मराठीसाठी सर्वार्थाने गौरवपूर्ण उल्लेख : ९८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे विज्ञान भवनात थाटात उद् घाटन

मराठीसाठी सर्वार्थाने गौरवपूर्ण उल्लेख
९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विज्ञान भवनात थाटात उद् घाटन
नवी दिल्ली/विशेष प्रतिनिधी
देशाची राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विज्ञान भवनात थाटात उद्घाटन केले. संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर स्वागताध्यक्ष खासदार शरद पवार मावळते अध्यक्ष रवींद्र शोभणे महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे उज्वला मेहंदळे संजय नहार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर मंडळी व्यासपीठावर उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरुवातच मराठीतून केली. मोदींनी संत ज्ञानेश्वर महाराजांची एक ओळी आपल्या भाषणातून मांडले ‘माझ्या मराठीची बोलू कौतुके! परी अमृता तेही पैजा जिंके’ या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेची महती, श्रीमंती,मराठी भाषेची शुरता, वीरता, सौंदर्य, संवेदना, समरसता आधुनिकता मराठीची भक्ती शक्ती आणि युक्ती वेगवेगळ्या मराठी साहित्यिकांच्या विचारांचा आणि त्यांच्या साहित्याचा उल्लेख करून मराठीची महती विश्व संमेलनातून मांडली.
आपल्या संपूर्ण भाषणात मोदींनी मराठीसाठी सर्वार्थाने गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, शिवरामपंत परांजपे, माधव श्रीहरी अणे, वीर सावरकर, आचार्य अत्रे, मामासाहेब वरेर, ग दि माडगूळकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश होता. मोदी मराठी भाषिक साहित्याचा अगोदरच उलगडून घ्यायचा प्रयत्न केला. दलिताचा त्यांनी विशेषत्वाने उल्लेख केला.
पंतप्रधान मोदी यांनी सुरुवातीलाच, ‘‘मराठी सारस्वतांना माझा नमस्कार,’’ असे म्हणत मराठीतून भाषणास सुरुवात केली. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये बोलत असताना त्यांनी मध्ययुगीन काळापासून ते अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होईपर्यंतच्या महत्त्वाच्या घटनांचा आणि महापुरुषांचा उल्लेख करून त्यांना वंदन केले. ते म्हणाले, की मराठी मातीत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पहिले बाजीराव पेशवे यांनी त्या काळात शत्रूंना पराभूत करून जेरीस आणले.ब्रिटिश काळात वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक आणि वीर सावरकर यांसारख्या सेनानींनी ब्रिटिशांची झोप उडविली. त्यांनीही मराठी भाषा आणि साहित्यात अभूतपूर्व असे योगदान दिले. केसरी आणि मराठा या वर्तमानपत्रांनी भाषेला आकार दिला. मराठी साहित्यातून राष्ट्रप्रेमाचा ज्वर दिसून आला. संपूर्ण राष्ट्राची मशागत या साहित्याने केली. लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य मराठीत लिहिले. त्यांच्या रचनेने देशभरात एक ऊर्जा संचारली,याचे स्मरण मोदींनी करून मराठी भाषिकांचे मन जिंकले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदी व गुजराती भाषिक असूनही त्यांनी अस्खलित मराठी भाषेत भाषणाची सुरवात करून मराठीचा गोडवा गायला. आपल्यासारख्या विद्यानांसारखा मराठीत प्रवीण नाही. पण मराठी बोलण्याचा प्रयत्न, मराठीच्या नव्या शब्दांना शिकण्याचा प्रयत्न नक्की केला आहे”, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. आजतर जागतिक मातृभाषा दिवस आहे. तुम्ही दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी दिवस सुद्धा अतिशय चांगला निवडला”, असंही मोदी मराठीत म्हणाले. “हे मराठी संमेलन तेव्हा होत आहे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीला ३०० वर्षे पूर्ण होत आहेत. काही काळापूर्वी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नांनी तयार केलेल्या संविधानानेदेखील ७५ वर्षे पूर्ण केले आहेत”, असंदेखील नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले .
मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मराठी यांचा दृढ संबंध सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर पुरोगाम्यांना अप्रत्यक्ष टोला हाणला.गेल्या काही वर्षांमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ यांच्यावर तथाकथित पुरोगाम्यांचे वर्चस्व असल्याने “निवडक” मराठी साहित्यिक हे संघ किंवा हिंदुत्ववादी विचारांना “टॅबू” मानतात. मराठीचा आणि संघाचा किंवा हिंदुत्ववादी विचारांचा काही संबंध आहे हे सांगण्याचे टाळतात. या पार्श्वभूमीवर राजधानी नवी दिल्लीत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपण मराठी कशी शिकलो आणि आपला मराठीशी संबंध कसा आला, या संदर्भात सांगताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आवर्जून उल्लेख केला.
प्रा डॉ सुधीर अग्रवाल
९५६१५९४३०६