आगामी विधानसभा निवडणुकीकडे सगळ्यांचेच लक्ष – संघ आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार !
भारतीय जनता पार्टीत गटबाजी
गडचिरोली/E T News
आगामी विधानसभा निवडणुकीकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे महायुतीतील सर्वच पक्षांनी आम्हाला गडचिरोली विधानसभेची तिकीट देण्यात यावी असा दावा केला आहे मात्र यात नव्याने उडी टाकत आहे तो म्हणजे संघ परिवार संघाच्या माणसाला तिकीट द्या असा आग्रह धरून डॉक्टर मिलिंद नरोटे हा चेहरा समोर केला जात आहे मात्र इतिहासात पहिल्यांदाच जाहीररित्या संघाच्या माणसाला तिकीट द्या असा प्रचार पहावयास मिळत आहे संघाने आपला माणूस घोषित केलेला आहे असा चुकीचा प्रसार सध्या संघातील काही निवडक माणसांकडून केला जात आहे किंवा या माणसाला संघाने आतून आदेश दिले आहेत का असा सवाल देखील आता उपस्थित केला जात आहे मात्र आजपर्यंत भारतीय जनता पार्टीला आतून संघाचा समर्थन असायचा मात्र आता संघाच्या माणसाला तिकीट द्या आणि भारतीय जनता पार्टीने समर्थन व प्रचार करा असा चुकीचा प्रचार सर्व प्रसार माध्यमांद्वारे केल्या जात आहे संघाच्या माणसाला भाजपात प्रवेश करून भाजपाची तिकीट द्या असा देखील प्रकार सद्यस्थितीत सुरू झालेला आहे. त्यामुळे आता संघाला राजकारणात उतरावे लागेल आहे काय असा सवाल देखील आता विरोधक करीत आहे.
भारतीय जनता पार्टीत गटबाजी
पूर्वी काँग्रेस पक्षात गटबाजी असल्याचे चित्र दिसून येत होते मात्र सध्या स्थितीत भारतीय जनता पार्टीत गटबाजी असल्याचे दिसून येत आहे या गटबाजीकडे हाय कमांड लक्ष देत नसल्याचेही दिसून येत आहे. भारतीय जनता पार्टी हा पक्ष शिस्तबद्ध व विविध धोरणात्मक ध्येय घेऊन काम करणारा पक्ष म्हणून ओळख होती. मात्र सध्या स्थितीत या गतबाजीला थांबवण्यात भाजपा जिल्हाध्यक्ष यांना अपयश आले आहे.त्यामुळे त्यांचे पक्षात वर्चस्व नसल्याचे दिसून येत आहे.
या गंभीर विषयाकडे हाय कमांडचे कोणतेही लक्ष नसल्याचे देखील दिसून येत आहे त्यामुळे सध्या स्थितीत गडचिरोली भारतीय जनता पार्टीत गटबाजी मोठ्या प्रमाणात होत आहे या गटबाजीमुळे लोकसभेला मोठे नुकसान झालेले आहे आता हेच नुकसान विधानसभेला होण्याची शक्यता वर्तविले जात आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठीने देखील या गंभीर विषयाकडे लक्ष देण्याची गरज आहे .
विद्यमान आमदारांसोबत पटत नसल्यामुळे पक्षात नवीन माणसाची एन्ट्री करीत संघाचा माणूस म्हणून खोटा अपप्रचार करण्याचा प्रकार सध्या भारतीय जनता पार्टी तर्फे करण्यात येते आहे मात्र असल्या प्रकारामुळे भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.