वर्धा/E T News
ठाणे येथील बलात्कार व हत्याकांड प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी
नवी मुंबईच्या बेलापूर गावात राहणाऱ्या 30 वर्षीय विवाहितेवर मंदिरातील तिन सेवेकरांनी बलात्कार करून खून केल्याची मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली. सदरील प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशी मागणी निवेदनाद्वारे शहर काँग्रेस कमिटीचे माजी शहराध्यक्ष सुधीर भाऊ पांगुळ यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे.
घरगुती वाद झाल्यामुळे महिला मानसिक तणावात होती. सदरील महिला सहा जुलै रोजी सकाळी 10 च्या सुमारास शीळगाव येथील घोळ गणपती मंदिरात आली. रात्री ती मंदिरात च थांबली त्यावेळी मंदिरातील तिघा सेवेकर्यांनी चहात भांगेच्या गोळ्या घालून चहा दिला. महिला नशेत असताना या तीन सेवेकर्यांनी बलात्कार करून तिची हत्या केल्याचा धक्कादायक आणि लांचनास्पद प्रकार शीळगाव (ठाणे) येथे घडला .
श्यामसुंदर प्यारचंद शर्मा(वय 62 रा.कोटा, राजस्थान), संतोषकुमार राम यज्ञ मिश्रा,(वय,45,) व राजकुमार रामेश्वर पांडे (वय 54) दोघेही रा प्रतापगड, उत्तर प्रदेश अशी या तीन आरोपींची नावे आहेत डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मौजे शीळगाव येथील घोळ गणपती मंदिराच्या मागे एका अज्ञात महिलेचा मृतदेह 9 जुलै 2024 रोजी आढळून आला मृत महिलेच्या शरीरावर जखमा आढळून आल्याने पोलीस चौकशीत बलात्कार करून तिचा खून केल्याचे निष्पन्न झाले.
सामूहिक बलात्कार व हत्याकांडाचे सदरील प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालून तीनही आरोपींना फाशी देण्यात यावी या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी विशाल हजारे शहर शहर उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी वर्धा,प्रल्हाद चौधरी, प्रशांत मोरे, मोहित ठाकरे ,सचिन कोटंबकर, विवेक तळवेकर, भास्कर गणोरे ,बशीर शेख ,अभिजीत चौधरी, निखिल अष्टनकर, श्रीकांत ढगे ,राजेंद्र मानमोडे ,प्रद्युमन्य मानमोडे ,पराग भोयर, पंकज इंगोले, आदी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.