हिवाळी अधिवेशनातून विदर्भाच्या पदरात काय पडले ?

हिवाळी अधिवेशनातून विदर्भाच्या पदरात काय पडले
उपराजधानी नागपूरमध्ये १६ डिसेंबरपासून सुरू झालेल्या राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचे शनिवारी (२१/१२/२४) सूप वाजले.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र, मंत्र्यांचे खातेवाटप अधिवेशनानंतर झाले. पुढील अधिवेशन मुंबईत ३ मार्च २०२५ पासून सुरू होईल, अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्यपालांच्या संदेश वाचनानंतर केली.
सहा दिवसांच्या अधिवेशनात सर्वाधिक चर्चाही बीड आणि परभणी घटनेवर झाली कायदा सुव्यवस्था संदर्भात पहिल्या दिवशीच सोमवारपासून विरोधकांनी सभागृहाच्या बाहेर आंदोलनाला सुरुवात केली होती बीड परभणी घटनेवरती अनेकदा सभागृहाच्या बाहेर आंदोलन झाली आणि सभागृहात १०१ अन्वे चर्चा करून आणली. या चर्चेवरती भाजपचे आमदार सुरेश धस आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप करत वाल्मीक कराड आणि एक मंत्री म्हणून धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. तर, परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणावरुनही सभागृहात गदारोळ पाहायला मिळाला.
सहा दिवस चाललेले नागपूर हिवाळी अधिवेशन केवळ औपचारिक होते. या अधिवेशनात कामकाज कमी गदारोळ जास्त होते. ६ दिवस चाललेल्याया अधिवेशनात बीड, परभणी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्यासह शेतकरी व विविध प्रश्नांवरून सभागृहात गदारोळ झाला. या अधिवेशनात दोन्ही सभागृहात एकूण १७ विधेयके मंजूर झाली असून २ विधेयके प्रलंबित आहेत. संयुक्त समितीकडे एक आणि विधान सभेत एक विधेयक प्रलंबित आहे. स्वतंत्र विदर्भावर चर्चा होईल अशी अपेक्षा होती परंतु यावेळी देखील स्वतंत्र विदर्भावर चर्चा झाली नाही विदर्भाच्या विकासावर फाशी चर्चा झाली नाही विशेष म्हणजे स्वतंत्र विदर्भ भाजपाच्या घोषणापत्रात असताना देखील भाजपा आता स्वतंत्र विदर्भाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. नागपुरात अधिवेशन होत असतानाही विदर्भाचे मुद्दे दुर्लक्षित राहिल्याची भावना विरोधकांनी व्यक्त केली.
विदर्भावर चर्चा झालीच नाही
कापसाला योग्य भाव नाही म्हणून एक दिवस सहभागृच्या बाहेर विरोधकांनी पायऱ्यावरती आंदोलन केले. अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करतांना पीक विमा संदर्भात सुरेश धस यांनी महायुतीला घरचा आहेर देत तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या टीका केली. काही महत्त्वाची विधेयक मांडली गेली, त्यामध्ये जन सुरक्षा विधेयक यावरती चर्चा करण्यात आली. कारगृह सुधारणा विधेयक मांडण्यात आलं. ही सर्व चर्चा झाली असली तरी विदर्भात अधिवेशन होत असताना विदर्भावरती मात्र वेगळी चर्चा करण्यात आली नाही. अंतिम आठवडा प्रस्तावमध्ये विदर्भ संदर्भात अवघ्या दोन ओळींचा उल्लेख करण्यात आला आहे.
या अधिवेशनामध्ये सर्वाधिक बोलायला नवीन आमदारांना संधी देण्यात आली. नवीन आमदारांनी सर्वाधिक औचित्याच्या मुद्द्यावरती प्रश्न उपस्थित केले. सोबतच राज्यपालांचे अभिभाषण आणि २९३ च्या अन्वेय चर्चावरती आपली मत मांडली. बीड व परभणीच्या आमदारांनी आपली भूमिका सर्वाधिक मांडली
विदर्भ,मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र, कोकणातील मागास भागासह उर्वरित महाराष्ट्राचा समतोल विकास साधत महाराष्ट्रातील जनतेला न्याय देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. विदर्भ,मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प, औद्योगीक प्रकल्प पूर्णत्वाला नेणार असून मराठवाड्यातील वॉटरग्रीड प्रकल्प मार्गी लावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गडचिरोली स्टील सिटी म्हणून उदयास येत असून येत्या तीन वर्षात गडचिरोलीतील नक्षलवाद आटोक्यात आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर पीक विमा कंपन्यांच्या गैरप्रकरांना आळा घालण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
धानाला गतवर्षीप्रमाणेच हेक्टरी २० हजार बोनस,भविष्यातील स्टील सिटी म्हणून विकसित होणारा गडचिरोली जिल्हा तीन वर्षात नक्षलमुक्त करण्यासोबतच शेतकरी कर्जमाफीसह आमच्या जाहीरनाम्यातील सर्व बाबींची पूर्तता केली जाईल. मुंबई गोवा महामार्गाचे काम युद्ध पातळीवर पूर्ण केले जाईल. पुणे ते संभाजीनगर नवा ग्रीन फील्ड महामार्ग केला जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस विधानसभेत बोलत होते.याशिवाय मुख्यमंत्र्यांनी विदर्भ, मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प,औद्योगिक प्रकल्प पूर्णत्वाला नेणार
गडचिरोलीतील नक्षलवाद आटोक्यात आणणार
विदर्भात आंतरराष्ट्रीय दर्जाचे वनपर्यटन, जलपर्यटन
मराठवाड्यातील वॉटरग्रीड प्रकल्प मार्गी लावणार
पिक विमा कंपन्यांच्या गैरप्रकारांची सखोल चौकशी करणार असल्याचे सभगृहात सांगितले.
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात एकूण ६ बैठका झाल्या, ४६ तास २६ मिनिटे कामकाज झाले असून सभागृहाची १० मिनिटे वाया गेलेली आहेत. सहा दिवस दररोज एकूण ७ तास ४४ मिनिटे सरासरी कामकाज झाल्याची माहिती विधानसभा अध्यक्षांनी दिली. दरम्यान,पुढील अधिवेशन ३ मार्च पासून मुंबईत सुरू होईल, तसेच हे अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे, अशी माहिती नार्वेकरांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महायुती सरकारचं पहिलं अधिवेशन नागपुरात पार पडलं. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एकूण ७८ सदस्य नवीन निवडून आले आहेत, तर ५ जण विधानपरिषदेवरून विधानसभेत आले असल्याची माहिती विधानसभा अध्यक्षांनी दिली. अधिवेशनाच्या कामकाजात परभणी, बीड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान याच विषयांवर चर्चा झाली. राज्यपाल अभिभाषण आणि ३५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्यावरील चर्चेनंतर शेवटच्या दोन दिवसातच विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्ताव निमित्ताने शेतकरी, आदिवासी प्रश्न, विदर्भ-मराठवाड्याची चर्चा झाली. सभागृहाबाहेर बनावट औषध पुरवठ्याचा मुद्दाही चर्चेला आला.
प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल, वर्धा
९५६१५९४३०६