गोधनी ते टाकळी रस्त्यावरील विद्युत खांब अपघाताला आमंत्रण…..विद्युत खांब हटविण्याची मागणी
गोधनी ते टाकळी रस्त्यावरील विद्युत खांब अपघाताला आमंत्रण…..विद्युत खांब हटविण्याची मागणी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कमलेश सिंह ठाकुर यांनी दिले निवेदन
नागपूर / E T News
मानव कल्याण सामाजिक व सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अध्यक्ष कमलेश सिंह ठाकुर यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.
गोधनी नगर पंचायत अंतर्गत येणारे गोधनी ते टाकळी रस्त्याचे विद्युत खांब लवकरच हटविण्याची मागणी केली. गोधनी ते टाकळी रस्ता हा अत्यंत सक्रिय रस्ता असल्याने व विद्युत खांब अद्याप काढण्यात आलेले नसल्याने अनेकदा अपघात झालेत आणि पुढे देखील अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतेही मोठी वाहने, ट्रॅक किंवा बस ये-जा करत असतील तर लहान मुले सायकलवर शाळेत जाण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. अनेक वाहने, कार आणि दुचाकी वारंवार खांबावर आदळल्या जाते. त्यामुळे भविष्यात कोणत्याही प्रकारचा अपघात होण्याची शक्यता आहे. मोठी दुर्घटना घडू नये म्हणून रस्त्यावरील विद्युत खांब लवकरात लवकर हटविणे जरूरी आहे. जेणेकरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांना व शाळेत जाणाऱ्या मुलांची सोय होईल व कोणतीही गंभीर दुर्घटना टाळता येईल. यासाठी कमलेश सिंह ठाकुर यांनी देवेंद्र फडणवीसांना प्रायक्ष भेटुन या गंभीर विषयांवर लवकर कार्यवाही करण्यात येईल. असे आश्वासन दिले.
——–