नैराश्यातून अल्पवयीन मुलीने सोडले घर…!
नैराश्यातून अल्पवयीन मुलीने सोडले घर
नागपूर/E T News
आईचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. वडिलांनी दुसरे लग्न केले. सावत्र आईसोबत पटत नाही, म्हणून अवघ्या १५ वर्षाच्या मुलीने घरातून काढता पाय घेतला. पोलिसांनी तिला शोधून काढले आणि तिची समजूत काढली.
सोनेगाव ठाण्यांतर्गत ही धक्कादायक घटना पुढे आली. २५ आॅगस्टला सकाळी ११ वाजताच्या सुमारास या मुलीने टोकाचे पाऊल उचलत घर सोडले. ती कुठेही सापडत नसल्याचे बघता तिच्या आजोबांनी (७२) सोनेगाव ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत तपास सुरू केला. समांतर गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला ती सोनेगाव ठाण्यांतर्गत आढळली. पोलिसांनी तिची विचारपूस केली असता तिने त्यांच्यापुढे मन मोकळे केले. तिने सांगितले की, तिला सावत्र आई आहे. तिच्या आईचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले. तेव्हापासून कुठेच तिचे कुठेच मन लागत नाही. घरी सगळेच आहेत. परंतु, त्यांच्याशीही बोलावेसे वाटत नाही. म्हणून घरातून निघून जाण्याचा निर्णय घेतला. मुलीच्या मनातील त्रास बघता पोलिसही थबकले. त्यांनी आपुलकीने मुलीची समजूत काढली. तिचे समूपदेशन केले आणि सोनेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, सह पोलिस आयुक्त अश्वती दोरजे, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) संजय पाटील, पोलिस उप आयुक्त (डिटेक्शन) राहुल माकणीकर, सह पोलि आयुक्त (गुन्हेशाखा) अभिजीत पाटील मार्गदर्शनाखाली, अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक पथकातील पोलिस निरीक्षक ललिता तोडासे, राजेंद्र अटकाळे, श्याम अंगुथलेवार, ऋषीकेश डुमरे, वैशाली किन्हीकर यांनी मुलीचा शोध घेतला.
————————————-