चळवळीच्या कार्यकर्त्यांची वज्र मुठ राजकीय अस्तित्व निर्माण करेल
चळवळीच्या कार्यकर्त्यांची वज्र मुठ राजकीय अस्तित्व निर्माण करेल 
नागपूर/ E T News
या राज्यातच नव्हे तर देशात फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून राजकीय पटलावर जे कोणतेही पुरोगामी पक्ष विराजमान झाले त्या मध्ये चळवळीच्या कार्यकर्त्यांची मोठी भुमिका होती आणि आज पण आहे कार्यकर्त्यांची वज्र मुठ राजकीय अस्तित्व निर्माण करू शकते असे प्रतिपादन आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केले ते आज रमाबाई नगर घाटकोपर येथे शहिद भिम सैनिक सभागृहात राजकीय अस्तित्व अभियानाचे प्रारंभ करतांना बोलत होते या प्रसंगी चळवळीतील ज्येष्ठ नेते शाम दादा गायकवाड, टायगर चिंतामण गांगुर्डे, मंगेश पगारे, स्मारक समितीचे अध्यक्ष अशोकराव हिरे, दिलिप कदम, प्रा.रमेश दुपारे, पौर्णिमा पाईकराव, गीता पाखरे, दिक्षा जगताप, अर्पणा कांबळे,राजु सोनवणे,मुजिब शेख , मधू शर्मा, कोजागिरी खरात, लक्ष्मी अहिरे, रत्ना पाटोळे, विकास काटे, गुंडू रंगारी, पाखरे साहेब, आणि मोठ्या संख्येने महिला पुरुष चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी शहिद भिम सैनिकांना मानवंदना देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास काटे यांनी केले तर आभार प्रदर्शन दिलिप कदम यांनी केले.



