जावर ३५ लाख मागितले
बेसा येथील प्रथमेश टावर, रेवतीनगर येथे राहणारे फिर्यादी कौस्तुभ पुरुषोत्तम आष्टीकर (४०) यांनी सागर दोशी याच्याकडून १८ लाखांची रक्कम उधार घेतली. कौस्तुभ आष्टीकर यांनी नियमित हप्त्यांची परतफेड केली. त्यांना १८ लाखांवर व्याज मिळून एकूण १९ लाख ४५ हजार रुपये द्यायचे होते. त्यांनी ही संपूर्ण रक्कम सावकाराला दिली. यानंतर मात्र, सागरने ३५ लाख रुपये बाकी असल्याचा दावा केला. यासाठी कौस्तुभला पैशांसाठी धमकावणे सुरू केले. दमदाटीकरत त्यांचा बेसा येथील भूखंड व त्यांच्या भावाच्या नावावर असलेली दुकानाची जागा जबरीने स्वत:च्या नावावर करून घेतली.
————————————-
२,७२७ वाहन चालकांवर कारवाई
नागपूर : महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये एका प्रकरणात एका जणाकडून ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यान्वये ३ प्रकरणांत ३ जणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत १ हजार ६५७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलिसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली २ हजार ७२७ वाहन चालकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ३ लाख ४१ हजार १०० रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. नागपूर शहर पोलिसांनी वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या राबविली. या पुढे देखील ही कारवाई प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. परिणामी, वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळून वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित, असे आवाहन करण्यात आले आहे.
————————-
विधिसंघर्षग्रस्त बालकाने पार्किंगमधून चोरली दुचाकी
नागपूर : अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये ठेवलेली दुचाकी विधिसंघर्षग्रस्त बालकाने चोरून नेली. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक २ च्या पथकाने ही कारवाई केली. २४ जुलै रोजी, वासुदेवनगरातील मयुरेश अपार्टमेंअ येथून त्याने ही दुचाकी चोरी केली होती.
दाभा, खडगाव रोड जवळील प्लॉट नंबर १८, आश्रय बिल्डिंग येथे राहणारे फिर्यादी हर्षल श्रीकृष्ण पूरी (२५) यांनी त्यांची दुचाकी (एम.एच. ३१ सी. झेंड. ९२४४ ) ही एमआयडीसी पोलिस ठाण्यांतर्गत वासुदेवनगर येथील मयुरेश अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. ती चोरी गेल्याच्या तक्रारीवरून हर्षलने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या माहितीवरून तांत्रिक तपास केला. विधीसंघर्षग्रस्त बालकाचा चोरीत सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता त्याने उपरोक्त दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरीची दुचाकी जप्त केली आहे. जप्त मुद्देमालासह विधीसंघर्षग्रस्त बालकाला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
—————————–
सागर दोशीची अनेक प्रकरणे होऊ लागली उघड : अवैध सावकारीतून अनेकांची मालमत्ता लाटली
: नागपूर/E T News
सावकारीतून लोकांना कर्ज दिल्यावर पैशांची परतफेड झाल्यानंतरही अव्वाच्यासव्वा व्याजदराचा हिशेब लावत त्यांची मालमत्ता गडप करणा-या सागर दोशीच्या एकामागून एक सुरस कथा पुढे येत आहे. तीन दिवसात त्याच्यावर खंडणीबाजी, दमदाटीकरत जबरी मालमत्ता स्वनावे करण्याचा तसेच कर्ज घेणा-याला जेरीस आणण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याने आतापर्यंत अनेकांची लाखोंची मालमत्ता लाटली आहे.
आर्थिक अडचण अससल्यामुळे धंतोली येथील प्लॉट नंबर १६०, टिकेकर रोडजवळ राहणारे फिर्यादी मनोज गोपाल नायडू (५७) यांनी सागर जयेंद्रकुमार दोषी (३५, रा. नरेंद्रनगर) याच्याकडून १० टक्के व्याजाने १३ लाखांचे कर्ज घेतले. १ मार्च २०१६ ते १२ फेबु्रवारी २०२० दम्याम्यान, त्यांच्यातील कर्ज घेण्याचा आणि परतफेडीचा आर्थिक व्यवहार झाला. कर्जाच्या परतफेडीवेळी सागरने मनोज नयडू यांना ठार मारण्याची धमकी देत ज्यांना जेरीस आणत आॅनलाईन १५ लाख ५० हजार तर रोख स्वरूपात १० लाख ७८ हजार अशे २६ लाख १८ हजार रुपये घेतले. त्यानंतरही अव्वाच्यासव्वा व्याजदराचा हिशेब सांगत त्यांना व्याजाचे आणखी १२ लाख रुपये बाकी असल्याचे बजावले. सागरने यानंतर नायडू यांची वर्धा जिल्हत्यातील सेलू येथे असलेली शेती तारण ठेवण्याच्या नावावर थेट विक्रीपत्रच स्वनावे करून घेते. यापोटी त्याने नायडू यांना १० लाख रुपये दिले. मात्र, ते देखील जबरीने काढून घेतले. यानंतर सागर हा नायडूंच्या घरावर उठला. घर तारण ठेवण्यासाठी त्याने नायडू यांना अनेकदा अश्लिल शिवीगाळ करत धमकावले. सागरचा त्रास सहण न झाल्याने अखेर नायडू यांनी अंबाझरी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सागर विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
१८ लाखांच्या कर्जावर ३५ लाख मागितले
बेसा येथील प्रथमेश टावर, रेवतीनगर येथे राहणारे फिर्यादी कौस्तुभ पुरुषोत्तम आष्टीकर (४०) यांनी सागर दोशी याच्याकडून १८ लाखांची रक्कम उधार घेतली. कौस्तुभ आष्टीकर यांनी नियमित हप्त्यांची परतफेड केली. त्यांना १८ लाखांवर व्याज मिळून एकूण १९ लाख ४५ हजार रुपये द्यायचे होते. त्यांनी ही संपूर्ण रक्कम सावकाराला दिली. यानंतर मात्र, सागरने ३५ लाख रुपये बाकी असल्याचा दावा केला. यासाठी कौस्तुभला पैशांसाठी धमकावणे सुरू केले. दमदाटीकरत त्यांचा बेसा येथील भूखंड व त्यांच्या भावाच्या नावावर असलेली दुकानाची जागा जबरीने स्वत:च्या नावावर करून घेतली.
————————————–
भरधाव ट्रेलरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
नागपूर : कामावरून एका दुचाकीवरून दोघे मित्र घरी परतत असताना एका अज्ञात टेÑलर चालकाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एका मित्राचा मृत्यू झाला. पारडी ठाण्यांतर्गत जबलपूर हैदराबाद बायपास हायवे रोडवर हा अपघात झाला. अर्जुन खन्ना गायकवाड (३०, रा. पिपरी, कन्हान) असे मृतकाचे तर अमीत भागवत चौरे (३०, रा. रामनगर, ढिवर मोहल्ला, कन्हान, पिपरी) असे जखमी मित्राचे नाव आहे.
अमीत चौरे आणि अर्जुन गायकवाड हे ३१ जुलै रोजी, संध्याकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास कामावरून घरी परतत होते. अर्जुन दुचाकी (एम.एच. ३१ ए.टी. २६९६) चालवत होता तर अमीत मागे बसला होता. ते जबलपूर हैदराबाद बायपास हायवे रोडपर्यंत पोहोचले असता एका भधाव अज्ञात ट्रेलर चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चावत अर्जुुनच्या दुचाकीला धडक दिली आणि पळून गेला. अपघातात दोघेही दुचाकीवरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान डॉक्टरांनी अर्जुन गायकवाड याला तपासून मृत घोषित केले. तर अमीत चौरेवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अमितने दिलेल्या दिलेल्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी आरोपी ट्रेलर चालका विरूद्ध कलम १०६ (२), १२५ (अ) (ब), २८१ भादंवि सहकलम १३४, १८४, १७७ मो.वा.का अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
—————————————–
रेल्वेच्या धडकेत इसमाचा मृत्यू
नागपूर : मानकापूर पोलिस ठाण्यांतर्गत रेल्वेच्या धडकेत एका अज्ञात इसमाचा मृत्यू झाला. १ आॅगस्ट रोजी, रात्री ८.२२ वाजताच्या सुमारास साईबाबा कॉलोनी मागील नागपूर ते दिल्ली अप रेल्वे लाईन पोल नंबर १०३८/१-३ च्या मध्ये एका अनोळखी पुरूष ईसम (अंदाजे ४० ते ४५) मिळून आला. त्यांना उपचाराकरिता मेयो रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी रेल्वे कर्मचारी अखिलेश रमेश लोखंडे (५७, रा. ढोबळे ले-आउट, गोधनी) यांनी दिलेल्या सूचनेवरून मानकापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतलेली आहे.
——————-