रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा राजुरा द्वारा ६७ वा वर्धापन दिन समारोह उत्साहात संपन्न
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा राजुरा द्वारा ६७ वा वर्धापन दिन समारोह उत्साहात संपन्न
( रंगराव कुळसंगे )
राजुरा ( ता .प्र.)
येतील छत्रपती शिवाजी महाराज संकुल हॉल मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) च्या वतीने ६७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात हजारो भीम सैनिकांनी सहभाग घेतला.या कार्यक्रमाच्या माध्यमातून आंबेडकरी जनतेनी एकतेचे दर्शन घडविले.
कार्यक्रमाची सुरुवात भीमशाहीर संभाजी ढगे यांच्या आंबेडकरी जलश्याने झाली. त्यानंतर सर्व मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आदरांजली अर्पण केली. प्रमुख पाहुणे नेताजी बुरचुंडे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले, तर सिद्धार्थ पथाडे यांनी अध्यक्षीय स्थानी होते.
विशेष अतिथी म्हणून डॉ. ऍड. सत्यपाल कातकर, भारतभाऊ थुलकर, जि. के. उपरे, पवन भगत,हरिष दुर्योधन,अंकुश वाघमारे व निवारण कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. वक्त्यांनी रिपब्लिकन पार्टीच्या इतिहासावर प्रकाश टाकत पक्षाला गळती का व कशी लागली यावर विचार व्यक्त केले.आता यातून पक्षाला पुनरुज्जीवित करण्यासाठी काय करता येईल यावर साधकबाधक मत मांडण्यात आले.यावेळी
डॉ. ऍड. सत्यपाल कातकर यांनी आपल्या प्रभावी भाषणात सरकार आणि दलालांवर जोरदार हल्ला चढवला आणि समाजाच्या एकतेचे महत्त्व अधोरेखित केले. अध्यक्षीय भाषणात सिद्धार्थ पथाडे यांनी आपले संपूर्ण आयुष्य आंबेडकरी चळवळीसाठी समर्पित करण्याचे जाहीर केले.
या सोहळ्यात आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमातून उपस्थितांच्या मनात एक नवा आत्मविश्वास निर्माण झाल्याचे दिसून आले व यापुढे आंबेडकरी चळवळ एक नवीन दिशा घेईल असा मतप्रवाह स्पष्ट दिसत होता.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ईश्वर देवगडे, दिगंबर उमरे,ऋषी रायपूर,महेंद्र साखरकर,दादाजी जवळेकर,सिध्दार्थ रणवीर,प्र प्रदीप उपरे,अनिल चांदेकर,रामदास दुर्योधन व नागवंश युथ फोर्स बहुउद्देशीय संस्था, विविध सामाजिक संघटनांचे विशेष सहकार्य लाभले.