वडिलांचा शैक्षणिक वारसा पुढे नेणारे स्व. सुनीलकुमार पोरवाल

वडिलांचा शैक्षणिक वारसा पुढे नेणारे स्व. सुनीलकुमार पोरवाल
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुनील कुमार जी पोरवाल यांचे दिनांक २५/ ६ /२०२५ रोजी दुःखद निधन झाले.
मृत्यू हे अंतिम सत्य आणि शरीर हे नश्वर आहे. तरी देखील मन … जाण्याचे दु:ख सहन करु शकत नाही. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा!!
शिक्षण क्षेत्रात अतुलनीय काम करणारे आणि शिक्षणाला एक नवीन दिशा देणारे अनेक महान शिक्षण तज्ञ होऊन गेले.त्यात कामठी येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष स्व. सुनील कुमार पोरवाल यापैकी एक की ज्यांनी आपले संपूर्ण जीवन गोर गरिबांच्या कल्याणासाठी त्यांना शिक्षीत करण्यासाठी घालविले. सुनीलकुमार यांना हा सांस्कृतिक वारसा त्यांचे पिता स्व. नेमकुमारजी पोरवाल यांच्या कडून मिळाला. वडिलांकडून कडून मिळालेला शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक वारसा पुढे नेत सुनील कुमारजींनी शिक्षणाचे नवनवीन दालने उघडली. काळाच्या ओघात शिक्षणाचे व्यापारीकरण होत असताना सुनील कुमारजींनी शिक्षण प्रसारक मंडळाला व्यापारीकरण सुरू येऊ दिले नाही. विशेष म्हणजे पित्या प्रमाणेच सुनील कुमारजींनी या संस्थेतील कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवला. संस्थेतील प्रत्येक कर्मचाऱ्यांची विचारपूस करणे त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे, वेळप्रसंगी कर्मचाऱ्यांना मदत करणे हा त्यांचा स्वभाव गुण होता. आजच्या परिस्थितीत एखाद्या संस्थेत कार्य करणे खूप कठीण कार्य आहे .संस्था कर्मचाऱ्यांना वेठ बिगार म्हणून राबवितात.मात्र सुनील कुमार पोरवाल यांनी कोणत्याही कर्मचाऱ्याला कधीही ,कोणताही त्रास दिला नाही.. महाविद्यालयाची उत्तरोत्तर प्रगती कशी होईल या ध्येयावरच लक्ष केंद्रित करत त्यांनी आपली शैक्षणिक वाटचाल सुरू ठेवली. गोर गरीब ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहेत अशा विद्यार्थ्यांना निःशुल्क प्रवेश देऊन त्यांच्या मदतीला हातभार लावण्याचे महान पुण्य कार्य सुनीलजींनी केले आहे.
नागपूर जिल्ह्यातील कामठी सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे,या भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागात होणाऱ्या अडचणी लक्षात घेता स्व नेमकुमारजी पोरवाल यांनी आपले पिता जी सेठ केसरीमल पोरवाल यांच्या स्मरणात कामठी येथे शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली.
नागपूरचे एक उपग्रह शहर कामठी हे बऱ्याच काळापासून लष्करी प्रतिष्ठान आणि तंबाखूशी संबंधित उद्योगांसाठी ओळखले जात होते. हे शहर संपूर्ण भारतात फुटबॉलपटूंसाठी प्रजनन केंद्र म्हणून देखील ओळखले जाते. शहरातील अनेक खेळाडूंनी फुटबॉलमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. नागपूर विद्यापीठाला आपली सर्व कमाई आणि मालमत्ता दान करणारे राय बहादूर डी. लक्ष्मीनारायण हे देखील याच ठिकाणचे होते. परंतु पन्नासच्या दशकाच्या मध्यात या शहरात शैक्षणिक संस्कृती फारच कमी होती.या पार्श्वभूमीवर नेमकुमारजी यांनी कनिष्ठ महाविद्यालयापासून तर पदवी व पदव्युत्तर शिक्षण याभागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले.
वरिष्ठ महाविद्यालया प्रमाणेच कनिष्ठ महाविद्यालासाठी या संस्थेने ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन इमारत बांधली. कनिष्ठ महाविद्यालयात कला, विज्ञान व वाणिज्य शाखा उघडण्यात आल्या..शिवाय विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण मिळावे म्हणून संगणक फिशरीज व इलेक्ट्रॉनिक्स या सारख्या शाखा देखील उघडल्या.
काळाच्या ओघात, सूक्ष्मजीवशास्त्र, जैव-रसायनशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, संगणक विज्ञान आणि नेमकुमार्जींचा हा सांस्कृतिक व शैक्षणिक वारसा सुनील कुमार जी पोरवाल यांनी कायम राखत कामठी येथे उच्च शिक्षणाचे अनेक दालन उघडले.
शिक्षणामुळे ग्रामीण भागातील मुला-मुलींना चांगले भविष्य मिळू शकते, शिक्षणामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो, शिक्षणामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होतो, शिक्षणामुळे ग्रामीण भागाचा विकास होतो. वडिलांचा हाच उद्देश डोळ्या समोर ठेवून सुनीलकुमार यांनी छोट्या वृक्षाचे मोठ्या वृक्षात रूपांतर केले. तंत्रज्ञान असे नवीन विषय पदवीपूर्व स्तरावर सुरू करण्यात आले आणि वाणिज्य व सामाजिक शास्त्रातील अर्थशास्त्र व समाजशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. गेल्या काही वर्षांत रसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान यासारख्या विषयांमध्ये विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. महाविद्यालयाने बीबीए आणि बी.कॉम. २००८-०९ सत्रापासून वाणिज्य विद्याशाखेत संगणक अनुप्रयोग अभ्यासक्रम सुरू केले. महाविद्यालयाने वायसीएमओयू, नाशिकचे केंद्र उघडून शिक्षणात खंड पडलेल्यांना शिक्षण उपलब्ध करून दिले.या मुक्त विद्यापीठानार्गत बीए आणि बी.कॉम. अभ्यासक्रम देखील सुरू केले आहेत.
नेमकुमार्जींचा हा सांस्कृतिक व शैक्षणिक वारसा सुनील कुमारजी पोरवाल यांनी कायम राखत कामठी येथे उच्च शिक्षणाचे अनेक दालन उघडले.
शिक्षणामुळे ग्रामीण भागातील मुला-मुलींना चांगले भविष्य मिळू शकते, शिक्षणामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो, शिक्षणामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होतो, शिक्षणामुळे ग्रामीण भागाचा विकास होतो. वडिलांचा हाच उद्देश डोळ्या समोर ठेवून सुनीलकुमार यांनी छोट्या वृक्षाचे मोठ्या वृक्षात रूपांतर केले.आज मितीस या महाविद्यालयात ४००० ते ४२०० विद्यार्थी शिक्षण घेतात. सुनील जींनी शिक्षण क्षेत्रात जो ध्यास ठेवला व यहा महाविद्यालयाची जी प्रगती व्हावी यासाठी नित्यनेमाने ते झटले त्यांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करणे हीच खरी त्यांच्यासाठी श्रद्धांजली ठरेल.
प्रा डॉ सुधीर अग्रवाल
उपप्राचार्य
सेठ केसरीमल पोरवाल कनिष्ठ महाविद्यालय कामठी
९५६१५९४३०६