सरपंचांच्या मानधनात वाढ करा : ग्रामविकास मंत्र्यांकडे आ. सुभाष धोटेंची निवेदनाद्वारे मागणी
सरपंचांच्या मानधनात वाढ करा : ग्रामविकास मंत्र्यांकडे आ. सुभाष धोटेंची निवेदनाद्वारे मागणी.
( राजुरा तालुका प्रतिनिधी – रंगराव कुळसंगे )
राजुरा/E T News
चंद्रपूर जिल्हा अखिल भारतीय सरपंच परिषद संघटनेच्या मागण्यानुसार राज्याच्या ग्रामपंचायतीतील सरपंच हे स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रमुख व महत्वाचे पद असून गावाच्या विकासात सरपंच यांचा महत्वाचा वाटा असतो. सरपंच संघटनेनी काही दिवसापूर्वी मुंबई येथे त्यांच्या विविध मागण्या घेऊन आंदोलन केले होते, त्यांच्या कार्याचा व मेहनतीचा योग्य व समाधानकारक मानधन मिळाल्यास गावाच्या विकासाकरिता अधिक कार्यक्षमतेने काम करण्याचा उत्साह निर्माण होईल. सध्या परिस्थिस्थितीत राज्यातील सरपंच यांना अतिशय कमी मानधन मिळत असल्याने गावाच्या विकासाची कामे करीत असतांना स्फूर्तिदायक कामे होत नसल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे त्यांच्या कार्याचा व मेहनतीचा योग्य पारितोषिक म्हणून मानधनात वाढ होणे आवश्यक आहे.
करिता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील ग्राम विकासाचा अतिशय महत्वाचा घटक असलेल्या सरपंच यांच्या मानधनात अधिकाधिक वाढ करण्याच्या दृष्टीने तातडीची कार्यवाही करावी अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.